शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

लाखो तरुणांचे स्वप्न; पण सरकारलाच नाही गांभीर्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 4:09 AM

शासन दरबारी विविध विभागांतील दोन लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. तरीसुद्धा राज्य सरकार रिक्तपदे भरण्याचे योग्य नियोजन करण्यात अपयशी ...

शासन दरबारी विविध विभागांतील दोन लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. तरीसुद्धा राज्य सरकार रिक्तपदे भरण्याचे योग्य नियोजन करण्यात अपयशी ठरत आहे. नोकरीच्या आशेने डोळे लावून बसलेल्या उमेदवारांना एक प्रकारचा दिलासादेखील देता येत नसल्याचे सध्याचे चित्र आहे. राज्य सरकारच्या वर्ग गट ‘अ’ व ‘ब’ पदांची भरती करण्यासाठी स्वायत्त दर्जा देऊन स्थापन करण्यात आलेल्या एमपीएससीकडे किमान वर्षभराच्या परीक्षांचे नियोजनदेखील नाही. सामान्य प्रशासन विभागाकडून वेळच्या वेळी रिक्त पदे भरण्याबाबतचे मागणीपत्र एमपीएससीला पाठवले जात नाही. त्यामुळे परीक्षा कधी होणार आहेत?, किती काळ लागणार आहे?, निवड होऊनही नियुक्ती कधी मिळणार ?, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ना एमपीएससीकडे आहेत, ना राज्य सरकारकडे. त्यामुळे दिवसरात्र अभ्यास करणारा उमेदवार यामध्ये भरकटला जात आहे. उमेदीची वर्ष यामध्ये घालवत आहे. त्याच्या हातात शेवटी अपयश पदरी पडले तर पुढे काय कर करावे ? या चिंतेने नैराश्य येत आहे. परिस्थिती बदलण्यासाठी संघर्ष करणारा, मोकळ्या हाताने समाजाचे टोमणे खात आयुष्य धकाधकीत जगत आहेत. अशी अनेक उदाहरणे समाजात आहेत. यासाठी शाश्वत धोरण आखण्याची गरज असून वेळीच युवा पिढीला सावरण्याची गरज आहे.

राज्य सरकारचे स्पर्धापरीक्षेसाठी धोरण ठरलेले असावे

स्पर्धा परीक्षेतून उमेदवारांना सरकार किती प्रमाणात नोकरी देऊ शकणार आहे, याचे धोरण ठरविण्याची गरज आहे. रिक्त पदांचा तपशील हा उघड असला पाहिजे. त्यानुसार भरती प्रक्रिया वेळच्या वेळी राबविता येऊ शकते. यासाठी तामिळनाडू लोकसेवा आयोगाचे अनुकरण करावे. कंत्राटी पद्धतीने भरती न करता कायमस्वरूपी करावी. जेवढ्या पदांची भरती एमपीएसीकडून करता येतील तेवढी करावी. यामुळे भरती प्रक्रियेत पारदर्शकता वाढेल. यासाठी केरळ लोकसेवा आयोग पॅटर्न राबवावा. सेवा प्रवेश नियम डावलून तदर्थ पदोन्नती धोरण राबवून पदभरती राबवून स्पर्धापरीक्षा उमेदवारांवर अन्याय केला जात आहे. यावर कडक शासन करण्याची गरज आहे. तसेच राज्य सरकारने जाहीर केलेल्या मेघा भरतीची प्रक्रिया जलद गतीने सुरू करावी.

एमपीएससी एक स्वायत्त संस्था

एमपीएससी ही एक वैधानिक संस्था असून, तिला स्वायत्ततेचा दर्जा आहे. त्यामुळे या संस्थेचा मन राखला गेला पाहिजे. मराठा आरक्षणाच्या लढाईत अनेक वेळा परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय हा एमपीएसीला विश्वासात घेऊन घेणे अपेक्षित असताना तिला अंधारात ठेऊन निर्णय घेतले. त्यामुळे राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. अनेक पदांच्या परीक्षा एमपीएससीच्या कार्यकक्षेतील असताना थेट यंत्र नेमून भारती प्रक्रिया राबविली गेली. त्यामुळे सरकारच्या भरती प्रक्रियेवर शंका घेतली जाऊ लागलेली आहे. महत्त्वाच्या पद भरती करणाऱ्या संस्थेचा स्वायत्त दर्जा टिकलचा पाहिजे, असा मत प्रवाह आहे.

एमपीएसीने यूपीएससीचे अनुकरण प्रभावीपणे करण्याची गरज

यूपीएससी वर्षभरात घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करते. तसे एमपीएससीने करावे. त्याचे तंतोतंत पालन करावे. यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएसीनेदेखील परीक्षा देण्यावर मर्यादा घातल्या. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार यूपीएससीने सीसॅट पेपर पात्र केला. त्याच धर्तीवर एमपीएससीने सीसॅट पात्र करावा, अशी मागणी उमेदवारांची मागणी गेल्या पाच वर्षांपासूनची आहे.

स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांसाठी युवा धोरण

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून उमेदवारांच्या बैद्धिक पातळीत वाढ होते. तसेच मानसिकदृष्ट्या वैचारिक विकास होतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे अपयशी ठरलेल्या उमेदवारांसाठी विशेष युवा धोरण ठरविण्याची मागणी होऊ लागली आहे. अभ्यासातून परिपक्वता असलेल्या या घटकाला कुठेतरी सामावून घेण्याची गरज आहे. त्यासाठी उद्योग संस्था आणि सामाजिक संस्था, कैशल्य विकास यांची सांगड घालून या घटकाला व्यावसायिक दृष्टीने सामावून घेऊन त्यांना त्यांच्या बुद्धीनुसार आर्थिकदृष्ट्या सक्षम करता येईल. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती मोठी असायला हवी. तसेच गाव व तालुकास्तरावर अभ्यासिका व ग्रंथसाहित्य उपलब्ध करावे. सध्याच्या परिस्थितीचा विचार करून ऑनलाइन शिक्षण पद्धती अवलंबिली पाहिजे. यासाठी अर्थसंकल्पामध्ये शिक्षण विभागासाठी करण्यात येणाऱ्या आर्थिक तरतुदीत स्पर्धा परीक्षा क्षेत्रासाठीदेखील काही अंशी तरतूद असली पाहिजे.

- अमोल अवचिते