शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

तिवरांची कत्तल करून खारजमिनीवर भराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 03:55 IST

चिंचणी-तारापूर बायपास रस्त्याच्या दुतर्फा खारटण जमिनीवर बेकायदेशीररित्या भराव घालून तिवरांची हानी केल्याच्या लोकमत च्या वृत्ताची दखल घेऊन वाणगाव पोलिसांनी चौघांवर पर्यावरण संरक्षण अधिनियमा द्वारे कारवाई केली असून आरोपीना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

- हितेन नाईकपालघर - चिंचणी-तारापूर बायपास रस्त्याच्या दुतर्फा खारटण जमिनीवर बेकायदेशीररित्या भराव घालून तिवरांची हानी केल्याच्या लोकमत च्या वृत्ताची दखल घेऊन वाणगाव पोलिसांनी चौघांवर पर्यावरण संरक्षण अधिनियमा द्वारे कारवाई केली असून आरोपीना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.जिल्ह्यात शासकीय गुरेचरण जमिनीवर सध्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असून मोठमोठ्या इमारती उभ्या रहात आहेत.तर पालघर,सफाळे, केळवे, माहीम, डहाणू, आदी भागातील किनारपट्टीवरील भागात अनेक कोळंबी प्रकल्प व इतर बाबीसाठी खारटण जमिनीवरील तिवरांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात आहे. महसूल विभागाच्या आशीर्वादाने ही तिवरांची कत्तल राजरोसपणे सुरू असल्याच्या तक्र ारी पुढे येत आहेत. तारापूर-चिंचणी रस्त्यावरील दुतर्फा असलेल्या खारटण जमिनीवर भराव घालून,तिवरांची नासधूस करीत बेकायदेशीररित्या भंगाराची आण ि इतर बांधकामे उभारली जात असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या होत्या. ७ जून रोजी लोकमतने तिवरांच्या कत्तली बाबतचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर डहाणू चे तहसीलदार राहुल सारंग यांनी दखल घेतली. चिंचणी चे मंडळ अधिकारी किरण राठोड ह्यांच्या तक्र ारी नंतर चिंचणी येथील गट क्र मांक २३८८ मधील ०.५३.२० जमिनीवर उगवलेल्या तिवरांंना नुकसान पोहचेल हे माहीत असतांनाही भराव घालणारे आरोपी अश्विन रतीलाल पारेख, प्रविण र.पारेख, रमीला कि. पारेख, सुभाष र.पारेख सर्व राहणार कुरगाव ह्यांच्या विरोधात पर्यावरण संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला. अजूनही पोलिसांनी आरोपीना अटक केली नसून पुढील तपास सुरू आहे.मंडळ अधिका-यावर कारवाई करा-मागणीया बायपास रस्त्याच्या कडेला,खाडी नजीक मोठ्या प्रमाणात तिवरांची कत्तल होत असतांना त्याकडे डोळेझाक करणारे मंडळ अधिकारी किरण राठोड यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. परंतु अद्यापही ती प्रशासनाने दुर्लक्षितच ठेवली आहे.

टॅग्स :environmentवातावरणVasai Virarवसई विरार