शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ७१ शाळांची पडझड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 20:59 IST

राज्यातील २१ जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांचे मोठे नुकसान झाले.

ठळक मुद्देआठ तालुक्यातील शाळांच्या दुरूस्तीसाठी 2 कोटी 63 लाखांची गरजपुणे जिल्ह्यातील ३ तालुक्यांमधील ११ शाळांची दुरूस्ती करावी लागणार

पुणे: कोल्हापूर व सांगलीसह राज्यातील २१ जिल्ह्यांना अतिवृष्टी व पुराचा फटका बसला असून त्यात पुणे जिल्ह्यातील आठ तालुक्यातील ७१ शाळांना अतिवृष्टीमुळे बाधित झाल्या आहेत.पावसाच्या पाण्यामुळे काही शाळांच्या सर्व वर्ग खोल्यांची पडझड झाली आहे.तर काही वर्ग खोल्यांची दुरूस्ती करावी लागणार आहे.त्यासाठी सुमारे २ कोटी ६३ लाख एवढा खर्च येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिका-यांकडून सांगितले जात आहे.राज्यातील २१ जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांचे मोठे नुकसान झाले.विद्यार्थ्यांना शाळेत बसून शिक्षण घेण्यासाठी वर्ग खोल्याच उपलब्ध राहिल्या नाहीत.शिक्षण अधिका-यांनी याबाबतचे सर्वेक्षण केले असून राज्यातील सुमारे २ हजार १७७ शाळा बाधित झाल्या आल्याची माहिती शिक्षण विभागाला दिली आहे. त्याच आधारे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदे घेवून सर्व शाळांच्या उभारणीसाठी ५७ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जाईल,अशी घोषणा केली.परतु,शिक्षण विभागाने दिलेल्या शाळांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.त्यामुळे शाळांच्या वर्ग खोल्यांच्या पुनर्बांधणीसाठी लागणा-या निधीत वाढ करावी लागेल,असे बोलले जात आहे.शिक्षण विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार पुणे जिल्ह्यातील ३ तालुक्यांमधील ११ शाळांची दुरूस्ती करावी लागणार आहे. मात्र, जिल्हा परिषदेकडे प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार भोर, वेल्हा, मुळशी,मावळ, खेड,पुरंदर, खेड, आंबेगाव आणि जुन्नर या आठ तालुक्यांमधील ७१ शाळांंना अतिवृष्टी व पुराचा फटका बसला आहे. त्यामुळे या ७१ शाळांमधील २११ वर्ग खोल्या दुरूस्त कराव्या लागतील. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शिक्षण विभागाकडून काळजी घेतली जात आहे. शाळा नादुरुस्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ग जवळच्या शाळेत स्थलांतरित केले आहेत.

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाRainपाऊसfloodपूर