शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
4
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
5
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
6
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
7
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
8
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
9
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
10
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
11
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
12
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
13
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
14
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
15
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
16
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
17
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
18
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
19
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
20
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर

दुष्काळामुळे शेतकरी मेटाकुटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 02:06 IST

पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांना चारा नाही, रब्बी हंगामातील पीक जळालं, घरातील धान्यही संपत आलं. अशी दारुण अवस्था आल्याने जगायचे कसे या यक्षप्रश्नाने खेड तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे.

दावडी : पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांना चारा नाही, रब्बी हंगामातील पीक जळालं, घरातील धान्यही संपत आलं. अशी दारुण अवस्था आल्याने जगायचे कसे या यक्षप्रश्नाने खेड तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर दुष्काळात तेरावा महिना उजाडल्याचे त्याला वाटत आहे.पुर्व भागातील गाडकवाडी, चिंचबाईवाडी, टाकळकरवाडी, चौधरवाडी ओळख म्हणजे अवर्षण ग्रस्त गावे. उद्योगधंदा काहीच नाही, त्यामुळे हाताला काम नाही. सगळी मदार शेतीवर. मात्र निसर्गाच्या फेऱ्याने हीच शेती शेतकºयांच्या मुळावर उठली आहे. गतवर्षीचे संकट झटकून नव्या उमेदीने कामाला लागायचे. कर्ज, उसनवारी करून पैसा शेतीत ओतायचा, मात्र लहरी निसर्गाच्या लहरीपणाने मेहनतीवर पाणीच ओतायचे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिसरातील खरीप हंगामातील पिके शेवटची घटका मोजत आहेत. परतीचा पाऊसही न झाल्याने विहिरी, तळी, बंधारे यांनी तळ गाठला आहे.सरकारी आस्थेचाही दुष्काळ नशिबीभयानक परिस्थिती असतानाही खेड तालुका दुष्काळसदृश घोषित केला नाही. जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीच्या निरीक्षणानुसार पुणे जिल्ह्यातील तेरा तालुक्यांपैकी दहा तालुके दुष्काळसदृश घोषित केले आहे. त्यापैकी खेड तालुका मात्र दुष्काळग्रस्त असल्याचे निरीक्षण नोंदवले नाही. दुष्काळ देखरेख समिती व खेड कृषी विभागातील यंत्रणेच्या उदासीनतेमुळे जनतेच्या मनातील उद्विग्नता वाढत आहे.जून महिन्यात जोरदार पावसानंतर खरीप हंगामातील बटाटा व इतर पिकांची पेरणी झाली. ही पिके कशीबशी निघून आली मात्र उत्पन्नात मोठी घट झाली. रब्बी हंगामासाठी पाऊस नसल्यामुळे ज्वारी व इतर पिकांची पेरणी केली नाही. पाऊस नसल्याने शेकडो हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. पाणी उपलब्ध असलेल्या शेतकºयांनी पिकांना पाणी दिले आहे.काही ठिकाणी ठिबक व तुषार सिंचनावर पिके जगवण्याची धावपळ करताना दिसत आहेत. मात्र मुळातच विहिरीतच पाणी नसल्याने ही धावपळ तरी शेवटपर्यंत कामी येईल का अशी परिस्टिती आहे. भारी जमिनीत ओल असल्याने पिके उभी आहेत. हलक्या जमिनीतील पिके जळाली आहेत. मागील वर्षांच्या तुलनेत दुष्काळाची तीव्रता अधिक आहे.मोजक्याच गावामध्ये स्थिती समाधानकारक असली लवकरच टँकरने पाणीपुरवठा करावा लागेल. पाणी आणि चारा दोघांचाही प्रचंड दुष्काळ आहे. जनावरं सांभाळता येत नसल्यानं शेतकरी त्यांना बाजारात विक्रीला आणतोय. मात्र तिथंही भाव मिळत नसल्यानं जनावरं मातीमोल भावात विकावी लागत आहेत.

टॅग्स :droughtदुष्काळPuneपुणे