शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

जागो नही, भागो ग्राहक भागो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2018 00:51 IST

सेवा पुरविणाऱ्यांकडून होणार ग्राहकांचे शोषण थांबावे आणि फसवणूक झाल्याप्रकरणातून न्याय मिळावा म्हणून ग्राहक मंचात तक्रार दाखल करण्यास सरसावत आहे.

पुणे : सेवा पुरविणाऱ्यांकडून होणार ग्राहकांचे शोषण थांबावे आणि फसवणूक झाल्याप्रकरणातून न्याय मिळावा म्हणून ग्राहक मंचात तक्रार दाखल करण्यास सरसावत आहे. मात्र मंचातील सुनावणीसाठी तक्रारदार गैरहजर राहण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. तक्रारदार सातत्याने गैरहजर राहत असल्याने प्रलंबित खटले मंचाकडून निकालात काढण्यात येत आहे.पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचात गेल्या तीन महिन्यांत ८४ खटले निकाली काढण्यात आले आहेत. त्यापैकी निम्मे म्हणजे तब्बल ४४ खटले तक्रारदारांनी सुनावणीसाठी गैरहजर राहिल्याने निकालात काढण्यात आले आहेत. त्यातील ६ प्रकरणांत तर तक्रारदार आणि ज्या सेवा पुरवठादाराविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे तो देखील सातत्याने गैरहजर राहत असल्याने खटला निकाली लागला आहे. ८४ पैकी ९ खटले तक्रार मागे घेतल्याने निकाली निघाले आहेत. तकाही खटल्यांत तक्रारदाराकडे पुरेसे पुरावे नसल्याचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे प्रत्यक्ष सुनावणी सुरू असताना आपला दावा टिकणार नाही याची चाहूल तक्रारदाराला लागते. त्यामुळे ते सुनावणीला हजरच राहत नाही. १९८५ मध्ये संपूर्ण राज्यात ग्राहक मंच सुरू करण्यात आले आहेत. त्यानुसार शहरातील नागरिकांना न्याय मागण्यासाठी पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचाची येथे स्थापना करण्यात आली आहे. या ग्राहक मंचात ग्राहकांच्या न्यायासाठी सुनावणी होत असते. वस्तुस्थिती लक्षात घेऊन फसवणूक झाल्या प्रकरणात ग्राहकांना मोबदला, त्यावरचे व्याज ग्राहक मंचात मिळवून दिला जातो. त्याचबरोबर मानसिक, शारीरिक त्रास, तक्रार अर्जाचा खर्चही ग्राहक मंच ग्राहकाला मिळवून देत असतो. अलीकडच्या काळात ग्राहक हक्काबाबत जागृत होत आहे. फसवणूक झाल्यास तो ग्राहक मंचात दाद मागत असतो. ग्राहकांनी मंचात दाद मागण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्याबरोबरच दाखल केलेल्या तक्रारदारांनीच दाव्यात गैरहजर राहण्याचे प्रमाण वाढले आहे.>...या कारणांमुळे तक्रारदार राहताहेत गैरहजरतक्रार दाखल केल्यानंतर तक्रारदार आणि ज्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्या जाब देणाºयांमध्ये आणि तक्रारदारांमध्ये समझोता होतो. अपेक्षित मोबदला मिळाला की तक्रारदार समाधानी होऊन खटल्याकडे दुर्लक्ष करतो.मात्र, याबाबतची माहिती पक्षकारांकडून मंचात देण्यात येत नाही. त्यामुळे तक्रारदार, जाब देणार दोघेही गैरहजर राहतात. तर काही प्रकरणांमध्ये कौटुंबिक कारणांमुळे तक्रारदार हजर राहू शकत नाहीत.खटला पुण्यात दाखल झाला असेल तक्रारदार परदेशात किंवा दुसºया राज्यात राहण्यासाठी गेला असले तर त्याला सुनावणीला हजर राहणे शक्य होत नाही. तसेच विषयाची आर्थिक किंमत आणि त्यासाठी लागणाºया वेळेचा विचार करून काही तक्रारदार हजर राहण्याचे टाळतात.>लवकर तारीख मिळावीखटल्यांचे प्रमाण वाढल्याने प्रकरणाच्या सुनावणीसाठी मोठ्या कालावधीनंतर तारीख दिली जाते. तीनपेक्षा अधिक महिन्यांच्या कालावधीची तारीख मिळाली तर प्रकरण लांबते. त्यामुळे ग्राहकाला त्वरित न्याय मिळत नाही.दाखल केल्यापासून एक वर्षात निकाल लागणे अपेक्षित असते. मात्र प्रत्यक्षात तसे होत नाही. त्यामुळे लवकरात लवकर पुढील तारीख मिळावी, यासाठी प्रयत्न होणे गरेजेचे आहे, अशी मागणी अ‍ॅड. सुदीप केंजळकर यांनी केली आहे.>अनेकवेळा बाहेरचप्रकरण मिटवले जातेतक्रारदार गैरहजर राहण्यामागे अनेक कारणे असतात. त्यामुळे सुनावणीसाठी पुढील तारीख देतात. मात्र, बराच कालावधी तक्रारदार हजर न राहिल्यास, असे दावे मंचाकडून निकालात काढण्यात येतात. साधारणपणे दीड ते दोन वर्षे तक्रारदार हजर न राहिल्यास ग्राहक मंचाकडून, असे पाऊल उचलले जाते. असा प्रकारे दावे निकाली काढल्याची संख्या वाढत आहे. अनेक प्रकरणांत बाहेरच प्रकरण मिटवले जाते. त्यामुळे हे प्रमाण वाढत आहे.- अ‍ॅड. सुदीप केंजळकर