शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

‘एक रहेंगे, सेफ रहेंगे’ - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पिंपरीत नारा

By विश्वास मोरे | Updated: November 17, 2024 20:25 IST

महाआघाडी म्हणजे महाअनाडी आहे. अशी टिका योगी आदित्यनाथ यांनी केली.

पिंपरी : भारताचा पाया सनातन आहे आणि सनातवर प्रहार हा महाविनाशाला आमंत्रण आहे. कलतक बटे तो कटे थे, पर अब बटेंगे नही, तो कटेंगे भी नही, एक रहेंगे, सेफ रहेंगे. छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला साथ द्या, महेश लांडगे यांना निवडून द्या, असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी येथे व्यक्त केले.

भोसरीतील गावजत्रा मैदानावर भोसरी विधानसभा मतदार संघातील भाजपा-शिवसेना- एनसीपी- आरपीआय- मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचारासाठी विक्रमी गर्दीची जाहीर सभा झाली. भोसरीने आज भगवे वादळ अनुभवले. 

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि सभेला सुरूवात झाली. 

व्यासपीठावर खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, निरीक्षक प्रदीपसिंह जडेजा, भाजपाचे शत्रुघ्न काटे, सुजाता पालांडे, माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, नितीन लांडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, मंगला कदम, ज्येष्ठ नेते वसंत लोंढे, हभप दत्तात्रय गायकवाड, राष्ट्रवादीच्या कविता आल्हाट, शिवसेनेचे संभाजी शिरसाट, आरपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे आदी उपस्थित होते.

२५ मिनिटांचे भाषण, अपूर्व उत्साह !

हिंदुत्व, समतावाद, देशाचा गौरव, महाराष्ट्राची अस्मिता, प्रखर राष्ट्रवाद या मुद्यांचा उहापोह योगींनी त्यांच्या २५ मिनिटांच्या भाषणांत घेतला. 'भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराज की जय, वंदे मातरम असा जयघोष करून योगी यांनी मनोगतास सुरुवात केली. त्यावेळी टाळ्यांचा कडकडाट झाला.

योगी आदित्यनाथ म्हणाले, ' महाराष्ट्र -पुणे ही भूमी छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे, लोकमान्य टिळक, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, वीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आहे. त्यांच्या विचारांचा सन्मान करणारी आहे. आजही देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा सन्मान केला जातो. त्यांच्याविषयी गौरवाने बोलले जाते. स्वातंत्र्यानंतर २०१४ पर्यंत देशामध्ये काँग्रेसची राजवट होती. त्या कालावधीत पाकिस्तान भारतात घुसखोरी करीत होते. दहशतवादाला खतपाणी घालत होते. हिंसक घटना घडत होत्या. त्याविषयी संसदेत आम्ही आवाज उठवत होतो. परंतु, संबंध बिघडतील या नावाखाली दहशतवादाला थोपविण्याचे धाडस कोणी केले नाही, याकडे लक्ष वेधून योगी म्हणाले, २०१४ नंतर नवीन भारत उदयास आला आहे. त्यामुळे पाकिस्तानही हिंमत होत नाही. ते छेडतील तर आम्ही सोडणार नाही. घुसून लढाई करू. ही जाणीव झाल्यामुळे हातात कटोरी घेऊन पाकिस्तान जगामध्ये भीक मागत फिरत आहे.

योगी आदित्यनाथ म्हणाले, 'काँग्रेस ही समस्या आहे आणि भाजप समाधान आहे. काँग्रेसच्या राजवटीत दहाव्या क्रमांकावर असलेली देशाची अर्थव्यवस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पाचव्या क्रमांकावर आणली आहे. ती पुढील दोन वर्षांत तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचे उद्दीष्ट आहे. पायाभूत सुविधा, दळणवळण, माहिती-तंत्रज्ञान, कनेक्टिव्हिटी या क्षेत्रात देश प्रगती करीत आहे. हा विकास संस्कृतीचा सन्मान करणारा आहे. अयोध्यामध्ये राम मंदिराची उभारणी झाल्यानंतर रामलल्लाची मूर्ती विराजमान झाली आहे. या दर्शनासाठी आणि पुढील वर्षी प्रयागराजला होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी मी भोसरीला, पुण्याला आमंत्रित करीत आहे.

महाआघाडी नव्हे महाअनाडी

महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे महायुतीचे सरकार आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या सब का साथ, सब का विकास संकल्पनेला बळ देत आहे. देशाच्या प्रगतीला हातभार लावत आहे, असे नमूद करून योगी आदित्यनाथ यांनी महाआघाडी म्हणजे महाअनाडी आहे. त्यांच्याकडे नितीमत्ता नाही. योग्य निर्णय घेण्याचे सामर्थ्य नाही, अशी टीका केली.

हम साथ रहेंगे

उमेदवार महेश लांडगे म्हणाले, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भोसरीमध्ये सभा घेतल्यामुळे माझ्यासारखा दुसरा भाग्यवान नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदुत्व नजरेसमोर ठेवून कार्यरत आहे, उपेक्षितांना आधार, महिलांना सुरक्षा, संत विचारांचा वारसा जतन करीत आहेत. त्यामुळे हम ना बटेंगे, ना कटेंगे, हम साथ रहेंगे.'

टॅग्स :Puneपुणेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४pimpri-acपिंपरीmahesh landgeमहेश लांडगेyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपा