शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

महाराजांच्या फोटोवर निवडणुका जिंकलात, मग आता अवमान का? अरविंद सावंत यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2022 13:37 IST

हिंमत असेल तर त्यांनी राज्यपालांना त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागायला लावावी

पुणे : भारतीय जनता पक्षाने छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र वापरून निवडणूक जिंकली. सत्ता मिळाल्यावर मात्र ते महाराजांचा अवमान स्वत: सहन करतात आणि आम्हालाही करायला लावतात. हिंमत असेल तर त्यांनी राज्यपालांना त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागायला लावावी, असे आव्हान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांनी दिले.

शुक्रवारी रात्री पुण्यात आलेल्या सावंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना भाजपवर टीका केली. राज्यपालांच्या विरोधात महाराष्ट्रात इतका मोठा रोष निर्माण होऊनही, आता विषय संपवायला हवा हे भाजपचे मत संताप आणणारे आहे. त्यांनी खरे तर राज्यपालांना तुम्ही महाराष्ट्राची जाहीर माफी मागा असे सांगायला हवे, असेही सावंत म्हणाले.सीमा प्रश्नावरही भाजप बोटचेपी भूमिका घेत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील मंत्र्यांना कर्नाटकात पाऊल टाकू नये म्हणतात. तरीही सरकार या विषयाला बगल देत आहे. सीमा प्रश्नावर लढणारा शिवसेना हा एकमेव पक्ष आहे, असेही सावंत म्हणाले.

देशाला महागाई, बेरोजगारी या प्रश्नांनी ग्रासले आहे. त्यावर कसलीही उपाययोजना केंद्र सरकारकडून केली जात नाही. या आघाडीवर आलेले अपयश लपवण्यासाठी ते कायम हिंदू-मुस्लिम वाद पुढे करतात, अशी टीकाही त्यांनी केली. शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेArvind Sawantअरविंद सावंतShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज