शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पाच राज्यांमध्ये निवडणुकांचा कौल भाजपाच्या विरोधात, जनताच BJP ला बाजूला करेल- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 09:20 IST

पवार म्हणाले की, जरांगे पाटील आणि सरकारमध्ये काही सुसंवाद झाल्याचे व सरकारने वेळ घेतल्याचे दिसते....

बारामती (पुणे) : सध्या निवडणुका लागलेल्या पाच राज्यांमध्ये भाजपाला लोक बाजूला करतील, असे चित्र आहे. सध्या बदल करण्याची भावना देशामध्ये आहे. देशातील ७० टक्के राज्यांमध्ये भाजप नाही. अन् जिथे या निवडणुका आहेत, तिथे निवडणुकांचा कौल भाजपाच्या विरोधात असल्याचे दिसते, असे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले.

पवार हे रविवारी बारामती (दि. २२) दाैऱ्यावर होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना पवार यांनी निवडणुकीवर भाष्य केले. तसेच ५१ टक्के मते घेऊन आम्ही बारामती जिंकणार, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे वारंवार म्हणत असतात. यावर पवारांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर पवार म्हणाले, बारामतीचे नाव घेतल्याशिवाय बातमी होत नाही. अखंड देशाला बारामतीचे महत्त्व माहिती आहे. म्हणूनच ते वारंवार बारामतीचे नाव घेतात, असे पवार म्हणाले. चंद्रशेखर बावनकुळे यांचे जनमानसात आणि पक्षात काय स्थान आहे, मला माहीत नाही. ज्या व्यक्तीला स्वत:चा पक्ष उमेदवारीसाठी योग्य समजत नाही, त्यांनी बारामतीची चर्चा करण्याचं काहीही कारण नाही. त्यांना भाजपनं तिकीट नाकारलं. त्यामुळे त्यांच्याबाबत काही बोलू नये, असे म्हणत पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना टोला लगावला.

प्रश्न सुटला तर मनापासून आनंद

पवार म्हणाले की, जरांगे पाटील आणि सरकारमध्ये काही सुसंवाद झाल्याचे व सरकारने वेळ घेतल्याचे दिसते. याबाबत सरकार काय करते आहे, याकडे आमचे लक्ष आहे. या दोन दिवसानंतर सरकारची भूमिका स्पष्ट होईल, असं दिसत आहे. यातून मार्ग निघाला, प्रश्न सुटला तर मनापासून आनंद होईल, असे पवार म्हणाले.

कंत्राटी पद्धतीने जागा भरणे योग्य नाही

कंत्राटी भरतीबाबत बोलताना पवार म्हणाले, मी मंत्रिमंडळाच्या बैठकीला जात नाही. जाण्याचे काय कारण नाही. महाराष्ट्रात दोन उपमुख्यमंत्री आहेत. एकाच मत तुम्ही सांगितलं. दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी आज त्याच्यावर टिप्पणी केली आहे. त्यात हे स्पष्ट दिसते की, ज्या वेळेला त्यासंबंधीचा निर्णय घेतला गेला, त्या निर्णयाच्या बैठकीला अनेक सहकारी हजर होते. ते आजही सरकारमध्ये आहेत. त्यावेळी त्यांची संमती होती. आज त्यासंबंधीचं भाष्य करत नाहीत. कंत्राटी कामगारांच्या संबंधीची अस्वस्थता कशाची होती. नोकरीमध्ये शाश्वती नाही. ठराविक काळासाठीच नोकरी आहे. दहा-अकरा महिन्यांची नोकरी म्हटल्यानंतर त्या व्यक्तीच्या जीवनात स्थैर्य नाही. त्यामुळे अशा पद्धतीने जागा भरणे योग्य नाही. हा आमचा आग्रह होता, असे शरद पवार म्हणाले.

शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नुकत्याच झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. याविषयी बोलताना शरद पवार यांनी म्हटले की, इंडिया आघाडीमध्ये जे-जे लोक सहभागी होतील, त्याचा आनंद आम्हा सर्वांना आहे. मात्र, कालची बैठक ही त्यासाठी नव्हती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या ‘प्रॉब्लेम ऑफ रुपीज’ या ग्रंथाला शंभर वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने यशवंतराव चव्हाण सेंटरला कार्यक्रम होता. या संदर्भासाठी आम्ही एकत्रित होतो, असे पवार यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारBJPभाजपा