शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

धर्मनिरपेक्षतावाद्यांना भावना नाहीत का? जावेद अख्तर यांचा सवाल : शबाना आणि अख्तर यांच्याशी गप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 02:50 IST

शबाना आणि मी एकमेकांना कधी भेटलो ते आता आठवतही नाही. दोन्ही कुटुंबांचा अनेक वर्षांचा ॠणानुबंध आहे. एकमेकांवरील अतूट प्रेम आणि विश्वासाच्या मैत्रीपूर्ण नात्यावर वैवाहिक जीवनाचा प्रवास सुखकर आणि रुचकर झाला.

पुणे : शबाना आणि मी एकमेकांना कधी भेटलो ते आता आठवतही नाही. दोन्ही कुटुंबांचा अनेक वर्षांचा ॠणानुबंध आहे. एकमेकांवरील अतूट प्रेम आणि विश्वासाच्या मैत्रीपूर्ण नात्यावर वैवाहिक जीवनाचा प्रवास सुखकर आणि रुचकर झाला. आमच्यातही अनेकदा मतभेद होतात; मात्र आम्ही एकमेकांच्या मतांचा आदर करतो, प्रोत्साहन आणि भक्कम पाठिंबा देतो, असा गीतकार आणि लेखक जावेद अख्तर आणि अभिनेत्री शबाना आझमी यांनी आपल्या सुखी संसाराचा मंत्र सांगितला. ‘एक बीवी, दो टीव्ही’ हे आमच्या सुखी संसाराचे गुपित असल्याचे त्यांनी सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. ‘आजकाल लहानसहान गोष्टींवरून अनेकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. मात्र, धर्मनिरपेक्षता आणि राष्ट्रीयत्व जपणाºयांच्या भावनांचे काय?’ असा सवालही अख्तर यांनी उपस्थित केला.पाचव्या पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलमध्ये शबाना आझमीआणि जावेद अख्तर यांचे ‘मायस्टोरी, अवर स्टोरी’ हे चर्चासत्र रंगले. त्यांची ‘स्टोरी’ जाणून घेण्यासाठी सभागृहात एकच गर्दी झाली होती. या वेळी या द्वयीने लहानपणापासूनचे संस्कार, कलाक्षेत्रातील प्रवास, समाजातील बदलती स्थिती, विचारसरणी याबाबत खुलेपणाने मते नोंदवली.अख्तर म्हणाले, ‘‘लहानपणी जे शिकवले जाते, त्याचा मनावर खोलवर परिणाम होत असतो. मला लहानपणापासून कधीच धर्म शिकवला गेला नाही. धर्मनिरपेक्षता, स्त्री-पुरुष समानता, राष्ट्रीयता हीच मूल्ये संस्कारांतून रुजली. या मूल्यांना धक्का लागला तर त्रास होतो. मुलांवर लहानपणापासून राष्ट्रीयत्व, सामाजिक बांधिलकी, कला आदी संस्कार झाले पाहिजेत. त्यातूनच माणूस घडतो.’’शबाना आझमी म्हणाल्या, ‘‘गेल्या काही वर्षांमध्ये समाजात कमालीचा बदल झाला आहे. धर्म, जात हे विषय संवेदनशील झाले आहेत. त्यातून निर्माण होणारी विदारक परिस्थिती अस्वस्थ करणारी आहे. अशा वेळी कला हे सामाजिक बदल घडवणारे शस्त्र असते. स्त्री-पुरुष समानता आल्याशिवाय समाजाची प्रगती होऊच शकत नाही. स्त्री आणि पुरुष एकमेकांपेक्षा पूर्ण वेगळे आहेत, त्यांची स्वत:ची ओळख आहे. ही ओळख जपून समतोल साधला जायला हवा. पुरुष स्त्रीवादी असू शकत नाही किंवा स्त्री कणखर असू शकत नाही, हा समज मोडून काढायला हवा.’’‘स्टार’ होत असताना कलाकाराच्या आयुष्याला वेगळे वळण मिळत असते. खºया जगाशी, तेथील माणसांशी कलाकाराचासंपर्क तुटत जातो. संवादाचीदालने बंद होतात. अशा परिस्थितीत पुन्हा कलाच ही दालने खुलीकरते. विशिष्ट भूमिकेतीलकलाकार आणि प्रत्यक्ष आयुष्यातील कलाकार यांत खूप फरकअसतो, हे प्रेक्षकांनी समजूनघ्यायला हवे. मी आजवर मला आवडलेल्या आणि पटलेल्या भूमिकाच साकारत आले आहे’, असेही त्या म्हणाल्या.

टॅग्स :Javed Akhtarजावेद अख्तरPuneपुणेShabana ajhamiशबाना आझमी