शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

विकतच्या फास्टॅग कडे वाहनचालकांची पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 13:22 IST

इलेक्ट्रॉनिक टोलवसुली करण्यासाठी वाहनांना 'फास्टॅग ' लावणे आवश्यक

ठळक मुद्देकेंद्र सरकारने २ नोव्हेंबर २०१८ पासून सर्व परिवहन वाहनांना फास्टॅग केला बंधनकारकरपत्रकामध्ये स्पष्टता नसल्याचा दावा; ठिकठिकाणी केले उपलब्ध अपेक्षित प्रतिसाद मिळेना टॅगमध्ये किमान १५० रुपये प्रत्येक वेळी शिल्लक असणे आवश्यक

पुणे : इलेक्ट्रॉनिक टोलवसुली करण्यासाठी वाहनांना 'फास्टॅग ' लावणे आवश्यक आहे. केंद्र शासनाने या फास्टॅगसाठी २०० ते ५०० रुपयांपर्यंतचे डिपॉझिट ठेवले होते, तर खासगी एजन्सीकडून ५०० ते ९०० रुपये आकारून वाहतूकदारांची लूट होत होती. त्यामुळे फास्टॅग लावण्याकडे वाहनचालकांनी पाठ फिरविल्याने अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे केंद्र शासनाने फास्टॅग फुकटात उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. आता तरी फास्टॅग वाहनचालकांकडून फास्टॅग घेतला जाईल, अशी अपेक्षा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.केंद्र सरकारने २ नोव्हेंबर २०१८ पासून सर्व परिवहन वाहनांना फास्टॅग बंधनकारक केला आहे. याची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर दरपत्रकामध्ये स्पष्टता नसल्याचा दावा वाहतूकदारांनी केला. त्यामुळे टॅग घेण्याबाबत अनेक वाहतूकदारांमध्ये संभ्रम होता. परिणामी, टॅगची अपेक्षित विक्री होत नव्हती. हे टॅग सर्व टोलनाके, नोंदणीकृत बँका, प्रादेशिक परिवहन कार्यालये, मार्गावरील फूड प्लाझा आदी ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले होते. पण २०० ते ५०० रुपये डिपॉझिट असल्याने तसेच खासगी एजन्सीकडून वाढीव शुल्क घेतले जात असल्याने अनेकांनी त्याकडे पाठ फिरविली. आता १ डिसेंबरपासून सर्व वाहनांसाठी हा टॅग बंधनकारक केला आहे. हा टॅग नसल्यास दुप्पट टोल घेतला जाणार असल्याचे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे. तसेच हा टॅग मोफत उपलब्ध करून देण्याची घोषणाही त्यांनी केली.ह्यएनएचएआयह्णच्या अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारपासूनच फास्टॅग मोफत उपलब्ध करून देण्यास सुरुवात झाली आहे. आता सर्व टोलनाके, बँकांमध्ये हे टॅग उपलब्ध असतील. मात्र, टॅग घेताना किंवा नंतर रिचार्जची रक्कम भरावी लागेल. अन्यथा त्याचा काहीच उपयोग नाही. तसेच टॅगमध्ये किमान १५० रुपये प्रत्येक वेळी शिल्लक असणे आवश्यक आहे. १ डिसेंबरपासून टोलनाक्यांवर सर्व लेन फास्टॅगसाठी करण्यात येतील. फास्टॅग नसलेल्या वाहनांसाठी एखादी स्वतंत्र लेन ठेवली जाऊ शकते. याआधी दररोज २० ते २५ टॅग जात होते. हे प्रमाण अपेक्षेपेक्षा खूप कमी होते, असेही अधिकाºयांनी सांगितले. ......फास्टॅग विक्रीत मोठा भ्रष्टाचार सुरू होता. देशातील अनेक टोलनाक्यावर टॅगद्वारे टोलवसुलीची यंत्रणा नाही किंवा काही ठिकाणी नादुरुस्त असते. अशा वेळा वाहनमालकांना आर्थिक फटका बसतो. टॅग असून एकाच रस्त्यावर दोनदा टोल घेतला जात असल्याचे प्रकार घडत आहेत. या प्रणालीमध्ये कोणतीही स्पष्टता नाही. ........---------------------------प्रणालीमध्ये कोणतीही स्पष्टता नाहीप्रत्येक आरटीओबाहेर त्याची विक्री करून चालकांची लूट केली जात आहे. त्यामुळे फास्टॅग १ डिसेंबरपासून बंधनकारक करण्यास विरोध असल्याचे महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी सांगितले. टॅग मोफत दिला तरी पुढील आठ दिवसांत सर्वांना टॅग बसविणे शक्य नाही, त्यामुळे मुदतवाढ देऊन सर्व यंत्रणा व्यवस्थितपणे कार्यरत कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली......टोलनाक्यांवर शुल्क भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्यामध्ये वेळ व इंधनही खूप वाया जाते. याची बचत करण्यासाठी सर्व वाहनांना फास्टॅग बंधनकारक करण्यात आला आहे. रेडिओ फ्रिक्वेन्सी टॅगसारखा हा फास्टॅग काम करतो. वाहनाच्या पुढील बाजूच्या काचेवर एका बाजूला टॅग लावला जातो......हा टॅग प्रवासावेळी रिचार्ज करणे आवश्यक आहे. वाहन टोलनाक्यावर आल्यानंतर तिथे थांबण्याची गरज पडणार नाही. कॅमेºयाद्वारे हा फास्टॅग स्कॅन होऊन त्यातील टोलचे पैसे कापले जातील. त्यामुळे वेळ आणि इंधनाचीही बचत होईल. ..

टॅग्स :PuneपुणेtollplazaटोलनाकाCentral Governmentकेंद्र सरकारfour wheelerफोर व्हीलरhighwayमहामार्ग