शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
4
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
5
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
6
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
7
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
9
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
10
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
11
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
12
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
13
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
14
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
15
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
16
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
17
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
18
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
19
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
20
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण

लेखणीची धार तलवारीच्या धारेपेक्षा अधिक ताकदवान - शशी थरूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2020 07:07 IST

सिंबायोसिस संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित आॅनलाइन ‘साहित्य महोत्सव २०२०’ च्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी लिहिलेल्या ‘थरूरसोरस’ या पुस्तकाचे प्रकाशन सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते झाले. (Shashi Tharoor)

पुणे : लेखणीची धार ही तलवारीच्या धारेपेक्षा अधिक ताकदवान असते. परंतु, देशात सध्याच्या काळात लेखणीतून आवाज उठवणाऱ्यांचा आवाज हा बळाचा वापर करून बंद केला जात आहे. आपले शब्द आणि कल्पनासामर्थ्य यांना शक्ती व अधिकार यांच्या सहाय्याने नियंत्रणात आणले जात आहे, यासारखे दुर्दैव नाही, अशी खंत खासदार डॉ. शशी थरूर यांनी व्यक्त केली.

सिंबायोसिस संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित आॅनलाइन ‘साहित्य महोत्सव २०२०’ च्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी लिहिलेल्या ‘थरूरसोरस’ या पुस्तकाचे प्रकाशन सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते झाले. यावेळी सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर व कुलगुरू डॉ. राजनी गुप्ते उपस्थित होते.

थरूर म्हणाले, लिबरल आर्टस् सारख्या विषयांमध्ये एखाद्या संकल्पनेकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन हा वेगवेगळा असू शकतो व त्यामुळेच एकाच गोष्टीचे विविध प्रकारे विश्लेषण करता येते. आजपर्यंत लिबरल आर्टस्सारख्या अभ्यासक्रमांकडे विद्यार्थी व पालक या सर्वांचेच दुर्लक्ष झालेले आहे. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये लिबरल आर्टस् सारख्या अभ्यासक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी काही विशेष तरतुदी केलेल्या आहेत.भाषा प्रांताला एकत्र जोडणारा धागा : अख्तरधर्माच्या आधारावर देश बनत नाही. धर्म हा दैनंदिन जीवनातला एक छोटासा भाग आहे. उर्वरित आयुष्य आपण धर्मनिरपेक्षतेनेच जगत असतो. त्यामुळे धर्माला जगभरच विनाकारण अधिक महत्त्व दिले गेले आहे. याउलट भाषा हा संपूर्ण प्रांताला एकत्र आणणारा धागा आहे, अशा शब्दात ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी भाषेचे महत्व उलगडले. 

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरcongressकाँग्रेस