शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दक्षिण आफ्रिकेतील कोरड्या हवेने हिरावला पाऊस, ढगांची निर्मिती होऊनही वाढ न झाल्याने पाऊस झाला कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 13:51 IST

साधारण जमिनीपासून ३ ते ५ किमी उंचीवर ढगांची निर्मिती होऊन पाऊस होत असतो

ठळक मुद्देमॉन्सून स्थिरावत असताना त्याचा जोर असतो. तो जसा पुढे जातो, तसा त्याचा मागे जोर कमी होतो. आता मॉन्सून उत्तरेकडे सरकला आहे

पुणे: मुंबई, ठाण्यासह कोकणात अतिवृष्टीचा इशारा देऊन हवामान विभागाने रेड अलर्ट दिला होता. हवामान विभागाच्या अलर्टमुळे सर्व जण सतर्क झाले. मात्र, अपेक्षित पाऊसच झाला नाही. यामागे कारण आहे ते आफ्रिकेतून आलेल्या कोरड्या (शुष्क) हवेमुळे ढगांची निर्मिती झाली असली तरी त्यात वाढ न झाल्याने अंदाजानुसार पाऊस झाला नाही, हे कारण समोर आले आहे. हवामान विभागाने कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत सोमवारीही रेड अलर्ट दिला आहे. तसेच संपूर्ण कोकणात यलो अलर्ट दिला आहे. मात्र, त्यानुसार अपेक्षित पाऊस रविवारी कोठेही झाला नाही.

याबाबत ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की, साधारण जमिनीपासून ३ ते ५ किमी उंचीवर ढगांची निर्मिती होऊन पाऊस होत असतो. ढगांची निर्मिती, वाऱ्याचा वेग, बाष्पभवन, आर्द्रता या सर्वांचा विचार करून त्यानुसार अनुमान बांधले जाते. त्यातूनच कोकण व मुंबईतील पावसाबाबत अनुमान बांधले गेले असावे. मात्र, त्यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या वाळवंटातून कोरडी हवा आपल्याकडे आली. या घटकामुळे ढगांची निर्मिती झाली तरी त्यात वाढ न झाल्याने पाऊसमान कमी झाले आहे. ही हवा काही एका दिवसात आलेली नाही. तिचा प्रवास मागील २ ते ३ दिवस सुरू असणार. या घटकाकडे दुर्लक्ष झाले असावे, त्यातूनच अंदाज चुकला आहे.

मॉन्सून स्थिरावत असताना त्याचा जोर असतो. तो जसा पुढे जातो, तसा त्याचा मागे जोर कमी होतो. आता मॉन्सून उत्तरेकडे सरकला आहे. त्यामुळेच आपल्याकडील पाऊसमान कमी झाले आहे. ही परिस्थिती अजून दोन तीन दिवस राहण्याची शक्यता असल्याचे डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसWaterपाणीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड