शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

पावसाची हुलकावणी : जव्हार, मोखाडा तालुक्यांवर दुष्काळाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 2:28 AM

गेल्या वीस पंचवीस दिवसापासून पावसाने हुलकावणी दिल्याने पाऊसा अभावी भात पीक संकटात आले असून जव्हार व मोखडा तालुक्यावर दुष्काळाचं सावट पसरले आहे.

मोखाडा : गेल्या वीस पंचवीस दिवसापासून पावसाने हुलकावणी दिल्याने पाऊसा अभावी भात पीक संकटात आले असून जव्हार व मोखडा तालुक्यावर दुष्काळाचं सावट पसरले आहे. गुरुवारी सायंकाळी पावसाने तालुक्यात हजेरी लावल्याने हळव्या भातासह गरव्या भात पिकाला दिलासा मिळाल परंतु असे असले तरी करपा, खोडकीडा, बगळया या रोगाचा फटका पिकांना बसला आहे.पावसाची हुलकावणी, वाढते उन्ह आणि रोगांचा प्रादुर्भावामुळे शेतीवर दोन्ही तालुक्यात संकट आहे. ऐन भात पीक तयार होण्यासाची प्रक्रि या सुरू असताना आवश्यक पाऊस शेतीला मिळाला नसल्याने भाताच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर करपलेले भात, जमिनीला पडलेल्या भेगा जणूकाही दुष्काळच चित्र दर्शवित आहे.मोखाड्यात २५९ गावपाडे असून नागली, भात, वरई, खुरासनी, कुळीद, उडीद, तूर आदी पिके घेतली जातात परंतु यामधील भात हे पीक प्रामुख्याने घेतले जात असून २ हजार ३७ हेक्ट्रर जमिनीवर भाताची लागवड होते. सुरूवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने सुमारे ९५ टक्के भाताची लागवड करण्यात आली परंतु येथील वरच्या पाण्यावर अवलंबून असलेली भात शेती सध्या धोक्यात आले आहे. या निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.निसर्गापुढे शेतकरी मेटाकुटीलादरवर्षीच शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे आर्थिक संकटात सापडतो. त्यामुळे बँकांकडून घेतलेले पीक कर्ज फेडायचे कसे असा प्रश्न त्याच्यापुढे आहे. अनेक विघ्नांवर मात करीत केली जाणारी पारंपरिक शेती पुढे करायची की नाही असा प्रश्न पुढे येऊन ठाकला आहे..!

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnewsबातम्या