शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पुण्यात हेल्मेटसक्तीची प्रभावी अंमलबजावणी सुरूच राहणार : मुख्यमंत्र्यांनी केला खुलासा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 19:47 IST

पुणे शहरात सुरु असलेली हेल्मेट सक्तीची प्रभावी अंमलबजावणी रद्द करण्यात आलेली बातमी चुकीची ठरली असून याबाबत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे.

पुणे : पुणे शहरात सुरु असलेली हेल्मेट सक्तीची प्रभावी अंमलबजावणी रद्द करण्यात आलेली माहिती चुकीची ठरली असून याबाबत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे. हेल्मेटसक्तीचा प्रभावी अंमलबजावणीला कोणतीही स्थगिती दिली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईत सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनानंतर माध्यमांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली आहे. 

   याबाबत अधिक की, गेल्या काही दिवसांपासून पुणे वाहतूक पोलिसांकडून हेल्मेट सक्तीच्या नियमाची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. यात अनेकदा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून चालकाला इ-चलन पाठ्वण्यासोबत चौकांमध्येही उभे राहून दंड आकाराला जात होता. त्या पार्श्वभूमीवर काही लोकप्रतिनिधींनी आता त्याला विरोध दर्शवला होता. शहराच्या हद्दीपेक्षा महामार्गावर हेल्मेटसक्तीची प्रभावी अंमलबजावणी करावी असे त्यांचे मत होते. यानुसार मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी प्रभावी करू नये असे आदेश दिल्याचे संदेश समाज माध्यमांवर फिरत होते. वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनीही असा कोणताही आदेश आल्याचे स्पष्ट केले होते. 

  अखेर खुद्द फडणवीस यांनी याविषयी माहिती दिली आहे. ते म्हणाले की,ज्याप्रमाणे नागपूर आणि मुंबईमध्ये हेल्मेटवर कारवाई केली जात आहे, त्याचप्रमाणे पुण्यातही तंत्रज्ञानाचा वापर करून सी सी टी व्हीच्या साहाय्याने कारवाई करावी . उगाच नागरिकांना वेळ वाया घालवत त्यांना वेठीस धरू नये. नियम मोडणाऱ्या नागरिकांना दंडाचे चलन आकारून त्यांच्या ऑफिस किंवा घरी पाठवावे. त्यामुळे पुणेकरांनीही हेल्मेट घालणे सक्तीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसgirish bapatगिरीष बापटMadhuri Misalमाधुरी मिसाळ