शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पेरणीनंतर बियाणे उगवले नाही म्हणून रडत बसू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:08 IST

त्यानुसार बियाणे लावल्यावर ते उगवले नाही, अशी पश्चात्तापाची वेळ शेतकऱ्यांवर येऊ नये. त्यासाठी बियाणांची तपासणी पद्धत माहिती करून घ्यावी. ...

त्यानुसार बियाणे लावल्यावर ते उगवले नाही, अशी पश्चात्तापाची वेळ शेतकऱ्यांवर येऊ नये. त्यासाठी बियाणांची तपासणी पद्धत माहिती करून घ्यावी. या पद्धतीने बियाणांच्या यशस्वी तपासणीनंतरच पेरणी करण्याची सूचना देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी उगवणशक्ती तपासल्याशिवाय कोणत्याही पिकांच्या बियाण्याची पेरणी करू नये. सध्या खरिपाच्या पेरणीला सुरुवात होत आहे. त्यासाठी हा प्रयोग करावा व नंतर पेरणी करावी. एक पोते ओले करून त्यावर मोजून शंभर बिया ठेवा. त्या बियांवर आणखी एक पोते ओले करून त्याने झाका. पोत्याची ओल कमी होऊ देऊ नका, दोन ते तीन दिवसांनी बियांना अंकुर फुटले की त्याची मोजणी करा. १०० पैकी ८० बिया अंकुरल्या तर त्या बियाण्यांची उगवण शक्ती ८० टक्के आहे, असे समजावे.

तसेच उगवण शक्ती ७० टक्क्यांपेक्षा जास्त असल्यानंतरच बियाणे पेरावे. या व्यतिरिक्त आपण खरेदी केलेली बियाणांची बॅग फोडताना ज्या बाजूला टॅग आहे, त्या बाजूने न फोडता विरुद्ध बाजूने फोडावी. दुकादारांकडून पक्के बिल घ्यावे. पेरणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असेल तरच पेरणी करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास जिवाणू खतांची व औषधाची बीजप्रक्रिया करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

————————————————