शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

(डमी) ट्रॅव्हल्सचे चाक पुन्हा पंक्चर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:09 IST

पुणे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जवळपास नऊ महिने ट्रॅव्हल्स व्यवसाय थांबल्यानंतर हळूहळू रुळावर येऊ लागला होता. सुमारे ५० टक्के ...

पुणे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जवळपास नऊ महिने ट्रॅव्हल्स व्यवसाय थांबल्यानंतर हळूहळू रुळावर येऊ लागला होता. सुमारे ५० टक्के ट्रॅव्हल्स रस्त्यावर धावू लागल्या होत्या. मात्र, काही दिवसांपासून पुन्हा रुग्ण वाढल्याने ट्रॅव्हल्सला ब्रेक लागला असून, चाक पुन्हा पंक्चर झाल्यासारखी अवस्था झाली आहे.

लॉकडाऊन शिथिल होताच, सर्व सुरळीत होत आहे. त्यामुळे मूळ गावी गेलेले पुन्हा शहराकडे वळू लागले, तसेच परराज्यातून कामगार शहराकडे येत आहेत. यामुळे ट्रॅव्हल्सचा व्यवसाय पुन्हा पूर्वपदावर येत होता. मात्र, पुन्हा रुग्ण वाढू लागल्याने, तसेच लॉकडाऊनची भीती वाटू लागल्याने अनेक जण बाहेर पडण्यासाठी सावध पावले उचलू लागले आहेत, तसेच सुरू झालेल्या शाळा पुन्हा बंद झाल्याने प्रवाशांची संख्या घटली आहे. त्यामुळे पुन्हा ट्रॅव्हल्स व्यवसायिक चिंतेत पडले आहेत. वर्षभरात कोरोनामुळे या व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आर्थिक गणित जुळवणे अवघड होत आहे. आता कुठे बेरीज लागत असताना, मध्येच रुग्ण वाढू लागल्याने पुन्हा कोंडीत सापडण्याची भीती वाटू लागली आहे, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

* ३०० ते ३५०

कोरोना आधी रोज बाहेर जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची संख्या

५० ते ६०

सध्याची संख्या

-----------------

गाडी रुळावर येत होती पण .....

लॉकडाऊन शिथिल होताच प्रवाशी संख्या पूर्वपदावर येऊ लागली होती. अलीकडच्या काळात मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. गाडीचे हप्ते, कामगारांचा पगार या गोष्टींना तोंड द्यावे लागत आहे. तिकीट दरही कमी झाले आहेत. आता कुठे हिशोबाची गाडी रुळावर येत होती, पण गाड्याच थांबल्या असल्याने गणित बिघडू लागले आहे, असे व्यावसायिकांनी सांगितले.

-----------------

शेतीचे कामे, सरकारी कामे, गावच्या जत्रा या निमित्ताने प्रवाशांची संख्या मोठी असायची. मात्र, गावच्या जत्रा बंद असल्याने प्रवाशी संख्या घटली आहे. रुग्ण वाढल्याने प्रवास करण्याचे टाळले जात आहे.

- ईश्वर माळी, व्यावसायिक

----------------

ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळी गर्दी मोठ्या प्रमाणात होती. आता मात्र घटली आहे. ज्या जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्यात आले आहे. त्या भागात गाड्या पाठविणे बंद केले आहे, तसेच राज्यात गाड्या धावण्याचे प्रमाण तुलनेने कमीच आहे.

- राजू पटेल, व्यावसायिक

होळीमुळे बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या असली, तरी तुलनेने कमीच आहे. कोरोनामुळे या व्यवसायात मंदीच आहे. परराज्यातील प्रवाशांची मोठी संख्या आहे. लॉकडाऊन पडेल या भीतीने, तसेच होळीमुळे ते गावी जात आहेत. रायपूर, इंदोर, लखनऊ, कानपूर, राजस्थान, भिलवाडा या भागात जाणारे प्रवाशी अधिक आहेत.

- मोहित शहा, व्यावसायिक