शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाविरोधात एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 00:32 IST

इंदापूर, माळशिरस तालुक्यातील शेतकरी एकवटले : जनआंदोलन उभारण्याचा निर्धार

इंदापूर : कृष्णा खोऱ्यातील पाणी जोपर्यंत नीरा नदीपर्यंत येत नाही, तोपर्यंत नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाच्या कामास सुरुवात करू नये. नीरा नदीमधून भीमा नदीत पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नीरा नदीकाठच्या इंदापूर व माळशिरस तालुक्यातील शेतकºयांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांतील शेतकरी एकवटले आहेत. या प्रकल्पाच्या विरोधात जनआंदोलन उभारण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

यासंदर्भात, दोन्ही तालुक्यांतील शेतकºयांची नीरनिमगाव (ता. इंदापूर) याठिकाणी रविवारी ( दि. ११) प्रथम बैठक पार पडली. त्यानंतर अकलूज (जि. सोलापूर) येथे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या उपस्थित सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सभागृहात सोमवारी बैठक पार पडली. या वेळी मोहिते-पाटील यांनी दोन्ही तालुक्यांतील लोकप्रतिनिधी, शेतकºयांच्या उपस्थित आंदोलनाबाबत नियोजन बैठका घेण्यात येतील. या प्रकल्पामुळे दोन्ही तालुक्यांतील शेतकºयांच्या होणाºया नुकसानीबद्दल जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट घेऊन त्यांनाही याबाबत कल्पना देण्यात येणार आहे. सामंजस्याने यातून तोडगा न निघाल्यास प्रसंगी न्यायालयातदेखील दाद मागू, असे विजयसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले. नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून ८ टीएमसी पाणी, नीरा नदीमधून भीमा नदीत सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नीरा नदीकाठच्या इंदापूर व माळशिरस तालुक्यातील शेतकºयांचे नुकसान होणार आहे. कृष्णा खोºयातून नीरा नदीत जोपर्यंत पाणी येणार नाही, तोपर्यंत नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करू नये; अन्यथा त्या नदीजोड प्रकल्पाच्या विरोधात शेतकरी जनआंदोलन उभारणार असल्याचे नीरा नदी जल बचाव कृती समितीचे संयोजक दत्तात्रय घोगरे यांनी सांगितले.या वेळी माजी खासदार विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली, त्यामध्ये तर जल बचाव कृती समितीचे नवनाथ अहिवळे, हनुमंत शिंदे, कांतिलाल इंगवले, संजय रुपनवर, महादेव माने, संतोषस्वामी, ज्ञानदेव वावरे, शशिकांत चांगण आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.जलआयोगाचाही प्रकल्पाला विरोध...एका खोºयातून दुसºया खोºयात पाणी नेण्यास जलआयोगाने विरोध केल्यामुळे कृष्णा- नीरा जोड प्रकल्पाचे काम सुरू होण्यापूर्वीच थांबविण्यात आले. या माध्यमातून कृष्णा खोºयातून नीरा नदीत एकूण ५१ टीएमसी पाणी सोडण्यात येणार होते. त्यानंतर नीरा-भीमा बोगद्यातून भीमा नदीत ४५ टीएमसी पाणी सोडून तेथून मराठवाड्याला पाणी देण्यात येणार होते. सध्या कृष्णा-नीरा जोड प्रकल्पाच्या कामास सुरुवात झाली नाही, मात्र नीरा-भीमा जोड प्रकल्पाचे काम जोमात चालू असून, ते काम पूर्ण झाल्यानंतर, नीरा नदीतून भीमा नदीत पाणी सोडून, तेथून मराठवाड्याला पाणी देण्यात येणार आहे. त्यामुळे नीरा नदीत पाण्याची कमतरता भासून, इंदापूर व माळशिरस तालुक्यातील शेतकºयांना पाणी संकटाला सामोरे जावे लागण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांतील शेतकºयांचे मोठे नुकसान होणार आहे.आजी-माजी आमदारांचाही प्रकल्पास विरोधच्नीरा नदीत जोपर्यंत कृष्णा नदीचे पाणी येणार नाही, तोपर्यंत आम्ही नीरा नदीतून भीमा नदीतअजिबात पाणी सोडू देणार नाही, अशी भूमिका आमदार दत्तात्रय भरणे व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी घेतल्याने, येणारी विधानसभा पाणीप्रश्नावर होणार याची चर्चा सर्वत्ररंगली आहे.

टॅग्स :Vijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटीलPuneपुणेFarmerशेतकरी