शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
4
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
5
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
6
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
7
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
8
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
9
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
10
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
11
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
12
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
13
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
14
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
15
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
16
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
17
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
18
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
19
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
20
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर

दुष्काळामुळे आवळा उत्पादकांना ७० टक्के फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 02:25 IST

आयुर्वेदिक गुणामुळे वाढती मागणी ; मार्केट यार्डमध्ये आवळ्याचा हंगाम सुरू

पुणे : राज्यात पडलेल्या दुष्काळाचा मोठा फटका यंदा आवळा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. पुणे बाजार समितीमध्ये यंदाचा आवळ्याचा हंगाम सुरू झाला आहे. परंतु दुष्काळामुळे उत्पादन तब्बल ७० टक्क्यांनी घटले असल्याचे आवळ्याचे व्यापाºयांनी स्पष्ट केले.आवळ्याच्या आयुर्वेदिक गुणधर्मांमुळे गेल्या काही वर्षांत आवळ्याच्या मागणी वाढत होत असून, घरगुती वापराबरोबरच प्रक्रिया उद्योगांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. यामुळे आवळा उत्पादक शेतकºयांना चांगले दर मिळू लागले आहेत. यंदाचा हंगाम सुरु झाला असून, सध्या प्रतिकिलोला २५ ते ३५ रुपये दर मिळत आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उत्पादनामध्ये तब्बल ७० टक्क्यांनी घट झाली असून, गत वर्षीच्या तुलनेत दहामध्ये देखील प्रतिकिलो मागे ५ ते १० रुपयांची वाढ झाली आहे. याबाबत पुणे बाजार समितीमधील आवळ्याचे आडतदार विलास निलंगे यांनी सांगितले की, आवळ्याचा हंगाम साधारण डिसेंबर ते फेबु्रवारी अखेरपर्यंत सुरू होतो. बाजार समितीमध्ये प्रामुख्याने राजस्थानसह करमाळा, मालेगाव आदी भागांतून आवळ्याची आवक होत असते. सध्या हंगाम सुरू झाला असून राजस्थान येथून चकाया जातीच्या आवळ्याची दिवसाआड सुमारे १० टन, तर स्थानिक भागातून एन-७ जातीचा दररोज ४ ते ५ टन आवक होते. यामधील एन ए ७ या वाणाला हिरवा रंग, चमकदार फळ, एकसारखा गोल आकार असल्याने मागणी चांगली आहे. इतर वाणांपेक्षा या वाणाला पाच ते सहा रुपये जास्त दर मिळत आहे. आवळ्याच्या आयुर्वेदिक गुणधर्मामुळे घरगुती खरीददारासह मोठ्या प्रमामात प्रक्रिया उद्योग, आयुर्वेदिक वैद्य यांच्याकडून आवळ्याची खरेदी केली जाते. कॅन्डी, च्यवनप्राश, ज्युससाठीदेखील आवळ्याची मागणी अधिक असते. पुणे बाजार समितीतून बेळगाव, कोल्हापूर, हुबळी या भागातील बाजारपेठामध्ये आवळा पाठवला जात असल्याचे निलंगे यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरी