शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

दुष्काळामुळे जनावरांची होतेय बेभाव विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 01:43 IST

चाराटंचाई : टँकर सुरू करण्याची मागणी

दावडी : खेड तालुक्याच्या पूर्व भागात दुष्काळ असताना शासनाने जनावरांच्या ना चाऱ्याची व्यवस्था ना छावणी सुरू केली आहे. त्यामुळे येथील पशुधन जगविणे जिकिरीचे झाले असून पशुपालक तालुक्यातील चाकण येथील बाजारात जनावरांची बेभाव विक्री करीत आहेत.खेडच्या पूर्व भागातील कनेरसर मंडळ शासनाने दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केला आहे. या परिसरातील कनेसरस येथे पशुधन ५६१६, गाडकवाडी येथे ८७६, चौधरवाडी येथे ३६१७, पुर येथे ३२०६, वरुडे येथे ६२६४, गोसासी येथे ६११६, इतक्या मोठ्या प्रमाणात आहे. याशिवाय सुधारित व परप्रांतीय असे २५ हजार ६९५ इतके पशुधन आहे. या साºया नोंदी सरकारी दप्तरी असताना आणि सरकारनेच दुष्काळ जाहीर केलेला असतानाही सरकारकडून या जनवारांच्या चारा-पाण्याच्या व्यवस्थेसाठी काहीच केलेले नाही.

गेल्या काही वषार्पासून खेड तालुक्याचा पूर्व भाग दुष्काळाच्या छायेखाली आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने शेतकºयांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. यंदाच्या वर्षातील शेतकºयांच्या हातून रब्बी हंगामाचे पीक गेले आहे. काही शेतकºयांनी ज्वारीची पेरणी केली, परंतु, परतीच्या पावसाने त्याची वाढ खुंटली त्यामुळे जनावरांना काय खायला घालायचा, असा प्रश्न शेतकºयांसमोर पडला आहे. सद्य स्थितीत डोंगरावरील वाळलेले गवत तसेच शेतकरी चारा आणत आहे.विहिरी आटल्या, ज्वारी होरपळलीऐन हिवाळ्यातच अनेक भागातील विहिरी, नदी, नाले, ओढे, आटले आहेत. त्यामुळे ज्वारीचे पीक होरपळून गेले आहे. गाडकवाडी, वरुडे ,कनेरसर या ठिकाणचे बंधारे कोरडे पडले आहेत. पाण्याअभावी तसेच चाºयाअभावी पशुधनाची विक्री करावी तर येणाºया काळात पुन्हा शेती कसण्यासाठी पशुधन आणावे कोठून असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे.

टॅग्स :Puneपुणेcowगाय