शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
3
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
4
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
5
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
6
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
7
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
8
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
9
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
10
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
11
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
12
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
13
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
14
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
15
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
16
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
17
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
18
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
19
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
20
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?

३० जानेवारीला एल्गार परिषद घेणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “धर्म, जाती याऐवजी अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या मुलभूत गरजांभोवती राजकारण फिरावे, या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “धर्म, जाती याऐवजी अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या मुलभूत गरजांभोवती राजकारण फिरावे, या हेतूने आम्ही काम करीत आहोत. हा संदेश देशभर जाण्यासाठी एल्गार परिषद आयोजित केली होती. परंतु, ब्राह्मण्यवाद्यांनी या परिषदेला बदनाम केले. आम्ही मागे हटणार नाही. येत्या ३० जानेवारीला एल्गार परिषद घेण्याचे आम्ही ठरवले आहे,” असे निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी सांगितले.

“पोलिसांनी परवानगी नाकारली तर आम्ही रस्त्यावर ही परिषद घेऊ,” असेही कोळसे पाटील म्हणाले. गुरुवारी (दि. ३१) पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे ३१ डिसेंबरला एल्गार परिषदेचे आयोजन केल मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे एल्गार परिषदेची नवी तारीख पत्रकार परीषदेत घोषीत करण्यात आली. लाल सेनेचे गणपत पिसे, बहुजन एकता परिषदेचे किशोर कांबळे यांच्यासह विविध संघटनांचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. एल्गार परिषदेला राज्यातील अडीचशे संघटनांचा पाठिंबा असल्याचे सांगण्यात आले.

कोळसे पाटील यांनी सांगितले की, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या मुलभूत गरजांपासून ब्राह्मण्यवादी आणि भांडवलवादी आम्हाला दूर ठेवतात. हे सर्वदूर जावे. भीमा-कोेरेगावच्या लढाईला दोनशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल २०१७ मध्ये एल्गार परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेचा आणि नक्षलवाद्यांचा काही संबंध नसतानाही एल्गार परिषदेला बदनाम करण्यात आले. एल्गार परिषदेतून देशभरात संदेश गेला होता. आमची विचाराशी बांधिलकी आहे. त्या हेतूनेच आता ३० जानेवारीला एल्गार परिषद होईल.

चौकट

कोळसे पाटील म्हणाले

-माझ्याविरुद्ध सर्च वॉरंट घेण्याचा प्रयत्न होता पण तो यशस्वी झाला नाही. ‘एनआयए’सह अनेक संस्थांनी तपासणी केली. त्यांच्या हाती काही लागले नाही.

-‘काँग्रेस-राष्ट्रवादी’नेच आपल्याला तीनदा अटक केली होती.

-एल्गार परिषदेनंतर फडणवीस सरकारने आपल्याला पोलीस सरंक्षण दिले होते. महाविकास आघाडीचे सरकार येताच ते सरंक्षण काढून घेतले गेले.

-सरकार कोणाचेही आले तरी सर्व सरकारी संस्था मनुवादी विचारांनीच ग्रासलेल्या आहेत.