शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

(डमी) ट्रॅव्हल्सचे चाक पुन्हा पंक्चर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:09 IST

पुणे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जवळपास नऊ महिने ट्रॅव्हल्स व्यवसाय थांबल्यानंतर हळूहळू रुळावर येऊ लागला होता. सुमारे ५० टक्के ...

पुणे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जवळपास नऊ महिने ट्रॅव्हल्स व्यवसाय थांबल्यानंतर हळूहळू रुळावर येऊ लागला होता. सुमारे ५० टक्के ट्रॅव्हल्स रस्त्यावर धावू लागल्या होत्या. मात्र, काही दिवसांपासून पुन्हा रुग्ण वाढल्याने ट्रॅव्हल्सला ब्रेक लागला असून, चाक पुन्हा पंक्चर झाल्यासारखी अवस्था झाली आहे.

लॉकडाऊन शिथिल होताच, सर्व सुरळीत होत आहे. त्यामुळे मूळ गावी गेलेले पुन्हा शहराकडे वळू लागले, तसेच परराज्यातून कामगार शहराकडे येत आहेत. यामुळे ट्रॅव्हल्सचा व्यवसाय पुन्हा पूर्वपदावर येत होता. मात्र, पुन्हा रुग्ण वाढू लागल्याने, तसेच लॉकडाऊनची भीती वाटू लागल्याने अनेक जण बाहेर पडण्यासाठी सावध पावले उचलू लागले आहेत, तसेच सुरू झालेल्या शाळा पुन्हा बंद झाल्याने प्रवाशांची संख्या घटली आहे. त्यामुळे पुन्हा ट्रॅव्हल्स व्यवसायिक चिंतेत पडले आहेत. वर्षभरात कोरोनामुळे या व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आर्थिक गणित जुळवणे अवघड होत आहे. आता कुठे बेरीज लागत असताना, मध्येच रुग्ण वाढू लागल्याने पुन्हा कोंडीत सापडण्याची भीती वाटू लागली आहे, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

* ३०० ते ३५०

कोरोना आधी रोज बाहेर जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची संख्या

५० ते ६०

सध्याची संख्या

-----------------

गाडी रुळावर येत होती पण .....

लॉकडाऊन शिथिल होताच प्रवाशी संख्या पूर्वपदावर येऊ लागली होती. अलीकडच्या काळात मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. गाडीचे हप्ते, कामगारांचा पगार या गोष्टींना तोंड द्यावे लागत आहे. तिकीट दरही कमी झाले आहेत. आता कुठे हिशोबाची गाडी रुळावर येत होती, पण गाड्याच थांबल्या असल्याने गणित बिघडू लागले आहे, असे व्यावसायिकांनी सांगितले.

-----------------

शेतीचे कामे, सरकारी कामे, गावच्या जत्रा या निमित्ताने प्रवाशांची संख्या मोठी असायची. मात्र, गावच्या जत्रा बंद असल्याने प्रवाशी संख्या घटली आहे. रुग्ण वाढल्याने प्रवास करण्याचे टाळले जात आहे.

- ईश्वर माळी, व्यावसायिक

----------------

ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळी गर्दी मोठ्या प्रमाणात होती. आता मात्र घटली आहे. ज्या जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्यात आले आहे. त्या भागात गाड्या पाठविणे बंद केले आहे, तसेच राज्यात गाड्या धावण्याचे प्रमाण तुलनेने कमीच आहे.

- राजू पटेल, व्यावसायिक

होळीमुळे बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या असली, तरी तुलनेने कमीच आहे. कोरोनामुळे या व्यवसायात मंदीच आहे. परराज्यातील प्रवाशांची मोठी संख्या आहे. लॉकडाऊन पडेल या भीतीने, तसेच होळीमुळे ते गावी जात आहेत. रायपूर, इंदोर, लखनऊ, कानपूर, राजस्थान, भिलवाडा या भागात जाणारे प्रवाशी अधिक आहेत.

- मोहित शहा, व्यावसायिक