शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

शिक्षणाने जातीयव्यवस्था नष्ट होते : मा. म. देशमुख; शिवजयंतीनिमित्त पुण्यात समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 15:50 IST

तरुणांनी महापुरुषांचे विचार स्वीकारून विचारनिष्ठ झाले पाहिजे. असंघटित समाज हा बळी जाणारा समाज आहे. त्यांना संघटीत केले पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. मा. म. देशमुख यांनी केले.

ठळक मुद्देमा. म. देशमुख यांचा ‘शिवपुत्र छत्रपती शंभूराजे पुरस्कार’ देऊन सन्मानसुनिता पाटील या धाडसी महिलेस स्मशानसेवेबद्दल ‘महाराणी ताराराणी पुरस्कार’

पुणे : शिक्षणाने जातीव्यवस्था नष्ट करता येते. त्यामुळे बहुजनांनी शिक्षणाचे महत्व ओळखले पाहिजे. उत्सव जल्लोषात करण्यापेक्षा वैचारिक प्रबोधन केले पाहिजे. तरुणांनी महापुरुषांचे विचार स्वीकारून विचारनिष्ठ झाले पाहिजे. असंघटित समाज हा बळी जाणारा समाज आहे. त्यांना संघटीत केले पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. मा. म. देशमुख यांनी केले. आम्ही शिवरायांचे वारकरी, आम्हाला काय कोणाची भीती, समाजाच्या उन्नतीसाठी लेखणी घेतली हाती अशी व्याख्या करत शिवजयंतीनिमित्त शिवस्फूर्ती प्रतिष्ठान व शिवस्पर्श प्रकाशन आयोजित प्रकाशन व पुरस्कार समारंभात देशमुख बोलत होते.  यावेळी शिवकार्यात योगदान दिल्याबददल प्रा. मा. म. देशमुख यांना ‘शिवपुत्र छत्रपती शंभूराजे पुरस्कार’ देऊन ज्येष्ठ विचारवंत डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच नाशिकच्या सुनिता पाटील या धाडसी महिलेस स्मशानसेवेबद्दल ‘महाराणी ताराराणी पुरस्कार’ देण्यात आला. दोन्ही पुरस्कारार्थींना प्रत्येकी शाल, तुळशीचे रोप, सन्मानचिन्ह, ग्रंथ व र. रु. ५०००/- अशा स्वरूपात प्रदान करण्यात आले.देशमुख म्हणाले, की पद, पैसा आणि प्रसिद्धीच्या मागे लागू नका. जे काही करायचे आहे ते प्रामाणिकपणे समाजासाठी करा. समाज तुम्हाला उंचीवर नेऊन ठेवेल.डॉ. बाबा आढाव म्हणाले, की भारतीय संविधान हे हत्यार बनले आहे. देशापुढे संविधान टिकविण्याशिवाय पर्याय नाही. विचारांना कृतीचा आकार देण्याचे काम करावे. शिवस्फूर्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शैलजा मोळक यांनी प्रास्ताविक केले. प्रज्ञेश मोळक यांनी सूत्रसंचालन केले तर कैलास वडघुले यांनी आभार मानले. 

टॅग्स :Baba Adhavबाबा आढावShivjayantiशिवजयंतीPuneपुणे