शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

डिंभेच्या आवर्तनामुळे पिकांना मिळाले जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 01:59 IST

डिंंभे धरणाच्या डाव्या कालव्यातून घोड शाखेला आवर्तन सोडल्याने तालुक्याच्या पूर्व भागातील लौकी, थोरांदळे, जाधववाडी, रांजणी, नागापूर, मांजरवाडी या भागांतील पिकांना जीवदान मिळाले आहे. पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्या आहेत.

मंचर - डिंंभे धरणाच्या डाव्या कालव्यातून घोड शाखेला आवर्तन सोडल्याने तालुक्याच्या पूर्व भागातील लौकी, थोरांदळे, जाधववाडी, रांजणी, नागापूर, मांजरवाडी या भागांतील पिकांना जीवदान मिळाले आहे. पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्या आहेत.यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने पाणीटंचाईची धग जाणवत आहे. मार्च महिन्यात कडक ऊन पडले असून, अनेक भागांत पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. हिरवा चारा उपलब्ध नसल्याने जनावरांच्या खाद्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणीटंचाईची ही परिस्थिती तालुक्याच्या पूर्व भागात प्रामुख्याने जाणवत आहे. आंबेगाव तालुक्यासाठी डिंंभे धरण हे वरदान ठरले आहे. डाव्या व उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात आल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. लौकी, थोरांदळे, जाधववाडी, रांजणी, भराडी, नागापूर व जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी या गावांसाठी डिंंभेच्या घोड शाखेला पाणी सोडण्याची आग्रही मागणी शेतकऱ्यांनी केली होती. लौकी येथील ग्रामपंचायतीमार्फत पाणीपुरवठा योजना राबविली आहे. त्यासाठी दीड महिना पुरेल एवढा पाणीसाठा झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. घोड शाखेला आवर्तन सोडल्याने अनेक गावच्या पाणीपुरवठा योजना सुरळीत सुरू असून, त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थ समाधान व्यक्त करीत आहेत, अशी माहिती लौकीचे सरपंच संदेश थोरात, गजाबा थोरात, शेतकरी संतोष थोरात यांनी दिली आहे.डिंंभे धरणातून डाव्या कालव्याच्या घोड शाखेला कालव्यातून १०० क्युसेक्सने पाणी सुरू आहे.हा कालवा १० किमी लांबीचा असून परिसरातील १० गावांना त्याचा फायदा झाला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना जीवदान मिळाले आहे.सध्या शेतामध्ये उन्हाळी बाजरी, कांदा, मका, तसेच ऊस पीक असून त्याला फायदा होणार आहे.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणी