शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाविरोधात एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 00:32 IST

इंदापूर, माळशिरस तालुक्यातील शेतकरी एकवटले : जनआंदोलन उभारण्याचा निर्धार

इंदापूर : कृष्णा खोऱ्यातील पाणी जोपर्यंत नीरा नदीपर्यंत येत नाही, तोपर्यंत नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाच्या कामास सुरुवात करू नये. नीरा नदीमधून भीमा नदीत पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नीरा नदीकाठच्या इंदापूर व माळशिरस तालुक्यातील शेतकºयांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांतील शेतकरी एकवटले आहेत. या प्रकल्पाच्या विरोधात जनआंदोलन उभारण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

यासंदर्भात, दोन्ही तालुक्यांतील शेतकºयांची नीरनिमगाव (ता. इंदापूर) याठिकाणी रविवारी ( दि. ११) प्रथम बैठक पार पडली. त्यानंतर अकलूज (जि. सोलापूर) येथे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या उपस्थित सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सभागृहात सोमवारी बैठक पार पडली. या वेळी मोहिते-पाटील यांनी दोन्ही तालुक्यांतील लोकप्रतिनिधी, शेतकºयांच्या उपस्थित आंदोलनाबाबत नियोजन बैठका घेण्यात येतील. या प्रकल्पामुळे दोन्ही तालुक्यांतील शेतकºयांच्या होणाºया नुकसानीबद्दल जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट घेऊन त्यांनाही याबाबत कल्पना देण्यात येणार आहे. सामंजस्याने यातून तोडगा न निघाल्यास प्रसंगी न्यायालयातदेखील दाद मागू, असे विजयसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले. नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून ८ टीएमसी पाणी, नीरा नदीमधून भीमा नदीत सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नीरा नदीकाठच्या इंदापूर व माळशिरस तालुक्यातील शेतकºयांचे नुकसान होणार आहे. कृष्णा खोºयातून नीरा नदीत जोपर्यंत पाणी येणार नाही, तोपर्यंत नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करू नये; अन्यथा त्या नदीजोड प्रकल्पाच्या विरोधात शेतकरी जनआंदोलन उभारणार असल्याचे नीरा नदी जल बचाव कृती समितीचे संयोजक दत्तात्रय घोगरे यांनी सांगितले.या वेळी माजी खासदार विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली, त्यामध्ये तर जल बचाव कृती समितीचे नवनाथ अहिवळे, हनुमंत शिंदे, कांतिलाल इंगवले, संजय रुपनवर, महादेव माने, संतोषस्वामी, ज्ञानदेव वावरे, शशिकांत चांगण आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.जलआयोगाचाही प्रकल्पाला विरोध...एका खोºयातून दुसºया खोºयात पाणी नेण्यास जलआयोगाने विरोध केल्यामुळे कृष्णा- नीरा जोड प्रकल्पाचे काम सुरू होण्यापूर्वीच थांबविण्यात आले. या माध्यमातून कृष्णा खोºयातून नीरा नदीत एकूण ५१ टीएमसी पाणी सोडण्यात येणार होते. त्यानंतर नीरा-भीमा बोगद्यातून भीमा नदीत ४५ टीएमसी पाणी सोडून तेथून मराठवाड्याला पाणी देण्यात येणार होते. सध्या कृष्णा-नीरा जोड प्रकल्पाच्या कामास सुरुवात झाली नाही, मात्र नीरा-भीमा जोड प्रकल्पाचे काम जोमात चालू असून, ते काम पूर्ण झाल्यानंतर, नीरा नदीतून भीमा नदीत पाणी सोडून, तेथून मराठवाड्याला पाणी देण्यात येणार आहे. त्यामुळे नीरा नदीत पाण्याची कमतरता भासून, इंदापूर व माळशिरस तालुक्यातील शेतकºयांना पाणी संकटाला सामोरे जावे लागण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांतील शेतकºयांचे मोठे नुकसान होणार आहे.आजी-माजी आमदारांचाही प्रकल्पास विरोधच्नीरा नदीत जोपर्यंत कृष्णा नदीचे पाणी येणार नाही, तोपर्यंत आम्ही नीरा नदीतून भीमा नदीतअजिबात पाणी सोडू देणार नाही, अशी भूमिका आमदार दत्तात्रय भरणे व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी घेतल्याने, येणारी विधानसभा पाणीप्रश्नावर होणार याची चर्चा सर्वत्ररंगली आहे.

टॅग्स :Vijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटीलPuneपुणेFarmerशेतकरी