शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

शिवसेनेने शस्त्र टाकली आहे असे समजू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:14 IST

लोकतम न्यूज नेटवर्क मंचर : सत्तेतला वाटेकरी हा सर्वांत मोठा शत्रू असतो. शत्रू नको असेल तर विधानसभेला या भागासह ...

लोकतम न्यूज नेटवर्क

मंचर : सत्तेतला वाटेकरी हा सर्वांत मोठा शत्रू असतो. शत्रू नको असेल तर विधानसभेला या भागासह १५५ जागा निवडून आणण्यासाठी आपल्याला एकमेकांची गरज आहे. आज राज्यात वेगळी परिस्थिती असली तरी शिवसेनेने शस्त्र टाकली आहे, असे समजू नका. शिवसैनिक लढवय्ये असून पैशाने दहशत निर्माण कराल तर आमच्याकडे हिम्मत आहे, असे प्रतिपादन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज केले.

आंबेगाव तालुका शिवसेनेच्या वतीने शिवसैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन लांडेवाडी येथे करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राऊत बोलत होेते. यावेळी शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, राजाराम बाणखेले, सुभाष पोकळे, तानाजी शेवाळे, अशोक बाजारे यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर जिल्हाप्रमुख शरद सोनवणे, उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, अविनाश रहाणे, दीपमाला बढे, श्रद्धा कदम, माऊली खंडागळे, सरपंच अंकुश लांडे, किरण राजगुरू, सागर काजळे आदी उपस्थित होते.

राऊत म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेनेला वारंवार अपमानित केले. त्या वेदनेतून उडालेल्या ठिणगीमुळे मुख्यमंत्रिपद आपल्याला मिळाले. अपमानाची सल होती. त्यातून सरकार स्थापन झाले. सरकार टिकवताना शिवसेना पक्षाला ताकद मिळाली पाहिजे. फाटक्या शिवसैनिकाने अनेक धनाढ्य लोकांना पराभूत केले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जात-पात न पाहता शिवसैनिकाला मोठे केले. पैशाने निवडणूक जिंकता येत असती तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ५० खासदार हवे होते. राज्यात वेगळी परिस्थिती असताना आम्ही शस्त्र टाकली असे समजू नका. शिवसैनिक लढवय्ये आहेत. महाराष्ट्रात तीन पक्ष सत्तेत असलेस तरी शिवसेना हे स्वतंत्र बेट तसेच महासत्ता आहे. ते विलीन करता येणार नाही. शिवसेनेचा सूर्य कधी मावळला नाही. आपला जन्म लढण्यासाठी झाला आहे. पुढील काळात होणाऱ्या निवडणुकीसाठी संघटना बांधणीकडे लक्ष द्या. समोर कोण ताकदीचा आहे हे न पाहता सत्तेचे आपण वाटेकरी आहोत. सत्तेला टेकू शिवसेनेचा आहे. ही जाणीव होऊ द्या.

शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, आगामी काळात होणाऱ्या निवडणुका लढण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज राहावे. सहकारात भक्कम जाळे उभे करायचे आहे. मी जरी खासदार नसलो तरी तेवढीच ताकत माझी सरकारदरबारी आहे. एखादा प्रश्न मांडल्यास मुख्यमंत्री तातडीने दखल घेतात. पद नसले तरी फारसा फरक पडत नाही. तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर लढताना सामना बरोबरीत सुटतो. त्यामुळे अजून ताकद वाढवायची आहे. पुढील काळात तालुक्यात आघाडी झाली तर ठीक, नाहीतर ताकदीवर लढू. कर्नाटक उच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला काही अटी-शर्तीवर परवानगी दिली आहे. त्या निकालात २०१३ मध्ये जी केस मी जिंकलो होतो तिचा दाखला देण्यात आला आहे. निकालात माझ्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. असे त्यांनी नमूद केले. प्रास्ताविक रवींद्र करंजखेले यांनी केले. सूत्रसंचालन सुरेश घुले तर आभार देविदास दरेकर यांनी मानले.

चौकट

पुढच्या वेळी बैलगाडा शर्यतींचा विषय संपला असेल

बैलगाडा शर्यतीबाबत पक्षाला निर्णय घ्यावा लागेल. बैलगाडासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली जाईल. पुढे या भागात येईल त्यावेळी बैलगाडा विषय संपलेला असेल.

- संजय राऊत, खासदार

फोटोखाली: मंचर येथील शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना शिवसेना नेते संजय राऊत.