शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

डिंभेच्या आवर्तनामुळे पिकांना मिळाले जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 01:59 IST

डिंंभे धरणाच्या डाव्या कालव्यातून घोड शाखेला आवर्तन सोडल्याने तालुक्याच्या पूर्व भागातील लौकी, थोरांदळे, जाधववाडी, रांजणी, नागापूर, मांजरवाडी या भागांतील पिकांना जीवदान मिळाले आहे. पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्या आहेत.

मंचर - डिंंभे धरणाच्या डाव्या कालव्यातून घोड शाखेला आवर्तन सोडल्याने तालुक्याच्या पूर्व भागातील लौकी, थोरांदळे, जाधववाडी, रांजणी, नागापूर, मांजरवाडी या भागांतील पिकांना जीवदान मिळाले आहे. पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्या आहेत.यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने पाणीटंचाईची धग जाणवत आहे. मार्च महिन्यात कडक ऊन पडले असून, अनेक भागांत पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. हिरवा चारा उपलब्ध नसल्याने जनावरांच्या खाद्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणीटंचाईची ही परिस्थिती तालुक्याच्या पूर्व भागात प्रामुख्याने जाणवत आहे. आंबेगाव तालुक्यासाठी डिंंभे धरण हे वरदान ठरले आहे. डाव्या व उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात आल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. लौकी, थोरांदळे, जाधववाडी, रांजणी, भराडी, नागापूर व जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी या गावांसाठी डिंंभेच्या घोड शाखेला पाणी सोडण्याची आग्रही मागणी शेतकऱ्यांनी केली होती. लौकी येथील ग्रामपंचायतीमार्फत पाणीपुरवठा योजना राबविली आहे. त्यासाठी दीड महिना पुरेल एवढा पाणीसाठा झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. घोड शाखेला आवर्तन सोडल्याने अनेक गावच्या पाणीपुरवठा योजना सुरळीत सुरू असून, त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थ समाधान व्यक्त करीत आहेत, अशी माहिती लौकीचे सरपंच संदेश थोरात, गजाबा थोरात, शेतकरी संतोष थोरात यांनी दिली आहे.डिंंभे धरणातून डाव्या कालव्याच्या घोड शाखेला कालव्यातून १०० क्युसेक्सने पाणी सुरू आहे.हा कालवा १० किमी लांबीचा असून परिसरातील १० गावांना त्याचा फायदा झाला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना जीवदान मिळाले आहे.सध्या शेतामध्ये उन्हाळी बाजरी, कांदा, मका, तसेच ऊस पीक असून त्याला फायदा होणार आहे.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणी