शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

भारनियमनाविरोधात संताप!, विद्युतपंपांची सलग १६ तास वीज गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2017 6:41 AM

ऐन दिवाळीच्या तोंडावर भारनियमन सुरू झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच आॅक्टोबर हीटमध्ये सुरू असलेल्या भारनियमनामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.

शेलपिंपळगाव : खेड तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये विजेचा प्रश्न अतिशय गंभीर बनत चालला असून, विद्युतपंपाच्या विजेचे सलग १६ तासांहून अधिक काळ भारनियमन केले जात आहे. तसेच, भारनियमनाव्यतिरिक्त उपलब्ध असलेली वीजही वारंवार खंडित होत असल्याने विजेचा विषय शेतकºयांच्या दृष्टीने डोकेदुखीचा बनू लागला आहे. याविरोधात संतप्त झालेल्या शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व शेतकºयांनी भोसे येथील महावितरण कार्यालयाला टाळे ठोकले.खेड तालुक्याच्या पूर्व भागातील बहूळ, कोयाळी भानोबाची, मोहितेवाडी, शेलपिंपळगाव, दौंडकरवाडी, शेलगाव, साबळेवाडी, चिंचोशी, सिद्धेगव्हाण, गोलेगाव, वडगाव घेनंद, भोसे, नवीनगाव आदी गावांमध्ये मागील सात-आठ महिन्यांपासून विद्युत पंपाच्या विजेचे दिवसा १६ तास भारनियमन सुरू आहे. भारनियमन तसेच विजेच्या लपंडावाला बळी पडणारी ही गावे बारमाही पिकांच्या उत्पादनात अग्रेसर असून सलग होणाºया भारनियमनामुळे या गावांमधील रब्बी हंगामातील कांद्याच्या लागवडी तसेच अन्य पिकांच्या सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.भोसे येथे शुक्रवारी (दि. ७) शेतकरी संघटनेचे पदाधिकारी तसेच शेतकरी विजेच्या समस्या निवेदनाद्वारे मांडण्यासाठी गेले असता, कार्यालयातील अधिकाºयांनी पळ काढला. निवेदन स्वीकारण्याचे धाडस केले नाही. अखेर शेतकºयांनी आक्रमक भूमिका घेऊन कार्यालयाला टाळे ठोकून तीव्र भावना व्यक्त केल्या.या प्रसंगी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब दौंडकर, रोहिदास दौंडकर, सुभाष पवळे, उपसरपंच एकनाथ आवटे, रवींद्र आवटे, संदीप पोटवडे, वस्ताज दौंडकर, कांताराम लोणारी, बबनराव दौंडकर, दत्ता सोनवणे, कैलास आरगडे, रामदास आवटे आदींसह अन्य आंदोलक शेतकरी उपस्थित होते.अठरा तासांचे भारनियमन कमी करण्यासंदर्भात महावितरण कंपनीकडे शेतकरी वारंवार विनवणी करीत आहेत. मात्र, कंपनीकडून पूर्ण क्षमतेने वीज देण्यासंदर्भात कोणत्याही ठोस उपाययोजना आखल्या जात नसल्याने शेतकºयांच्या पदरी निराशा येत आहे. त्यामुळे ऐन रब्बी हंगामातील कांदालागवडीचे आव्हान शेतकºयांसमोर उभे राहिले आहे.

भारनियमनाविरोधात संताप!बारामती : ऐन दिवाळीच्या तोंडावर भारनियमन सुरू झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच आॅक्टोबर हीटमध्ये सुरू असलेल्या भारनियमनामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.बारामती शहरात किरकोळ भारनियमन सुरू आहे. बारामती शहर व एमआयडीसी परिसरात एकूण ८ वीजवाहिन्या आहेत. त्यांपैकी ७ वाहिन्या ए गटात व अवघी एक वाहिनी सी गटात आहे. त्यामुळे शहराला भारनियमनाचे जास्त चटके बसले नाहीत. शहरातील सी वाहिनीवरील केवळ थोड्या भागात सकाळी व दुपारी या दोन टप्प्यांत ४.४५ तास भारनियमन झाले. तर, उर्वरित शहर ए गटात असल्याने सकाळी ६ ते ७.३० या वेळेत केवळ दीड तास भारनियमन करावे लागले, अशी माहिती महावितरणच्या अधिकाºयांनी दिली.बारामती मंडलातील वाणिज्यिक व वितरण हानी जास्त असलेल्या वाहिन्यांवरील वीजग्राहकांना जास्त भारनियमनाचा फटका बसला. मंडलांतर्गत बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर व भोर या ६ तालुक्यांत ११२ वीजवाहिन्या आहेत. यात ए गटात ११, बी गटात ४, सी गटात १७, डी गटात १८, ई गटात २०, एफ गटात ८, जी-१ गटात ७, जी-२ गटात ६ व जी-३ गटात २१ वीजवाहिन्यांचा समावेश आहे. वेगवेगळ्या टप्प्यात ए गटात ३.१५ तास, बी- ४ तास, सी-४.४५ तास, डी-५.३० तास, ई-६.१५ तास, एफ-७ तास, जी-१ मध्ये ७.४५ तास, जी-२ मध्ये ८.३० तर जी-३ या गटात ९.१५ तास भारनियमन होते.वीज नसल्याने दुर्गम भाग चाचपडतोयभोर : शहरात व ग्रामीण भागात दररोज सकाळी २ तर सायंकाळी २ असे ४ तासांचे भारनियमन करण्यात येणार आहे. शिवाय दर तासाला अधुनमधुन वारंवार वीज गायब होत आहे. वीजपुरवठा कोणतीही पूर्वसूचना न देताच वारंवार खंडित होत होता.भोर शहरात सकाळी ९.३० ते ११.४५ व दुपारी ३.३० ते ६ वाजेपर्यंत भारनियमन तर ग्रामीण भागात सोमवार ते गुरुवार सकाळी ७ ते ९.३० तर दुपारी २.४५ ते ५, शुक्रवार ते रविवार सकाळी ९.३० ते ११.४५ व दुपारी ३.३० ते ६ या वेळात भारनियमन करण्यात येणार आहे.तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक गावे भोरपासून ६० ते ७० किमी अंतरावर असून सध्या पावसाचे दिवस आहेत. वादळी वाºयासह पावसामुळे झाडांची पडझड होऊन वीजवाहक तारा तुटतात. अनेक खांब वाकतात आणी वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. १० गावांना मिळून एकवायरमन आहे. अनेक गावांत पावसाळ्यात महिनामहिना वीजपुरवठा नसतो. तुटलेल्या तारा जोडणे, खांब उभे करणे, ही कामे तर कधीच वेळेवर होत नाहीत. त्यामुळे दुर्गम डोंगरी गावातील लोकांना रात्ररात्र अंधारातच काढावी लागते.

टॅग्स :Puneपुणे