शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

३० जानेवारीला एल्गार परिषद घेणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “धर्म, जाती याऐवजी अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या मुलभूत गरजांभोवती राजकारण फिरावे, या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “धर्म, जाती याऐवजी अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या मुलभूत गरजांभोवती राजकारण फिरावे, या हेतूने आम्ही काम करीत आहोत. हा संदेश देशभर जाण्यासाठी एल्गार परिषद आयोजित केली होती. परंतु, ब्राह्मण्यवाद्यांनी या परिषदेला बदनाम केले. आम्ही मागे हटणार नाही. येत्या ३० जानेवारीला एल्गार परिषद घेण्याचे आम्ही ठरवले आहे,” असे निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी सांगितले.

“पोलिसांनी परवानगी नाकारली तर आम्ही रस्त्यावर ही परिषद घेऊ,” असेही कोळसे पाटील म्हणाले. गुरुवारी (दि. ३१) पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे ३१ डिसेंबरला एल्गार परिषदेचे आयोजन केल मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे एल्गार परिषदेची नवी तारीख पत्रकार परीषदेत घोषीत करण्यात आली. लाल सेनेचे गणपत पिसे, बहुजन एकता परिषदेचे किशोर कांबळे यांच्यासह विविध संघटनांचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. एल्गार परिषदेला राज्यातील अडीचशे संघटनांचा पाठिंबा असल्याचे सांगण्यात आले.

कोळसे पाटील यांनी सांगितले की, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या मुलभूत गरजांपासून ब्राह्मण्यवादी आणि भांडवलवादी आम्हाला दूर ठेवतात. हे सर्वदूर जावे. भीमा-कोेरेगावच्या लढाईला दोनशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल २०१७ मध्ये एल्गार परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेचा आणि नक्षलवाद्यांचा काही संबंध नसतानाही एल्गार परिषदेला बदनाम करण्यात आले. एल्गार परिषदेतून देशभरात संदेश गेला होता. आमची विचाराशी बांधिलकी आहे. त्या हेतूनेच आता ३० जानेवारीला एल्गार परिषद होईल.

चौकट

कोळसे पाटील म्हणाले

-माझ्याविरुद्ध सर्च वॉरंट घेण्याचा प्रयत्न होता पण तो यशस्वी झाला नाही. ‘एनआयए’सह अनेक संस्थांनी तपासणी केली. त्यांच्या हाती काही लागले नाही.

-‘काँग्रेस-राष्ट्रवादी’नेच आपल्याला तीनदा अटक केली होती.

-एल्गार परिषदेनंतर फडणवीस सरकारने आपल्याला पोलीस सरंक्षण दिले होते. महाविकास आघाडीचे सरकार येताच ते सरंक्षण काढून घेतले गेले.

-सरकार कोणाचेही आले तरी सर्व सरकारी संस्था मनुवादी विचारांनीच ग्रासलेल्या आहेत.