शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

उरूळी कांचन येथे पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला म्हणून टळला अनर्थ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 15:15 IST

मराठा समाजाच्या युवा आंदोलनकर्त्यांनी मोर्चा काढत महात्मा गांधी विद्यालय रस्त्यावरील व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन केले.याचदरम्यान, आंदोलक आणि व्यापाऱ्यांत बाचाबाची व मारहाणीचा प्रकार घडल्याचे समोर आले.

ठळक मुद्देमराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान व्यापारी आणि काही आंदोलकर्त्यांत बाचाबाची होऊन या वादाचे पर्यावसन मारहाणीत झाल्याने तणाव निर्माण पोलिसांची तत्काळ घटनास्थळी धाव घेत आंदोलकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न

उरूळी कांचन : मराठा आरक्षणाच्या मागणी संदर्भात सकल मराठा समाजातर्फे सोमवारी (३०जुलै) हवेली तालुका बंदचे आवाहन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान येथे आंदोलनकर्ते व व्यापारी यांच्यात बाचाबाची व नंतर मारहाण झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला आहे. पण या वादाला वेगळीच किनार असल्याची नागरिकांमधील दबक्या आवाजातील चर्चेची पोलिसांनी नोंद घेतली असून त्या दिशेने तपास सुरू केला आहे.त्यात दोषींवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे असे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांनी सांगितले.    दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या मंगळवार (दि.२४ ) रोजीच्या महाराष्ट्र राज्य बंदच्या आंदोलनास उरुळी कांचन मधील व्यापाऱ्यांनी पाठिंबा देऊन बंद पाळला होता. त्यामुळे आज पुन्हा बंद पाळण्याबाबत व्यापारी वर्गात द्विधा मनस्थिती होती. त्यानुसार, सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास मराठा समाजाच्या युवा आंदोलनकर्त्यांनी मोर्चा काढत महात्मा गांधी विद्यालय रस्त्यावरील व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन केले.याचदरम्यान, आंदोलक आणि व्यापाऱ्यांत बाचाबाची व मारहाणीचा प्रकार घडल्याचे समोर आले. पोलिसांनी तातडीने प्रकरण शांततेने हाताळण्याचा प्रयत्न केला आणि अतिरिक्त कुमक मागवून उरुळी कांचन शहरात बंदोबस्तासाठी तैनात केला. मराठा आरक्षण मागणीसंदर्भात सकल मराठा संघटनांनी हवेली तालुका बंदच्या आवाहनास प्रतिसाद देत शहरातील आश्रमरस्ता व गावठाण परिसरात व्यापाऱ्यांकडून स्वत:हून दुकाने बंद ठेवली होती. परंतु, महात्मा गांधी विद्यालय रस्त्यावरील काही व्यापाऱ्यांनी व्यवहार सुरळीत सुरू ठेवले होते. मराठा संघटनांच्या सुमारे पन्नासहून अधिक आंदोलकर्त्यांनी विद्यालय येथे मोर्चा नेत व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन केले. या बंदच्या आवाहनास काहींनी विरोध दर्शविला. यादरम्यान, व्यापारी आणि काही आंदोलकर्त्यांत बाचाबाची होऊन या वादाचे पर्यावसन मारहाणीत झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला.त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आंदोलकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने आंदोलकांची राम मंदिरात बैठक घेऊन बंद शांततेत पार पाडण्याची सूचना केली. त्यानंतर आंदोलकांनी शांततेत पुणे - सोलापूर महामार्गावर तळवाडी चौकात ठिय्या आंदोलन करत निषेध सभा घेऊन बंदच्या आवाहनात सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच मंडलअधिकारी व सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदन देत आरक्षण मिळाले पाहिजेचा नारा दिला व ते जोपर्यंत मिळत नाही तो पर्यंत ते चालूच राहील, असा इशारा दिला.लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी परिस्थितीची पाहणी करत सुरक्षिततेचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. 

टॅग्स :uruli kanchanउरुळी कांचनmarathaमराठाMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाPoliceपोलिस