शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

उंदीर आणि घुशींनी फोडला कालवा : जलसंपदा विभागाचा तर्क 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 20:47 IST

भुसभुशीत झालेल्या जमिनीत उंदीर, घुशींनी अनेक छिद्र केल्यामुळे कालव्याच्या मातीचा पाया खचला आणि त्यामुळे दांडेकर पूल भागातील कालवा फुटण्याची घटना घडली..

ठळक मुद्देखडकवासला ते इंदापूरपर्यंतच्या कालव्याचे अंतर सुमारे २०२ कि.मीधरणातून कालव्यात सोडण्यात आलेले पाणी बंद जलसंपदा विभागाने महापालिकेला संबंधित अतिक्रमणे काढून टाकण्याबाबत पत्रव्यवहार

पुणे: खडकवासला धरण ते फुरसुंगीपर्यंतच्या कालव्याच्या भोवताली बेकायदेशीर बांधकामांचे अतिक्रमण झाले आहे. जलवाहिनीच्या कामासाठी त्यातील काही अतिक्रमणे सुमारे एका वर्षांपूर्वी महापालिकेने काढून टाकली.या भुसभुशीत झालेल्या जमिनीत उंदीर, घुशींनी अनेक छिद्र केल्यामुळे कालव्याच्या मातीचा पाया खचला आणि त्यामुळे दांडेकर पूल भागातील कालवा फुटण्याची घटना घडली, असा तर्क जलसंपदा विभागाच्या अधिका-यांनी लावला आहे.  खडकवासला धारणामधून मुठा उजवा कालव्यातून इंदापूरला पाणी पुरवठा केला जातो.खडकवासला ते इंदापूरपर्यंतच्या कालव्याचे अंतर सुमारे २०२ कि.मी आहे. त्यातील २८ कि. मी.चा कालवा शहरातून जातो. गेल्या काही वर्षांत जलसंपदा विभागाच्या जागेवरील अतिक्रमणांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात पर्वती,जनता वसाहत, हडपसर औद्योगिक वसाहत, मगरपट्टा, साडेसतरा नळी या परिसरातील कालव्या जवळच्या परिसरात मोठी अतिक्रमणे झाल्याचे निदर्शनास आले. त्यावर जलसंपदा विभागाने महापालिकेला संबंधित अतिक्रमणे काढून टाकण्याबाबत पत्रव्यवहार केला.परिणामी गेल्या वर्षी जलवाहिनी टाकण्यासाठी महापालिकेने काही झोपड्या हटवल्या. त्यानंतर उंदीर, घुशींनी या भागातील जमीन भुसभुशीत केली.परिणामी कालव्यातील पाण्याला वेगळी वाट मिळली.त्यातून ही दुर्घटना घडली असावी, अशी शक्यता जलसंपदा विभागाचे राज्याचे मुख्य अभियंता टी.एन. मुंडे यांनी व्यक्त केली.खडकवासला धरणातून कालव्यात सोडण्यात आलेले पाणी बंद करण्यात आले आहे,असे नमूद करून मुंडे म्हणाले, इंदापूरपर्यंतच्या ग्रामीण भागासह शहरातील जलशुध्दीकरण केंद्रांनाही कालव्यातून पाणी पुरवठा केला जातो.त्यामुळे वर्षभर हा कालवा सुरूच ठेवावा लागतो.परिणामी कालव्याची दुरूस्ती करता येत नाही.सुमारे दीड महिन्यापासून खडकवासला धरणातून इंदापूरला पाणी सोडण्यात आले आहे. सध्या कालव्यातून शेतीसाठी बाराशे ते चौदाशे क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. शहरातून जाणाऱ्या  कालव्याचा पाया दांडेकर पूलाजवळ खचला असून त्यामुळे पंचवीस लक्ष घन फुट पाणी वाहून गेले.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणी