शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

दुष्काळामुळे शेतकरी मेटाकुटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 02:06 IST

पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांना चारा नाही, रब्बी हंगामातील पीक जळालं, घरातील धान्यही संपत आलं. अशी दारुण अवस्था आल्याने जगायचे कसे या यक्षप्रश्नाने खेड तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे.

दावडी : पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांना चारा नाही, रब्बी हंगामातील पीक जळालं, घरातील धान्यही संपत आलं. अशी दारुण अवस्था आल्याने जगायचे कसे या यक्षप्रश्नाने खेड तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर दुष्काळात तेरावा महिना उजाडल्याचे त्याला वाटत आहे.पुर्व भागातील गाडकवाडी, चिंचबाईवाडी, टाकळकरवाडी, चौधरवाडी ओळख म्हणजे अवर्षण ग्रस्त गावे. उद्योगधंदा काहीच नाही, त्यामुळे हाताला काम नाही. सगळी मदार शेतीवर. मात्र निसर्गाच्या फेऱ्याने हीच शेती शेतकºयांच्या मुळावर उठली आहे. गतवर्षीचे संकट झटकून नव्या उमेदीने कामाला लागायचे. कर्ज, उसनवारी करून पैसा शेतीत ओतायचा, मात्र लहरी निसर्गाच्या लहरीपणाने मेहनतीवर पाणीच ओतायचे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिसरातील खरीप हंगामातील पिके शेवटची घटका मोजत आहेत. परतीचा पाऊसही न झाल्याने विहिरी, तळी, बंधारे यांनी तळ गाठला आहे.सरकारी आस्थेचाही दुष्काळ नशिबीभयानक परिस्थिती असतानाही खेड तालुका दुष्काळसदृश घोषित केला नाही. जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीच्या निरीक्षणानुसार पुणे जिल्ह्यातील तेरा तालुक्यांपैकी दहा तालुके दुष्काळसदृश घोषित केले आहे. त्यापैकी खेड तालुका मात्र दुष्काळग्रस्त असल्याचे निरीक्षण नोंदवले नाही. दुष्काळ देखरेख समिती व खेड कृषी विभागातील यंत्रणेच्या उदासीनतेमुळे जनतेच्या मनातील उद्विग्नता वाढत आहे.जून महिन्यात जोरदार पावसानंतर खरीप हंगामातील बटाटा व इतर पिकांची पेरणी झाली. ही पिके कशीबशी निघून आली मात्र उत्पन्नात मोठी घट झाली. रब्बी हंगामासाठी पाऊस नसल्यामुळे ज्वारी व इतर पिकांची पेरणी केली नाही. पाऊस नसल्याने शेकडो हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. पाणी उपलब्ध असलेल्या शेतकºयांनी पिकांना पाणी दिले आहे.काही ठिकाणी ठिबक व तुषार सिंचनावर पिके जगवण्याची धावपळ करताना दिसत आहेत. मात्र मुळातच विहिरीतच पाणी नसल्याने ही धावपळ तरी शेवटपर्यंत कामी येईल का अशी परिस्टिती आहे. भारी जमिनीत ओल असल्याने पिके उभी आहेत. हलक्या जमिनीतील पिके जळाली आहेत. मागील वर्षांच्या तुलनेत दुष्काळाची तीव्रता अधिक आहे.मोजक्याच गावामध्ये स्थिती समाधानकारक असली लवकरच टँकरने पाणीपुरवठा करावा लागेल. पाणी आणि चारा दोघांचाही प्रचंड दुष्काळ आहे. जनावरं सांभाळता येत नसल्यानं शेतकरी त्यांना बाजारात विक्रीला आणतोय. मात्र तिथंही भाव मिळत नसल्यानं जनावरं मातीमोल भावात विकावी लागत आहेत.

टॅग्स :droughtदुष्काळPuneपुणे