शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

लेखणीची धार तलवारीच्या धारेपेक्षा अधिक ताकदवान - शशी थरूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2020 07:07 IST

सिंबायोसिस संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित आॅनलाइन ‘साहित्य महोत्सव २०२०’ च्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी लिहिलेल्या ‘थरूरसोरस’ या पुस्तकाचे प्रकाशन सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते झाले. (Shashi Tharoor)

पुणे : लेखणीची धार ही तलवारीच्या धारेपेक्षा अधिक ताकदवान असते. परंतु, देशात सध्याच्या काळात लेखणीतून आवाज उठवणाऱ्यांचा आवाज हा बळाचा वापर करून बंद केला जात आहे. आपले शब्द आणि कल्पनासामर्थ्य यांना शक्ती व अधिकार यांच्या सहाय्याने नियंत्रणात आणले जात आहे, यासारखे दुर्दैव नाही, अशी खंत खासदार डॉ. शशी थरूर यांनी व्यक्त केली.

सिंबायोसिस संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित आॅनलाइन ‘साहित्य महोत्सव २०२०’ च्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी लिहिलेल्या ‘थरूरसोरस’ या पुस्तकाचे प्रकाशन सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते झाले. यावेळी सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर व कुलगुरू डॉ. राजनी गुप्ते उपस्थित होते.

थरूर म्हणाले, लिबरल आर्टस् सारख्या विषयांमध्ये एखाद्या संकल्पनेकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन हा वेगवेगळा असू शकतो व त्यामुळेच एकाच गोष्टीचे विविध प्रकारे विश्लेषण करता येते. आजपर्यंत लिबरल आर्टस्सारख्या अभ्यासक्रमांकडे विद्यार्थी व पालक या सर्वांचेच दुर्लक्ष झालेले आहे. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये लिबरल आर्टस् सारख्या अभ्यासक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी काही विशेष तरतुदी केलेल्या आहेत.भाषा प्रांताला एकत्र जोडणारा धागा : अख्तरधर्माच्या आधारावर देश बनत नाही. धर्म हा दैनंदिन जीवनातला एक छोटासा भाग आहे. उर्वरित आयुष्य आपण धर्मनिरपेक्षतेनेच जगत असतो. त्यामुळे धर्माला जगभरच विनाकारण अधिक महत्त्व दिले गेले आहे. याउलट भाषा हा संपूर्ण प्रांताला एकत्र आणणारा धागा आहे, अशा शब्दात ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी भाषेचे महत्व उलगडले. 

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरcongressकाँग्रेस