शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

'विठ्ठल-रुख्मिणी'ने  केला धावा आणि ज्ञानेश्वराने वाचवले प्राण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 20:21 IST

अडचणीत देव कुठल्या रूपात भेटले सांगता येत नाही. याच वाक्याचा प्रत्यय दत्तवाडी भागातील चौघांना आला असून एका तरुणाने जीवाची बाजी लावून त्यांचे प्राण वाचवले आहे. अंगावर शहारे आणणारी घटना सांगताना घटनास्थळी असणारी सर्व गर्दी तरुणाचे कौतुक करत होती .

ठळक मुद्देप्राणांची बाजी लावत दत्तवाडी भागातील ज्ञानेश्वर राऊतने चौघांना वाचवले 'विठ्ठल-रुख्मिणी'ने  केला धावा आणि ज्ञानेश्वराने वाचवले प्राण 

पुणे :अडचणीत देव कुठल्या रूपात भेटले सांगता येत नाही. याच वाक्याचा प्रत्यय दत्तवाडी भागातील चौघांना आला असून एका तरुणाने जीवाची बाजी लावून त्यांचे प्राण वाचवले आहे. अंगावर शहारे आणणारी घटना सांगताना घटनास्थळी असणारी सर्व गर्दी तरुणाचे कौतुक करत होती . 

बुधवार (दि. २५) रोजी झालेल्या पावसामुळे शहरात चांगलीच दाणादाण उडालेली बघायला मिळाली. काही तासांमध्ये आलेल्या पावसाच्या सरींनी शहराचे जनजीवन विस्कळीत झाले. काडी काडी जमवून उभे केलेले संसार डोळ्यासमोर वाहून जाताना अनेकांना अश्रू अनावर होत होते. अशाच एका क्षणी जुन्या दत्तवाडीत भागात प्रवेश केला आणि तिथल्या फरशीपुलापासून स्थानिकांची घरं, गाड्याही वाहून गेल्या. त्यामुळे डोळ्यासमोर अनेक नागरिक बेघर झालेली असताना या तरुणाने दाखवलेली तत्परता कौतुकास्पद आहे यात शंका नाही. 

याबाबत अधिक माहिती अशी की, दत्तवाडी भागात ज्ञानेश्वर राऊत हा तरुण राहतो. तिथेच असणाऱ्या प्रेरणा वॊशिंग सेंटरमध्ये काम करत शेजारीच त्याचं घर आहे. बुधवारी पाणी वाढल्यावर त्याने तात्काळ घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला.बाहेर पडल्यावर फरशीपुलावरून आलेल्या पाण्याच्या प्रवाहात त्याला एक मुलगा वाहून आल्याचे दिसून आले. काही क्षण त्या मुलाला पकडण्याचा प्रयत्न केला तर मुलगा हातातून निसटून गेला. मात्र पुढे जाऊन तो पत्र्याच्या छतावर अडकला. मुलगा आक्रोश करत होता पण प्रवाह बघून कोणीही आत जाण्यास धजावत नव्हते. पण ज्ञानेश्वरने मात्र काही मागच्या पत्र्यांवर चढून मुलापर्यंत पोचला आणि त्याला वाचवले. 

मुलाला घेऊन परतत असताना त्याला पायाखालून 'आम्हाला वाचवा' असा आवाज यायला लागला. तेव्हा त्याच्या जवळच राहणारे क्षीरसागर कुटुंबीय घरात अडकल्याचे त्याच्या लक्षात आले. पती विठ्ठल, पत्नी रुख्मिणी आणि मुलगी मनीषा असे कुटुंब वाचवण्यासाठी हाका मारत होते पण रात्र वैऱ्याची होती. ज्ञानेश्वरने मुलाला सुरक्षित पोचवले आणि तो पुन्हा थांबला. अखेर त्याने प्रयत्न करून पत्रा उचकण्यास सुरुवात केली. आजूबाजूला पाणी आणि वर धुवाधार बरसणारा पाऊस त्यामुळे त्याचे काम अवघड होते. पण अखेर त्याच्या प्रयत्नांना यश आले आणि तिघेही सुखरूप बाहेर पडले. स्वतःसाठी जगणाऱ्यांच्या जगात दुसऱ्यासाठी जीवावर उदार होणाऱ्या या धाडसी तरुणाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. 

  • क्षणभर मलाही भीती वाटली होती पण माझ्यासमोर त्यांना वाचवण्याचे उद्दिष्ट होते. अडचणी येत होत्या पण त्यांचे जीव वाचले याचा अधिक आनंद आहे. आपण सगळे माणसं आहोत एकमेकांना मदत करायलाच हवी. 

    ज्ञानेश्वर राऊत, धाडसी तरुण 

 

  • ज्ञानेश्वर होता म्हणून आज आम्ही जिवंत आहोत. आम्ही प्रयत्न करूनही पाण्याच्या लोंढ्यामुळे दार उघडत नव्हते. तो देवदूतासारखा आला. घर सगळे वाहून गेले आहे पण जीव वाचला याचाच आनंद आहे. 

    रुख्मिणी क्षीरसागर, पाण्यात अडकलेल्या महिला 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर