शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

RTE | आरटीई काेट्यातील आठवीनंतरच्या मुलांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात

By नम्रता फडणीस | Updated: April 21, 2023 19:36 IST

शुल्क भरणे पालकांना परवडेना; शिक्षण संस्थाचालक म्हणताहेत; शुल्क भरा अन्यथा शाळा सोडा

पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) वंचित घटकातील विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत मोफत शिक्षण दिले जाते. आता खासगी शाळांमध्ये प्रवेश घेतलेली मुले-मुली आठवी पास होऊन नववीमध्ये प्रवेश घेणार आहेत. या मुलांना शिक्षण अर्धवट सोडावे लागेल की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

खासगी शाळांचे शिक्षण शुल्क हे ४० ते ९० हजारांपर्यंतच्या घरात आहे. शिक्षण संस्थाचालकांनी शुल्क भरा, अन्यथा शाळा सोडा असे पालकांना सांगितले आहे. हे शुल्क भरणे पालकांना परवडणार नसल्याने एकतर शाळा सोडणे किंवा मराठी शाळेत प्रवेश घेण्याशिवाय पालकांना गत्यंतर नाही. या मुलांचे पुढे काय होणार, याचा विचार शासनाने केलाय का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पालकांना माेजावी लागणार माेठी रक्कम

यासंदर्भात माहिती देताना आप पालक युनियनचे समन्वयक मुकुंद किर्दत म्हणाले, २०१४-१५ च्या सुमारास आरटीई २५ टक्के राखीव जागेंतर्गत प्रवेश घेतलेली मुले आता आठवीपर्यंत पोहोचली आहेत. त्यांचे नववीचे शैक्षणिक वर्ष या महिन्यात सुरू होत आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार वंचित व ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे अशाच मुलांना खाजगी शाळांमध्ये मोफत शिक्षण मिळते. ६ ते १४ वयोगटाला म्हणजेच पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण हे मोफत असते आणि आता पुढे शिकायचं असेल, त्याच शाळेमध्ये शिकायचं असेल तर त्या शाळेचे शुल्क त्यांना भरावे लागणार आहे.

केंद्र सरकारने २०२१ मध्ये देशाचे नवीन शैक्षणिक धोरण मंजूर केले आहे. सर्व राज्यांवर या नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याचे बंधन आहे. त्यामुळे राज्य सरकारने नवीन शैक्षणिक धोरण आणि राज्याच्या शिक्षण विभागाने जुन्या अध्यादेशांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली एक समन्वय समिती स्थापन केली होती. या समितीने या शिक्षण हक्क २००९ मधील अपेक्षित बदल गृहीत धरून सूचना व शासनाने आदेश काढण्याची गरज होती. शासनाच्या या विलंबाचा फटका या मुलांना बसणार आहे. यामुळे तातडीने नववी ते दहावीपर्यंत त्याच शाळेत मोफत शिक्षण देण्याचे आदेश काढावेत, अशी जाहीर मागणी आप पालक युनियनने केली आहे.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाPuneपुणे