शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

Pimpri Chinchwad | ऐन सणासुदीत जाधववाडीतील चौदा तास वीज गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 11:25 IST

जाधववाडी परिसरात चौदा तास वीज गायब...

जाधववाडी (पुणे) : ऐन दिवाळी सणासुदीच्या दिवसांत रावेत येथील जलवाहिनी फुटल्यामुळे इतर परिसरासहित जाधववाडी येथील पाणीपुरवठा दोन दिवस ठप्प झाला होता. त्यामुळे नागरिक हैराण असतानाही सकाळपासून वडाची तालीम जाधववाडी येथील विजेच्या ट्रान्सफॉर्मरजवळील असलेली भूमिगत वीज तार जळाली. त्यामुळे चौदा तास वीज गायब होती.

वडाची तालीम जाधववाडी येथील विजेचा ट्रान्सफॉर्मरजवळील असलेली भूमिगत वीज वाहिनी शनिवारी सकाळी खंडित झाली. त्यामुळे ७ वाजेपासून ते रात्री ९ वाजेपर्यंत दिवस भर परिसरात वीज गायब झाली होती. त्यामुळे नागरिकांना पाणीपुरवठा झाला नाही. वीज नसल्यामुळे घरून काम करणारे आयटी व इतर व्यावसायिकांना त्रास सहन करावा लागला. पाणी नसल्यामुळे आणि वीजही नसल्यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला.

नागरिकांनी महावितरण कार्यालयात सकाळपासून चौकशी करण्याचा प्रयत्न केला; परंतु तेथूनही वीज कधी सुरू होईल, याबाबत समाधानकारक उत्तरे मिळत नव्हती. त्यामुळे नागरिक दिवसभर विजेच्या प्रतीक्षेत होते. दुपारनंतर महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी आले. त्यांनी दुरुस्ती सुरू केली. रात्री नऊ वाजेदरम्यान तारा जोडून झाल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत झाला.

ऐन सणासुदीत गैरसोय

जाधववाडी परिसरातील नागरिकांना किती दिवस समस्यांना सामोरे जावे लागेल, याबाबत प्रश्न निर्माण होत आहे. परिसरात अनियमित पुरवठा होत आहे, तसेच रस्त्यात खड्डे पडले आहेत. त्यामुळे विविध समस्यांनी नागरिक त्रस्त झाले असून, प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.

टॅग्स :Puneपुणेelectricityवीजmahavitaranमहावितरण