शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

निधी नसल्याने बाजार समित्यांना निवडणुक नको  : १२ समित्यांचे पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 14:44 IST

महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरणाने दिलेल्या आदेशानुसार राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत बाजार समित्यांच्या निवडणुका घेण्याची प्रक्रिया राबविली जात आहे.

ठळक मुद्देएका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक घेण्यासाठी सुमारे १ ते १.५ कोटी रुपये खर्च अपेक्षित निवडणूकांसाठी लागणारा निधी शेतकरी वर्गाकडूनच वसूल करावा लागणार

पुणे: राज्य शासनाने कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांबाबत नवीन कायदा केला असला तरी राज्यातील ५१ पैकी १२ बाजार समित्यांनी निधी आभावी निवडणुक घेण्याबाबत असमर्थता दर्शविली आहे. निवडणुकीसाठी लागणारा खर्च बाजार समितीच्या घटकांवर पडणार असल्याने निवडणूक न घेणा-या बाजार समित्यांच्या संख्येत वाढ होऊ शकते,अशी शक्यता सहकार विभागाच्या अधिका-यांकडून व्यक्त केली जात आहे.महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरणाने दिलेल्या आदेशानुसार राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत बाजार समित्यांच्या निवडणुका घेण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. जिल्हाधिका-यांकडे या निवडणुकांची जबाबदारी देण्यात आली आहे. बाजार क्षेत्रातील शेतकरी हा बाजार समितीच्या निवडणुकांसाठी मतदार असणार आहे. त्यासाठी संबंधित शेतक-याच्या नावे १० गुंठ्यांपेक्षा जास्त जमिन असणे बंधनकारक आहे. बाजार समित्यांचा मतदार कोण असेल ? याबाबत गोंधळ निर्माण झाला होता. मात्र,उशिरा का होईना सोलापूर,नाशिक,पुणे आदी बाजार समित्यांच्या निवडणूकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी संबंधित बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतक-यांची प्राथमिक मतदार यादी तयार केली जात आहे. मात्र, बाजार समित्यांच्या निवडणूकीसाठी लागणारा खर्च मोठा आहे. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या दूर्बल असलेल्या तब्बल १२ बाजार समित्यांनी निवडणूक घेण्याबाबत असमर्थ असल्याचे पत्र निवडणुक प्राधिकरणाला दिले आहे.राज्यातील लहानात लहान एका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक घेण्यासाठी सुमारे १ ते १.५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. परंतु,ब-याच बाजार समित्या दिवाळखोरीत निघाल्या आहेत.परिणामी त्यांना केवळ निवडणुकीसाठी एक कोटी रुपयांचा खर्च परवडणारा नाही. पुण्यासह राज्यातील काही बाजार समित्यांचा कारभार हा प्रशासकीय मंडळांमार्फत सुरू आहे. मात्र, प्रशासकीय मंडळाचा कार्यकाळ संपल्यानंतरही बाजार समित्यांच्या निवडणुका होत नाहीत. परंतु, नवीन कायद्याची अंमलबजावणी सुरू झाल्याने बाजार समित्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया राबवली जात आहे. निवडणूकांसाठी लागणारा निधी शेतकरी वर्गाकडूनच वसूल करावा लागणार आहे. त्यामुळे बाजार समित्यांच्या निवडणूका सहजपणे होतील का? याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.------------------------निवडणुकीचा खर्च संबंधित बाजार समित्यांनाच करावा लागणार आहे. मात्र,राज्यातील १२ बाजार समित्यांनी निधी नसल्याने निवडणुक घेण्याबाबत असमर्थता दर्शविली आहे. तसेच याबाबतचे लेखी पत्र राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाला दिले आहे.- मधुकर चौधरी,आयुक्त,राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीElectionनिवडणूक