शहरं
Join us  
Trending Stories
1
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
2
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
3
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
4
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
5
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
6
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
7
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
8
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
9
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
10
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
11
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
12
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
13
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
14
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
15
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
16
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
17
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
18
भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
19
Travel : अवघ्या ३ दिवसात फिरता येईल 'हा' सुंदर देश; भारताचे १०००० होतील तब्बल ५८०००! फिरण्यासाठी बेस्ट
20
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

उरूळी कांचन येथे पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला म्हणून टळला अनर्थ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 15:15 IST

मराठा समाजाच्या युवा आंदोलनकर्त्यांनी मोर्चा काढत महात्मा गांधी विद्यालय रस्त्यावरील व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन केले.याचदरम्यान, आंदोलक आणि व्यापाऱ्यांत बाचाबाची व मारहाणीचा प्रकार घडल्याचे समोर आले.

ठळक मुद्देमराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान व्यापारी आणि काही आंदोलकर्त्यांत बाचाबाची होऊन या वादाचे पर्यावसन मारहाणीत झाल्याने तणाव निर्माण पोलिसांची तत्काळ घटनास्थळी धाव घेत आंदोलकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न

उरूळी कांचन : मराठा आरक्षणाच्या मागणी संदर्भात सकल मराठा समाजातर्फे सोमवारी (३०जुलै) हवेली तालुका बंदचे आवाहन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान येथे आंदोलनकर्ते व व्यापारी यांच्यात बाचाबाची व नंतर मारहाण झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला आहे. पण या वादाला वेगळीच किनार असल्याची नागरिकांमधील दबक्या आवाजातील चर्चेची पोलिसांनी नोंद घेतली असून त्या दिशेने तपास सुरू केला आहे.त्यात दोषींवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे असे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांनी सांगितले.    दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या मंगळवार (दि.२४ ) रोजीच्या महाराष्ट्र राज्य बंदच्या आंदोलनास उरुळी कांचन मधील व्यापाऱ्यांनी पाठिंबा देऊन बंद पाळला होता. त्यामुळे आज पुन्हा बंद पाळण्याबाबत व्यापारी वर्गात द्विधा मनस्थिती होती. त्यानुसार, सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास मराठा समाजाच्या युवा आंदोलनकर्त्यांनी मोर्चा काढत महात्मा गांधी विद्यालय रस्त्यावरील व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन केले.याचदरम्यान, आंदोलक आणि व्यापाऱ्यांत बाचाबाची व मारहाणीचा प्रकार घडल्याचे समोर आले. पोलिसांनी तातडीने प्रकरण शांततेने हाताळण्याचा प्रयत्न केला आणि अतिरिक्त कुमक मागवून उरुळी कांचन शहरात बंदोबस्तासाठी तैनात केला. मराठा आरक्षण मागणीसंदर्भात सकल मराठा संघटनांनी हवेली तालुका बंदच्या आवाहनास प्रतिसाद देत शहरातील आश्रमरस्ता व गावठाण परिसरात व्यापाऱ्यांकडून स्वत:हून दुकाने बंद ठेवली होती. परंतु, महात्मा गांधी विद्यालय रस्त्यावरील काही व्यापाऱ्यांनी व्यवहार सुरळीत सुरू ठेवले होते. मराठा संघटनांच्या सुमारे पन्नासहून अधिक आंदोलकर्त्यांनी विद्यालय येथे मोर्चा नेत व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन केले. या बंदच्या आवाहनास काहींनी विरोध दर्शविला. यादरम्यान, व्यापारी आणि काही आंदोलकर्त्यांत बाचाबाची होऊन या वादाचे पर्यावसन मारहाणीत झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला.त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आंदोलकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने आंदोलकांची राम मंदिरात बैठक घेऊन बंद शांततेत पार पाडण्याची सूचना केली. त्यानंतर आंदोलकांनी शांततेत पुणे - सोलापूर महामार्गावर तळवाडी चौकात ठिय्या आंदोलन करत निषेध सभा घेऊन बंदच्या आवाहनात सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच मंडलअधिकारी व सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदन देत आरक्षण मिळाले पाहिजेचा नारा दिला व ते जोपर्यंत मिळत नाही तो पर्यंत ते चालूच राहील, असा इशारा दिला.लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी परिस्थितीची पाहणी करत सुरक्षिततेचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. 

टॅग्स :uruli kanchanउरुळी कांचनmarathaमराठाMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाPoliceपोलिस