शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाविरोधात एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 00:32 IST

इंदापूर, माळशिरस तालुक्यातील शेतकरी एकवटले : जनआंदोलन उभारण्याचा निर्धार

इंदापूर : कृष्णा खोऱ्यातील पाणी जोपर्यंत नीरा नदीपर्यंत येत नाही, तोपर्यंत नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाच्या कामास सुरुवात करू नये. नीरा नदीमधून भीमा नदीत पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नीरा नदीकाठच्या इंदापूर व माळशिरस तालुक्यातील शेतकºयांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांतील शेतकरी एकवटले आहेत. या प्रकल्पाच्या विरोधात जनआंदोलन उभारण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

यासंदर्भात, दोन्ही तालुक्यांतील शेतकºयांची नीरनिमगाव (ता. इंदापूर) याठिकाणी रविवारी ( दि. ११) प्रथम बैठक पार पडली. त्यानंतर अकलूज (जि. सोलापूर) येथे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या उपस्थित सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सभागृहात सोमवारी बैठक पार पडली. या वेळी मोहिते-पाटील यांनी दोन्ही तालुक्यांतील लोकप्रतिनिधी, शेतकºयांच्या उपस्थित आंदोलनाबाबत नियोजन बैठका घेण्यात येतील. या प्रकल्पामुळे दोन्ही तालुक्यांतील शेतकºयांच्या होणाºया नुकसानीबद्दल जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट घेऊन त्यांनाही याबाबत कल्पना देण्यात येणार आहे. सामंजस्याने यातून तोडगा न निघाल्यास प्रसंगी न्यायालयातदेखील दाद मागू, असे विजयसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले. नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून ८ टीएमसी पाणी, नीरा नदीमधून भीमा नदीत सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नीरा नदीकाठच्या इंदापूर व माळशिरस तालुक्यातील शेतकºयांचे नुकसान होणार आहे. कृष्णा खोºयातून नीरा नदीत जोपर्यंत पाणी येणार नाही, तोपर्यंत नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करू नये; अन्यथा त्या नदीजोड प्रकल्पाच्या विरोधात शेतकरी जनआंदोलन उभारणार असल्याचे नीरा नदी जल बचाव कृती समितीचे संयोजक दत्तात्रय घोगरे यांनी सांगितले.या वेळी माजी खासदार विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली, त्यामध्ये तर जल बचाव कृती समितीचे नवनाथ अहिवळे, हनुमंत शिंदे, कांतिलाल इंगवले, संजय रुपनवर, महादेव माने, संतोषस्वामी, ज्ञानदेव वावरे, शशिकांत चांगण आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.जलआयोगाचाही प्रकल्पाला विरोध...एका खोºयातून दुसºया खोºयात पाणी नेण्यास जलआयोगाने विरोध केल्यामुळे कृष्णा- नीरा जोड प्रकल्पाचे काम सुरू होण्यापूर्वीच थांबविण्यात आले. या माध्यमातून कृष्णा खोºयातून नीरा नदीत एकूण ५१ टीएमसी पाणी सोडण्यात येणार होते. त्यानंतर नीरा-भीमा बोगद्यातून भीमा नदीत ४५ टीएमसी पाणी सोडून तेथून मराठवाड्याला पाणी देण्यात येणार होते. सध्या कृष्णा-नीरा जोड प्रकल्पाच्या कामास सुरुवात झाली नाही, मात्र नीरा-भीमा जोड प्रकल्पाचे काम जोमात चालू असून, ते काम पूर्ण झाल्यानंतर, नीरा नदीतून भीमा नदीत पाणी सोडून, तेथून मराठवाड्याला पाणी देण्यात येणार आहे. त्यामुळे नीरा नदीत पाण्याची कमतरता भासून, इंदापूर व माळशिरस तालुक्यातील शेतकºयांना पाणी संकटाला सामोरे जावे लागण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांतील शेतकºयांचे मोठे नुकसान होणार आहे.आजी-माजी आमदारांचाही प्रकल्पास विरोधच्नीरा नदीत जोपर्यंत कृष्णा नदीचे पाणी येणार नाही, तोपर्यंत आम्ही नीरा नदीतून भीमा नदीतअजिबात पाणी सोडू देणार नाही, अशी भूमिका आमदार दत्तात्रय भरणे व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी घेतल्याने, येणारी विधानसभा पाणीप्रश्नावर होणार याची चर्चा सर्वत्ररंगली आहे.

टॅग्स :Vijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटीलPuneपुणेFarmerशेतकरी