शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

(डमी) ट्रॅव्हल्सचे चाक पुन्हा पंक्चर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:09 IST

पुणे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जवळपास नऊ महिने ट्रॅव्हल्स व्यवसाय थांबल्यानंतर हळूहळू रुळावर येऊ लागला होता. सुमारे ५० टक्के ...

पुणे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जवळपास नऊ महिने ट्रॅव्हल्स व्यवसाय थांबल्यानंतर हळूहळू रुळावर येऊ लागला होता. सुमारे ५० टक्के ट्रॅव्हल्स रस्त्यावर धावू लागल्या होत्या. मात्र, काही दिवसांपासून पुन्हा रुग्ण वाढल्याने ट्रॅव्हल्सला ब्रेक लागला असून, चाक पुन्हा पंक्चर झाल्यासारखी अवस्था झाली आहे.

लॉकडाऊन शिथिल होताच, सर्व सुरळीत होत आहे. त्यामुळे मूळ गावी गेलेले पुन्हा शहराकडे वळू लागले, तसेच परराज्यातून कामगार शहराकडे येत आहेत. यामुळे ट्रॅव्हल्सचा व्यवसाय पुन्हा पूर्वपदावर येत होता. मात्र, पुन्हा रुग्ण वाढू लागल्याने, तसेच लॉकडाऊनची भीती वाटू लागल्याने अनेक जण बाहेर पडण्यासाठी सावध पावले उचलू लागले आहेत, तसेच सुरू झालेल्या शाळा पुन्हा बंद झाल्याने प्रवाशांची संख्या घटली आहे. त्यामुळे पुन्हा ट्रॅव्हल्स व्यवसायिक चिंतेत पडले आहेत. वर्षभरात कोरोनामुळे या व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आर्थिक गणित जुळवणे अवघड होत आहे. आता कुठे बेरीज लागत असताना, मध्येच रुग्ण वाढू लागल्याने पुन्हा कोंडीत सापडण्याची भीती वाटू लागली आहे, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

* ३०० ते ३५०

कोरोना आधी रोज बाहेर जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची संख्या

५० ते ६०

सध्याची संख्या

-----------------

गाडी रुळावर येत होती पण .....

लॉकडाऊन शिथिल होताच प्रवाशी संख्या पूर्वपदावर येऊ लागली होती. अलीकडच्या काळात मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. गाडीचे हप्ते, कामगारांचा पगार या गोष्टींना तोंड द्यावे लागत आहे. तिकीट दरही कमी झाले आहेत. आता कुठे हिशोबाची गाडी रुळावर येत होती, पण गाड्याच थांबल्या असल्याने गणित बिघडू लागले आहे, असे व्यावसायिकांनी सांगितले.

-----------------

शेतीचे कामे, सरकारी कामे, गावच्या जत्रा या निमित्ताने प्रवाशांची संख्या मोठी असायची. मात्र, गावच्या जत्रा बंद असल्याने प्रवाशी संख्या घटली आहे. रुग्ण वाढल्याने प्रवास करण्याचे टाळले जात आहे.

- ईश्वर माळी, व्यावसायिक

----------------

ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळी गर्दी मोठ्या प्रमाणात होती. आता मात्र घटली आहे. ज्या जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्यात आले आहे. त्या भागात गाड्या पाठविणे बंद केले आहे, तसेच राज्यात गाड्या धावण्याचे प्रमाण तुलनेने कमीच आहे.

- राजू पटेल, व्यावसायिक

होळीमुळे बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या असली, तरी तुलनेने कमीच आहे. कोरोनामुळे या व्यवसायात मंदीच आहे. परराज्यातील प्रवाशांची मोठी संख्या आहे. लॉकडाऊन पडेल या भीतीने, तसेच होळीमुळे ते गावी जात आहेत. रायपूर, इंदोर, लखनऊ, कानपूर, राजस्थान, भिलवाडा या भागात जाणारे प्रवाशी अधिक आहेत.

- मोहित शहा, व्यावसायिक