शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणे हटविली! बाभुळगावला वन विभागाने शेतीतील, तर राजगुरुनगरला रस्त्यातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 23:54 IST

जवळपास १२० वन परिक्षेत्र अधिकारी, कर्मचारी व राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी तैनात करून पुणे वन विभागाने सलग आठ तास कारवाई

बिजवडी : जवळपास १२० वन परिक्षेत्र अधिकारी, कर्मचारी व राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी तैनात करून पुणे वन विभागाने सलग आठ तास कारवाई करत १५ जेसीबी यंत्रांच्या साहाय्याने इंदापूर तालुक्यातील बाभुळगावच्या हद्दीतील ६२ एकर क्षेत्रातील शेतीचे अतिक्रमण काढून टाकले.

पुण्याचे सहायक वनसंरक्षक एम. बी. तेलंग, पुणे प्रादेशिकचे मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, सहायक वनसंरक्षक वैभव भालेकर यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली इंदापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे, पौडचे वनपरिक्षेत्र अधिकारी पोपट कापसे, बारामतीचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. सुपेकर, दौंडचे वनपरिक्षेत्र अधिकारी हजारे, इंदापूरचे वनपाल पी. डी. चौधरी, वनरक्षक शीतल बागल यांच्यासह इंदापूर, बारामती, दौंड, पौड व इतर भागांतील वनकर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला. या संदर्भात माहिती देताना इंदापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी सांगितले की, बाभुळगावच्या हद्दीत वेगवेगळ्या जमीन गट क्रमांकामध्ये वनविभागाचे १६७ एकर क्षेत्र आहे.तीन महिन्यांपूर्वी वनजमिनीचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये वनविभागाच्या एकूण क्षेत्रापैकी ६२ एकर जमिनीवर शेजारी असणाºया शेतकºयांनी अतिक्रमण केल्याचे या सर्वेक्षणात आढळून आले. अतिक्रमण हटवलेल्या ठिकाणी वनविभागाने हद्दीनिश्चित केल्या आहेत. तेथे संरक्षक भिंत अथवा कुंपण घालण्यात येणार आहे. आतमध्ये वृक्षलागवड करण्यात येणार आहे, अशी माहिती देऊन काळे यांनी वनक्षेत्रात अतिक्रमण केल्यास तो वनगुन्हा ठरत असल्याने, कोणीही अतिक्रमण करू नये,असे आवाहन केले आहे. पत्रकारांना राज्य राखीव दलाच्या कर्मचाºयांनी धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला.राजगुरुनगर : शहराच्या हद्दीतून जाणाºया शिरूर- भीमाशंकर रस्त्यावरील अतिक्रमणे नेहमीप्रमाणे मंगळवारी (दि.२८) पुन्हा एकदा औपचारिकता म्हणून हटविण्यात आली. या कारवाईत नायब तहसीलदार राजेंद्र जाधव, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, बाधंकाम विभागाचे अभियंता भास्कर क्षीरसागर, पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी आदिंसह नगरपरिषदेचे कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.खेड उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशानुसार गेल्या वर्षीच्या आक्टोबर महिन्यात शहरातील सर्व अतिक्रमणावर जोरदार हातोडा मारला होता. त्यानंतर पुन्हा वाडा रस्त्यावर व पाबळ रस्त्यावर आणि पुणे-नाशिक महामार्गावरील व्यवसायिकांनी आपली दुकाने थाटली. त्यातच रक्षाबंधन आणि गणेशोत्सवानिमित्ताने अनेकांनी आपापल्या पुढाºयांच्या छुप्या पाठिंब्यावर पत्र्याचे गाळे उभारुन कहर केल्याने सर्वत्र प्रशासनावरच टिकेची झोड उठून आरोप होऊ लागले होते. अखेर प्रशासनाने औपचारिकता म्हणून अतिक्रमण कारवाईचा देखावा केला. अतिक्रमणे हटवताना थेट कारवाई न करता व्यावसायिकांना आपले साहित्य आणि मालाचे नुकसान न करता हटविण्यात येऊन रस्ते मोकळे केल्यामुळे नागरिकांनी मोकळा श्वास घेतले. या कारवाईचे स्वागत केले आहे.वनकायद्यानुसार हा वनगुन्हा असल्याने संबंधितांना नोटिसा पाठवून, ते कोणत्या आधारे जमिनी कसत आहेत, यासंदर्भात कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले होते. ही कागदपत्रे सादर केली गेली नाहीत. त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे काळे यांनी स्पष्ट केले.या कारवाईत अतिक्रमण करून लावलेली उसाची पिके अक्षरश: गवतासारखी मुळासह उखडून टाकण्यात आली. 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीPoliceपोलिस