शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

गोड बातमी; साखर होणार स्वस्त, कारखान्यांना बसणार फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 11:18 IST

केंद्र सरकारने गव्हापाठोपाठ साखर निर्यातीवर निर्बंध घातले...

पुणे : केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवर निर्बंध घातल्याने स्थानिक बाजारपेठेत साखर किमान दोन रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकीकडे ग्राहक सुखावणार असला तरी साखर कारखान्यांना याचा काही प्रमाणात तोटा सहन करावा लागणार आहे. दुसरीकडे देशातून सुमारे ९५ लाख टन साखर निर्यातीचे लक्ष्य होते. ती आता जास्तीत जास्त १०० लाख टन होईल. त्यामुळे निर्यातबंदीचा फारसा परिणाम होणार नाही, असे साखर आयु्क्तालयाचे म्हणणे आहे.

केंद्र सरकारने गव्हापाठोपाठ साखर निर्यातीवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे १०० लाख टन साखर निर्यातीचा कोटा संपल्यानंतर पुढील निर्यातीस केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. आतापर्यंत देशातून ८५ लाख टन साखर निर्यातीचे करार झाले आहेत. त्यापैकी ७५ लाख टन साखर यापू्र्वीच निर्यात झाली आहे. उर्वरित १० लाख टन साखरेचे करार पूर्ण होऊन ती जहाजांमध्ये पोहोचली आहे किंवा त्या स्थितीत आहे.

आतापर्यंत निर्यातीला फायदा

यंदा विक्रमी साखर निर्यात झाल्याने साखर कारखान्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगला दर मिळत होता. त्यातच साखर निर्यातीत भारताचा प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या ब्राझीलमध्येही साखर उत्पादन कमी झाल्याने भारताचा फायदा झाला. आता साखरेच्या निर्यातीवर निर्बंध घातल्याने साखर कारखान्यांना फटका बसणार आहे.

कारखान्यांना बसणार फटका

याबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळच्या दत्त साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक महादेव पाटील म्हणाले, “आता कुठे साखरेला चांगला दर मिळत होता. साखर निर्यातीवर निर्बंध आल्याने कारखान्यांचे विक्रीचे गणित बिघडेल. त्याचा थेट परिणाम स्थानिक बाजारपेठेत होईल. येत्या चार-पाच दिवसांत दर कमी होतील यात शंका नाही. सध्या कारखान्यांना ३५०० रुपये क्विंटल असा दर मिळत आहे. तो किमान दोनशे रुपयांनी कमी होईल. त्यामुळे ग्राहकांना दोन रुपयांनी साखर स्वस्त मिळेल.

अशी आहे आकडेवारी

भारतातून निर्यात झालेली साखर : ८५ लाख टन

आणखी निर्यातीची शक्यता : १५ लाख टन

आतापर्यंतच्या निर्यातीतील महाराष्ट्राचा वाटा : ५६ लाख टन

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखाने