शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

'स्वायत्त संस्थांमधील हस्तक्षेपामुळे देश अधोगतीकडे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2018 00:39 IST

माजी कृषिमंत्री शरद पवार यांची सरकारवर टीका : डॉ. मणिभाई देसाई सहकारी पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षाची सांगता

उरुळी कांचन : ‘‘सत्ताधारी राजकारणी ज्या वेळी आरबीआय, सीबीआय, न्यायव्यवस्था यासारख्या स्वायत्त संस्थांत हस्तक्षेप करतात, तेव्हा त्या संस्थांची स्वायत्तता धोक्यात येते. यामुळे देश अधोगतीकडे जातो, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.उरुळी कांचन येथील डॉ. मणिभाई देसाई सहकारी पतसंस्थेच्या रौप्य्महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात मुख्य अतिथी म्हणून माजी कृषिमंत्री शरद पवार उपस्थित होते, त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे हे होते.

याप्रसंगी आमदार बाबूराव पाचर्णे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, माजी आमदार अशोक पवार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, चंद्रराव तावरे, एन. जी. हेगडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, विजय कोलते, देविदास भन्साळी, जिल्हा उपनिबंधक बी. टी. लावंड, संस्थेचे माजी मानद सचिव अनिलकुमार शितोळे, संस्थेचे उपाध्यक्ष रामदास चौधरी, संचालक शरद वनारसे, कांतिलाल चौधरी, भाऊसाहेब कांचन, संजय कांचन, खेमचंद पुरुषवाणी, बाळासाहेब कांचन, सुभाष धुकटे, प्रकाश जगताप, जनार्दन गोते, चंद्रकांत लोणारी, माया शितोळे, सारिका काळभोर व संस्थेचे मुख्य व्यवस्थापक लक्ष्मण वाल्हेकर, अजय पवार, ऋषिकेश भोसले आदींसह अनेक मान्यवर, सभासद उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘सहकारी संस्थांकडे बघण्याचा सरकारचा व त्यांच्या अधिकाऱ्यांचा दृष्टिकोन बदलल्याने आज सहकारातील सर्वसामान्य सभासदाला त्रास होतोय. हा त्रास थांबणे गरजेचे आहे. लोकशाहीमध्ये स्वायत्त संस्थांची जपणूक करणे आणि त्यांना महत्त्व देणे हे अत्यंत महत्त्वाचे काम सरकारचे आहे. परंतु, आज सरकार या संस्थांचे अस्तित्व संपविण्याच्या मागे लागले आहे. नोटाबंदी हा निर्णय जनतेने काळा पैसा नष्ट होईल किंवा बाहेर येईल म्हणून स्वीकारला; पण आरबीआयच्या अहवालावरून दिसते, की जेवढ्या नोटा सरकारने जाहीर केल्या तेवढ्याच परत आल्या. यावरून काळा पैसा सापडला नाही, हे सिद्ध झाले. काळा पैसा नेमका कोणाकडे आहे, हेच सरकारला कळाले नाही. धनदांडग्यांचा काळा पैसा वाढविण्यासाठी सरकार काम करतेय का, अशी शंका येते.’’राष्ट्रीयीकृत बँकांत टायवाल्याला सन्मान, तर आदिवासीला अपमान अशा प्रकारची वागणूक दिली जाते, ही बाब अतिशय गंभीर आहे. सहकार चळवळीत नेतृत्व चांगले आणि पारदर्शी असेल, तर संस्थेची प्रगती होते; पण चमत्कारिक नेतृत्व आले तर सोन्यासारखी संस्था बरबाद होते, असे घणाघाती प्रतिपादन पवार यांनी केले.भारत सरकारच्या अखत्यारीतील आयकर विभाग देशभरात सर्वांना समान न्याय द्यायचे काम करीत नाही, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे फक्त पुणे जिल्ह्यातील सहकारी संस्थांना आयकर खात्याने कलम ८० पी व २६९ एसएसच्या अन्वये नोटिसा पाठवून आयकर भरण्यासाठी आणलेले दडपण व केलेली सक्ती अन्यायकारक असून त्याविरुद्ध लोकसभेतच आवाज उठविणार आहे. महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांमध्ये देशातील ५० टक्के सहकारी संस्थांचे जाळे पसरलेले असून, त्या माध्यमातून या दोन्ही राज्यांनी चांगली प्रगती केलेली आहे; पण हे सरकार सहकार मोडीत काढण्याचे काम करतेय. जनतेने वेळीच सावध होऊन याविरुद्ध आवाज उठविला पाहिजे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारBaramatiबारामतीPuneपुणे