शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

सध्याच्या सोशल मीडियामुळे साहित्याचे लोकशाहीकरण झाले - सुशीलकुमार शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2019 05:37 IST

सुशीलकुमार शिंदे : साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार जाहीर

प्रज्ञा केळकर-सिंग 

पुणे : सोशल मीडियामुळे साहित्याचे लोकशाहीकरण झाले आहे. त्यामुळे अभिजन-बहुजन हा भेद काहीसा दूर झाला आहे. सध्या मोठी राजकीय, सामाजिक स्थित्यंतरे होत आहेत. समाजात भयावह घटना घडत आहेत, धार्मिक उन्माद वाढला आहे. कठीण काळातच कवीचे काम आव्हानात्मक असते, अशा शब्दांत कवी सुशीलकुमार शिंदे यांनी कवीचे भावविश्व ‘लोकमत’कडे उलगडले.

साहित्य अकादमीने कवितासंग्रहाची दखल घेतली याचा खूपच आनंद आहे. हा पुरस्कार म्हणजे माझ्यासारख्या काहीतरी लिहू पाहणाऱ्याला मिळालेली कौतुकाची थाप आणि पोचपावतीच आहे. मी ज्या लेखकांचे साहित्य वाचत मोठा झालो, त्यांनाच मी हा पुरस्कार समर्पित करतो, असे शिंदे यांनी सांगितले. ‘शहर आत्महत्या करायचं म्हणतंय’ या कवितासंग्रहाला मुंबईची पार्श्वभूमी आहे. मी मुंबईचे पाहिलेले जग, वेगवेगळे परिघ अशा पद्धतीने कवितासंग्रहामध्ये परिवेश मांडला आहे. ‘कोणत्याही काळी मुके राहण्याचा गुन्हा गंभीरच असतो’, अशा ओळींमधून भावना मांडण्याचा प्रयत्न केला आहे. नामदेव ढसाळ, अरुण कोल्हटकरांची कविता मला खूप प्रभावी वाटते. लहानपणापासून मी भालचंद्र नेमाडे सरांचे साहित्य वाचतो आहे. माझा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाल्यावर एके दिवशी नेमाडे सरांचे पत्र आले. त्यांनी लिहिले होते की, २०१७ मध्ये सर्वात आवडलेली कविता म्हणजे ‘दहा बाय दहाची खोली’. अशा प्रतिक्रिया एका कवीला खूप समाधान देणाºया, प्रोत्साहन देणाºया असल्याचे त्यांनी सांगितले....तेव्हा कवी व्यथित होतोकवी समाजाचाच एक घटक असतो. दाभोलकरांची हत्या होते, तेव्हा माणूस, कवी म्हणून मी प्रचंड व्यथित होतो आणि त्यातून कविता सुचू लागते. ‘उजेड पेरणाºया मशाली अद्यापही कुणाच्याच गुलाम नाहीत’ अशी एक ओळ कवितेमध्ये आहे. शहरी आणि ग्रामीण, अभिजन आणि बहुजन असा फरक आता राहिलेला नाही, असे मला वाटते. सामाजिक माध्यमांतून साहित्याचे लोकशाहीकरण झाले आहे, असेही शिंदे म्हणाले.

टॅग्स :Puneपुणे