शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
4
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
5
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
6
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
8
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
9
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
10
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
11
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
12
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
13
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
14
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
15
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
16
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
17
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
18
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
19
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
20
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल

धर्मनिरपेक्षतावाद्यांना भावना नाहीत का? जावेद अख्तर यांचा सवाल : शबाना आणि अख्तर यांच्याशी गप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 02:50 IST

शबाना आणि मी एकमेकांना कधी भेटलो ते आता आठवतही नाही. दोन्ही कुटुंबांचा अनेक वर्षांचा ॠणानुबंध आहे. एकमेकांवरील अतूट प्रेम आणि विश्वासाच्या मैत्रीपूर्ण नात्यावर वैवाहिक जीवनाचा प्रवास सुखकर आणि रुचकर झाला.

पुणे : शबाना आणि मी एकमेकांना कधी भेटलो ते आता आठवतही नाही. दोन्ही कुटुंबांचा अनेक वर्षांचा ॠणानुबंध आहे. एकमेकांवरील अतूट प्रेम आणि विश्वासाच्या मैत्रीपूर्ण नात्यावर वैवाहिक जीवनाचा प्रवास सुखकर आणि रुचकर झाला. आमच्यातही अनेकदा मतभेद होतात; मात्र आम्ही एकमेकांच्या मतांचा आदर करतो, प्रोत्साहन आणि भक्कम पाठिंबा देतो, असा गीतकार आणि लेखक जावेद अख्तर आणि अभिनेत्री शबाना आझमी यांनी आपल्या सुखी संसाराचा मंत्र सांगितला. ‘एक बीवी, दो टीव्ही’ हे आमच्या सुखी संसाराचे गुपित असल्याचे त्यांनी सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. ‘आजकाल लहानसहान गोष्टींवरून अनेकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. मात्र, धर्मनिरपेक्षता आणि राष्ट्रीयत्व जपणाºयांच्या भावनांचे काय?’ असा सवालही अख्तर यांनी उपस्थित केला.पाचव्या पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलमध्ये शबाना आझमीआणि जावेद अख्तर यांचे ‘मायस्टोरी, अवर स्टोरी’ हे चर्चासत्र रंगले. त्यांची ‘स्टोरी’ जाणून घेण्यासाठी सभागृहात एकच गर्दी झाली होती. या वेळी या द्वयीने लहानपणापासूनचे संस्कार, कलाक्षेत्रातील प्रवास, समाजातील बदलती स्थिती, विचारसरणी याबाबत खुलेपणाने मते नोंदवली.अख्तर म्हणाले, ‘‘लहानपणी जे शिकवले जाते, त्याचा मनावर खोलवर परिणाम होत असतो. मला लहानपणापासून कधीच धर्म शिकवला गेला नाही. धर्मनिरपेक्षता, स्त्री-पुरुष समानता, राष्ट्रीयता हीच मूल्ये संस्कारांतून रुजली. या मूल्यांना धक्का लागला तर त्रास होतो. मुलांवर लहानपणापासून राष्ट्रीयत्व, सामाजिक बांधिलकी, कला आदी संस्कार झाले पाहिजेत. त्यातूनच माणूस घडतो.’’शबाना आझमी म्हणाल्या, ‘‘गेल्या काही वर्षांमध्ये समाजात कमालीचा बदल झाला आहे. धर्म, जात हे विषय संवेदनशील झाले आहेत. त्यातून निर्माण होणारी विदारक परिस्थिती अस्वस्थ करणारी आहे. अशा वेळी कला हे सामाजिक बदल घडवणारे शस्त्र असते. स्त्री-पुरुष समानता आल्याशिवाय समाजाची प्रगती होऊच शकत नाही. स्त्री आणि पुरुष एकमेकांपेक्षा पूर्ण वेगळे आहेत, त्यांची स्वत:ची ओळख आहे. ही ओळख जपून समतोल साधला जायला हवा. पुरुष स्त्रीवादी असू शकत नाही किंवा स्त्री कणखर असू शकत नाही, हा समज मोडून काढायला हवा.’’‘स्टार’ होत असताना कलाकाराच्या आयुष्याला वेगळे वळण मिळत असते. खºया जगाशी, तेथील माणसांशी कलाकाराचासंपर्क तुटत जातो. संवादाचीदालने बंद होतात. अशा परिस्थितीत पुन्हा कलाच ही दालने खुलीकरते. विशिष्ट भूमिकेतीलकलाकार आणि प्रत्यक्ष आयुष्यातील कलाकार यांत खूप फरकअसतो, हे प्रेक्षकांनी समजूनघ्यायला हवे. मी आजवर मला आवडलेल्या आणि पटलेल्या भूमिकाच साकारत आले आहे’, असेही त्या म्हणाल्या.

टॅग्स :Javed Akhtarजावेद अख्तरPuneपुणेShabana ajhamiशबाना आझमी