शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

अतिक्रमणे हटविली! बाभुळगावला वन विभागाने शेतीतील, तर राजगुरुनगरला रस्त्यातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 23:54 IST

जवळपास १२० वन परिक्षेत्र अधिकारी, कर्मचारी व राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी तैनात करून पुणे वन विभागाने सलग आठ तास कारवाई

बिजवडी : जवळपास १२० वन परिक्षेत्र अधिकारी, कर्मचारी व राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी तैनात करून पुणे वन विभागाने सलग आठ तास कारवाई करत १५ जेसीबी यंत्रांच्या साहाय्याने इंदापूर तालुक्यातील बाभुळगावच्या हद्दीतील ६२ एकर क्षेत्रातील शेतीचे अतिक्रमण काढून टाकले.

पुण्याचे सहायक वनसंरक्षक एम. बी. तेलंग, पुणे प्रादेशिकचे मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, सहायक वनसंरक्षक वैभव भालेकर यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली इंदापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे, पौडचे वनपरिक्षेत्र अधिकारी पोपट कापसे, बारामतीचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. सुपेकर, दौंडचे वनपरिक्षेत्र अधिकारी हजारे, इंदापूरचे वनपाल पी. डी. चौधरी, वनरक्षक शीतल बागल यांच्यासह इंदापूर, बारामती, दौंड, पौड व इतर भागांतील वनकर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला. या संदर्भात माहिती देताना इंदापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी सांगितले की, बाभुळगावच्या हद्दीत वेगवेगळ्या जमीन गट क्रमांकामध्ये वनविभागाचे १६७ एकर क्षेत्र आहे.तीन महिन्यांपूर्वी वनजमिनीचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये वनविभागाच्या एकूण क्षेत्रापैकी ६२ एकर जमिनीवर शेजारी असणाºया शेतकºयांनी अतिक्रमण केल्याचे या सर्वेक्षणात आढळून आले. अतिक्रमण हटवलेल्या ठिकाणी वनविभागाने हद्दीनिश्चित केल्या आहेत. तेथे संरक्षक भिंत अथवा कुंपण घालण्यात येणार आहे. आतमध्ये वृक्षलागवड करण्यात येणार आहे, अशी माहिती देऊन काळे यांनी वनक्षेत्रात अतिक्रमण केल्यास तो वनगुन्हा ठरत असल्याने, कोणीही अतिक्रमण करू नये,असे आवाहन केले आहे. पत्रकारांना राज्य राखीव दलाच्या कर्मचाºयांनी धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला.राजगुरुनगर : शहराच्या हद्दीतून जाणाºया शिरूर- भीमाशंकर रस्त्यावरील अतिक्रमणे नेहमीप्रमाणे मंगळवारी (दि.२८) पुन्हा एकदा औपचारिकता म्हणून हटविण्यात आली. या कारवाईत नायब तहसीलदार राजेंद्र जाधव, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, बाधंकाम विभागाचे अभियंता भास्कर क्षीरसागर, पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी आदिंसह नगरपरिषदेचे कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.खेड उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशानुसार गेल्या वर्षीच्या आक्टोबर महिन्यात शहरातील सर्व अतिक्रमणावर जोरदार हातोडा मारला होता. त्यानंतर पुन्हा वाडा रस्त्यावर व पाबळ रस्त्यावर आणि पुणे-नाशिक महामार्गावरील व्यवसायिकांनी आपली दुकाने थाटली. त्यातच रक्षाबंधन आणि गणेशोत्सवानिमित्ताने अनेकांनी आपापल्या पुढाºयांच्या छुप्या पाठिंब्यावर पत्र्याचे गाळे उभारुन कहर केल्याने सर्वत्र प्रशासनावरच टिकेची झोड उठून आरोप होऊ लागले होते. अखेर प्रशासनाने औपचारिकता म्हणून अतिक्रमण कारवाईचा देखावा केला. अतिक्रमणे हटवताना थेट कारवाई न करता व्यावसायिकांना आपले साहित्य आणि मालाचे नुकसान न करता हटविण्यात येऊन रस्ते मोकळे केल्यामुळे नागरिकांनी मोकळा श्वास घेतले. या कारवाईचे स्वागत केले आहे.वनकायद्यानुसार हा वनगुन्हा असल्याने संबंधितांना नोटिसा पाठवून, ते कोणत्या आधारे जमिनी कसत आहेत, यासंदर्भात कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले होते. ही कागदपत्रे सादर केली गेली नाहीत. त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे काळे यांनी स्पष्ट केले.या कारवाईत अतिक्रमण करून लावलेली उसाची पिके अक्षरश: गवतासारखी मुळासह उखडून टाकण्यात आली. 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीPoliceपोलिस