जिल्ह्यात ९३ गावांत ‘ई-बँकिंग’
By Admin | Updated: March 26, 2015 23:01 IST2015-03-26T23:01:15+5:302015-03-26T23:01:15+5:30
शासनाच्या महत्त्वाकांक्षी ई-पंचायत प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात ९३ ग्रामपंचायतींमध्ये बँकिंग व्यवहार सुरू असून, आतापर्यंत ८५ हजारांचे व्यवहार झाले आहेत.

जिल्ह्यात ९३ गावांत ‘ई-बँकिंग’
पुणे : शासनाच्या महत्त्वाकांक्षी ई-पंचायत प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात ९३ ग्रामपंचायतींमध्ये बँकिंग व्यवहार सुरू असून, आतापर्यंत ८५ हजारांचे व्यवहार झाले आहेत. १२0८ खातेदार जोडले गेले आहेत. जनधन योजनेंतर्गत ५ हजार ७८0 जणांची खाती उघडली आहेत.
शासनाच्या महत्त्वाकांक्षी ई-पंचायत प्रकल्पाद्वारे सर्व ग्रामपंचायती इंटरनेटने जोडून, सर्व कारभार संगणकीय आणि ‘आॅनलाइन’ करण्याचे काम गेल्या दोन वर्षांपूर्वी केंद्र व राज्य शासनाने संयुक्तपणे सुरूकेले. देशातील अडीच लाख ग्रामपंचायती ‘आॅप्टिकल फायबर केबल’ नेटवर्कने जोडण्यासाठी भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड ही कंपनी केंद्र शासनाने सुरु केली. तिच्याद्वारे ग्रामपंचायत स्तरापर्यंत उच्च क्षमता आणि उच्च दर्जाची ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्टिवीटी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र शासन, राज्य शासन आणि भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड कंपनी यांच्यात त्रिस्तरीय करार १२ एप्रिल २०१३ रोजी करण्यात आला होता. त्यामुळे ई-गव्हर्नन्स आणि ई-पंचायत प्रकल्पाच्या अंमलबजावणीस गतिमानता येणार आहे.
जिल्ह्यात ६४४ ग्रामपंचायतींमध्ये व्यवहार सुरू करण्याचा प्रयत्न आहे. सप्टेंबर २0१३ पासून केवळ ९३ ग्रापंचायतींत ही सुविधा सुरू करण्यात प्रशासनाला यश आले आहे. जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात सर्वाधिक १७ तर बारामतीत १६ ग्रामपंचायतींमध्ये बँकिंग व्यवहार सुरू आहेत. हवेलीत १५ तर खेडमध्ये १४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. वेल्हे तालुक्यात पक्त एका ग्रामपंचायतीत ही सुविधा सुरू आहे. मावळमध्ये अद्याप एकाही ग्रामपंचायतीत ही व्यवस्था नाही.
बँक आॅफ बडोदा, बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र व स्टेट बँक आॅफ इंडिया या बँकांचा समावेश आहे. ग्रामपंचायतींमध्ये संगणक समन्वयक शासनाने नियुक्त केलेले आहेत. त्यांच्यामार्फत ही खाती चालविली जातात. त्यातून ग्रामपंचायतीला ५० टक्के कमिशन मिळते; तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषदेलाही कमिशनचा
काही हिस्सा मिळतो.
(प्रतिनिधी)
तालुका सेंटरखातेदार
आंबेगाव ४ २१
बारामती १६ ४२
भोर२ ५२
दौैंड२ १९
हवेली१५ ३९
इंदापूर ३ ३१
जुन्नर १७ ४६
खेड५७ १४
मावळ0 १४
मुळशी३ ९
पुरंदर६ १४
शिरूर१0 ३४
वेल्हा१ १४
एकूण९३ ४१९
सध्या सर्व ठिकाणी ‘इंटरनेट कनेक्टिवीटी’ मिळत नसल्याने जिथे ती आहे, अशा ठिकाणी बँकिंग व्यवहार सुरूकरण्याला प्राधान्य दिले आहे. मात्र भविष्यात ब्रॉडबँडने सर्व ग्रामपंचायती जोडल्यावर सर्वत्र बँकसेवा सुरूकरता येईल,
- नितीन माने , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग)