शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

सध्याच्या सोशल मीडियामुळे साहित्याचे लोकशाहीकरण झाले - सुशीलकुमार शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2019 05:37 IST

सुशीलकुमार शिंदे : साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार जाहीर

प्रज्ञा केळकर-सिंग 

पुणे : सोशल मीडियामुळे साहित्याचे लोकशाहीकरण झाले आहे. त्यामुळे अभिजन-बहुजन हा भेद काहीसा दूर झाला आहे. सध्या मोठी राजकीय, सामाजिक स्थित्यंतरे होत आहेत. समाजात भयावह घटना घडत आहेत, धार्मिक उन्माद वाढला आहे. कठीण काळातच कवीचे काम आव्हानात्मक असते, अशा शब्दांत कवी सुशीलकुमार शिंदे यांनी कवीचे भावविश्व ‘लोकमत’कडे उलगडले.

साहित्य अकादमीने कवितासंग्रहाची दखल घेतली याचा खूपच आनंद आहे. हा पुरस्कार म्हणजे माझ्यासारख्या काहीतरी लिहू पाहणाऱ्याला मिळालेली कौतुकाची थाप आणि पोचपावतीच आहे. मी ज्या लेखकांचे साहित्य वाचत मोठा झालो, त्यांनाच मी हा पुरस्कार समर्पित करतो, असे शिंदे यांनी सांगितले. ‘शहर आत्महत्या करायचं म्हणतंय’ या कवितासंग्रहाला मुंबईची पार्श्वभूमी आहे. मी मुंबईचे पाहिलेले जग, वेगवेगळे परिघ अशा पद्धतीने कवितासंग्रहामध्ये परिवेश मांडला आहे. ‘कोणत्याही काळी मुके राहण्याचा गुन्हा गंभीरच असतो’, अशा ओळींमधून भावना मांडण्याचा प्रयत्न केला आहे. नामदेव ढसाळ, अरुण कोल्हटकरांची कविता मला खूप प्रभावी वाटते. लहानपणापासून मी भालचंद्र नेमाडे सरांचे साहित्य वाचतो आहे. माझा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाल्यावर एके दिवशी नेमाडे सरांचे पत्र आले. त्यांनी लिहिले होते की, २०१७ मध्ये सर्वात आवडलेली कविता म्हणजे ‘दहा बाय दहाची खोली’. अशा प्रतिक्रिया एका कवीला खूप समाधान देणाºया, प्रोत्साहन देणाºया असल्याचे त्यांनी सांगितले....तेव्हा कवी व्यथित होतोकवी समाजाचाच एक घटक असतो. दाभोलकरांची हत्या होते, तेव्हा माणूस, कवी म्हणून मी प्रचंड व्यथित होतो आणि त्यातून कविता सुचू लागते. ‘उजेड पेरणाºया मशाली अद्यापही कुणाच्याच गुलाम नाहीत’ अशी एक ओळ कवितेमध्ये आहे. शहरी आणि ग्रामीण, अभिजन आणि बहुजन असा फरक आता राहिलेला नाही, असे मला वाटते. सामाजिक माध्यमांतून साहित्याचे लोकशाहीकरण झाले आहे, असेही शिंदे म्हणाले.

टॅग्स :Puneपुणे