शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

अतिक्रमणे हटविली! बाभुळगावला वन विभागाने शेतीतील, तर राजगुरुनगरला रस्त्यातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 23:54 IST

जवळपास १२० वन परिक्षेत्र अधिकारी, कर्मचारी व राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी तैनात करून पुणे वन विभागाने सलग आठ तास कारवाई

बिजवडी : जवळपास १२० वन परिक्षेत्र अधिकारी, कर्मचारी व राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी तैनात करून पुणे वन विभागाने सलग आठ तास कारवाई करत १५ जेसीबी यंत्रांच्या साहाय्याने इंदापूर तालुक्यातील बाभुळगावच्या हद्दीतील ६२ एकर क्षेत्रातील शेतीचे अतिक्रमण काढून टाकले.

पुण्याचे सहायक वनसंरक्षक एम. बी. तेलंग, पुणे प्रादेशिकचे मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, सहायक वनसंरक्षक वैभव भालेकर यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली इंदापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे, पौडचे वनपरिक्षेत्र अधिकारी पोपट कापसे, बारामतीचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. सुपेकर, दौंडचे वनपरिक्षेत्र अधिकारी हजारे, इंदापूरचे वनपाल पी. डी. चौधरी, वनरक्षक शीतल बागल यांच्यासह इंदापूर, बारामती, दौंड, पौड व इतर भागांतील वनकर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला. या संदर्भात माहिती देताना इंदापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी सांगितले की, बाभुळगावच्या हद्दीत वेगवेगळ्या जमीन गट क्रमांकामध्ये वनविभागाचे १६७ एकर क्षेत्र आहे.तीन महिन्यांपूर्वी वनजमिनीचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये वनविभागाच्या एकूण क्षेत्रापैकी ६२ एकर जमिनीवर शेजारी असणाºया शेतकºयांनी अतिक्रमण केल्याचे या सर्वेक्षणात आढळून आले. अतिक्रमण हटवलेल्या ठिकाणी वनविभागाने हद्दीनिश्चित केल्या आहेत. तेथे संरक्षक भिंत अथवा कुंपण घालण्यात येणार आहे. आतमध्ये वृक्षलागवड करण्यात येणार आहे, अशी माहिती देऊन काळे यांनी वनक्षेत्रात अतिक्रमण केल्यास तो वनगुन्हा ठरत असल्याने, कोणीही अतिक्रमण करू नये,असे आवाहन केले आहे. पत्रकारांना राज्य राखीव दलाच्या कर्मचाºयांनी धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला.राजगुरुनगर : शहराच्या हद्दीतून जाणाºया शिरूर- भीमाशंकर रस्त्यावरील अतिक्रमणे नेहमीप्रमाणे मंगळवारी (दि.२८) पुन्हा एकदा औपचारिकता म्हणून हटविण्यात आली. या कारवाईत नायब तहसीलदार राजेंद्र जाधव, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, बाधंकाम विभागाचे अभियंता भास्कर क्षीरसागर, पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी आदिंसह नगरपरिषदेचे कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.खेड उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशानुसार गेल्या वर्षीच्या आक्टोबर महिन्यात शहरातील सर्व अतिक्रमणावर जोरदार हातोडा मारला होता. त्यानंतर पुन्हा वाडा रस्त्यावर व पाबळ रस्त्यावर आणि पुणे-नाशिक महामार्गावरील व्यवसायिकांनी आपली दुकाने थाटली. त्यातच रक्षाबंधन आणि गणेशोत्सवानिमित्ताने अनेकांनी आपापल्या पुढाºयांच्या छुप्या पाठिंब्यावर पत्र्याचे गाळे उभारुन कहर केल्याने सर्वत्र प्रशासनावरच टिकेची झोड उठून आरोप होऊ लागले होते. अखेर प्रशासनाने औपचारिकता म्हणून अतिक्रमण कारवाईचा देखावा केला. अतिक्रमणे हटवताना थेट कारवाई न करता व्यावसायिकांना आपले साहित्य आणि मालाचे नुकसान न करता हटविण्यात येऊन रस्ते मोकळे केल्यामुळे नागरिकांनी मोकळा श्वास घेतले. या कारवाईचे स्वागत केले आहे.वनकायद्यानुसार हा वनगुन्हा असल्याने संबंधितांना नोटिसा पाठवून, ते कोणत्या आधारे जमिनी कसत आहेत, यासंदर्भात कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले होते. ही कागदपत्रे सादर केली गेली नाहीत. त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे काळे यांनी स्पष्ट केले.या कारवाईत अतिक्रमण करून लावलेली उसाची पिके अक्षरश: गवतासारखी मुळासह उखडून टाकण्यात आली. 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीPoliceपोलिस