शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

दुष्काळामुळे शेतकरी मेटाकुटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 02:06 IST

पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांना चारा नाही, रब्बी हंगामातील पीक जळालं, घरातील धान्यही संपत आलं. अशी दारुण अवस्था आल्याने जगायचे कसे या यक्षप्रश्नाने खेड तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे.

दावडी : पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांना चारा नाही, रब्बी हंगामातील पीक जळालं, घरातील धान्यही संपत आलं. अशी दारुण अवस्था आल्याने जगायचे कसे या यक्षप्रश्नाने खेड तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर दुष्काळात तेरावा महिना उजाडल्याचे त्याला वाटत आहे.पुर्व भागातील गाडकवाडी, चिंचबाईवाडी, टाकळकरवाडी, चौधरवाडी ओळख म्हणजे अवर्षण ग्रस्त गावे. उद्योगधंदा काहीच नाही, त्यामुळे हाताला काम नाही. सगळी मदार शेतीवर. मात्र निसर्गाच्या फेऱ्याने हीच शेती शेतकºयांच्या मुळावर उठली आहे. गतवर्षीचे संकट झटकून नव्या उमेदीने कामाला लागायचे. कर्ज, उसनवारी करून पैसा शेतीत ओतायचा, मात्र लहरी निसर्गाच्या लहरीपणाने मेहनतीवर पाणीच ओतायचे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिसरातील खरीप हंगामातील पिके शेवटची घटका मोजत आहेत. परतीचा पाऊसही न झाल्याने विहिरी, तळी, बंधारे यांनी तळ गाठला आहे.सरकारी आस्थेचाही दुष्काळ नशिबीभयानक परिस्थिती असतानाही खेड तालुका दुष्काळसदृश घोषित केला नाही. जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीच्या निरीक्षणानुसार पुणे जिल्ह्यातील तेरा तालुक्यांपैकी दहा तालुके दुष्काळसदृश घोषित केले आहे. त्यापैकी खेड तालुका मात्र दुष्काळग्रस्त असल्याचे निरीक्षण नोंदवले नाही. दुष्काळ देखरेख समिती व खेड कृषी विभागातील यंत्रणेच्या उदासीनतेमुळे जनतेच्या मनातील उद्विग्नता वाढत आहे.जून महिन्यात जोरदार पावसानंतर खरीप हंगामातील बटाटा व इतर पिकांची पेरणी झाली. ही पिके कशीबशी निघून आली मात्र उत्पन्नात मोठी घट झाली. रब्बी हंगामासाठी पाऊस नसल्यामुळे ज्वारी व इतर पिकांची पेरणी केली नाही. पाऊस नसल्याने शेकडो हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. पाणी उपलब्ध असलेल्या शेतकºयांनी पिकांना पाणी दिले आहे.काही ठिकाणी ठिबक व तुषार सिंचनावर पिके जगवण्याची धावपळ करताना दिसत आहेत. मात्र मुळातच विहिरीतच पाणी नसल्याने ही धावपळ तरी शेवटपर्यंत कामी येईल का अशी परिस्टिती आहे. भारी जमिनीत ओल असल्याने पिके उभी आहेत. हलक्या जमिनीतील पिके जळाली आहेत. मागील वर्षांच्या तुलनेत दुष्काळाची तीव्रता अधिक आहे.मोजक्याच गावामध्ये स्थिती समाधानकारक असली लवकरच टँकरने पाणीपुरवठा करावा लागेल. पाणी आणि चारा दोघांचाही प्रचंड दुष्काळ आहे. जनावरं सांभाळता येत नसल्यानं शेतकरी त्यांना बाजारात विक्रीला आणतोय. मात्र तिथंही भाव मिळत नसल्यानं जनावरं मातीमोल भावात विकावी लागत आहेत.

टॅग्स :droughtदुष्काळPuneपुणे