शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
2
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
3
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
4
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
5
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
6
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
7
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
8
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
9
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
10
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
11
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
12
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
13
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
14
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
15
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
16
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
17
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
18
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
19
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
20
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
Daily Top 2Weekly Top 5

'एकही आरटीओ आॅफीस माहिती नाही, दोन-तीनच अधिकाऱ्यांना ओळखतो' , असं का म्हणाले दिवाकर रावते घ्या जाणून !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 17:59 IST

‘मला आजपर्यंत एकही आरटीओ आॅफीस माहिती नाही. आरटीओ असलेल्या केवळ दोन-तीन अधिकाऱ्यांना ओळखतो. मला त्याच्याशी देणंघेणं नाही.

पुणे : ‘मला आजपर्यंत एकही आरटीओ आॅफीस माहिती नाही. आरटीओ असलेल्या केवळ दोन-तीन अधिकाऱ्यांना ओळखतो. मला त्याच्याशी देणंघेणं नाही. प्रशासकीय यंत्रणा चांगली झाली पाहिजे, यासाठी माझा प्रयत्न आहे,’ असे वक्तव्य खुद्द परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनीच रविवारी पुण्यात केले. यावेळी त्यांनी आरटीओ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाच्या पध्दतीवरही नाराजी व्यक्त करून त्यांचे कान टोचले.

         मोटार वाहन विभाग (आरटीओ) कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्यच्या हीरक महोत्सवी सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष विश्वास काटकर, सरचिटणीस गजानन शेटे, आरटीओ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पाटील, सरचिटणीस सुरेंद्र सरतापे, कार्याध्यक्ष जगदीश कांदे, कोषाध्यक्ष नितीन नागरे, मिलिंद सरदेशमुख, प्रशांत पवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमामध्येनिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. 

          कार्यक्रमाच्या सुरूवातीला उपस्थितांनी घेतलेल्या शपथेचा उल्लेख करून रावते यांनी कर्मचाऱ्यांसह संघटनेच्यापदाधिकाऱ्यांनीही  धारेवर धरले. ते म्हणाले, ‘भ्रष्टाचारापासून अलिप्त राहत निकोप प्रशासन चालवू’ अशी शपथ घेता म्हणजे आतापर्यंत जे काम आपण तेच केले याची ही कबुलीच आहे. नवीन पदे भरतीसाठी अधिकारी नाहीत. त्यासाठी कर्मचारी संघटनाही आग्रही दिसत नाही. एकाकडे चार-चार पदांचा भार आहे. तरीही ते काम करतात. टेबलासाठी भांडणे केली जातात. अधिकाऱ्यांकडून शिफारशी केल्या जातात. कर्मचाऱ्यांनाच नवीन भरती नको वाटते. या विभागात हे व्यस्त गणित आहे. प्रामाणिकपणे राबणारे किती आहेत, असा सवाल रावते यांनी उपस्थित केला. कर्मचाºयांचे प्रश्न मी सातत्याने मांडत आलो आहे. संघटनांनीही त्यांना गाजरे न दाखविता हक्कासाठी भांडायला हवे, असे म्हणत रावते यांनी संघटनांनीही खडे बोल सुनावले.

उच्च न्यायालयात आव्हान देणार

उच्च न्यायालयाने मोटार वाहन निरीक्षकांची ८३३ पदांची भरती प्रक्रिया रद्द केली आहे. त्यावर राज्य सरकारकडून पुन्हा न्यायालयात अपील केले जाईल. मी स्वत: न्यायालायत बाजू कशी मांडायची हे सांगितले आहे. उच्च न्यायालयात सकारात्मक निर्णय न झाल्यास सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली जाईल, असे दिवाकर रावते यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, कार्यक्रमातील भाषणादरम्यान त्यांनी अधिकाऱ्यांकडून भरतीसाठी अनेकदा अडथळे आणले जात असल्याचे नमुद केले. कंत्राटी कर्मचाºयांना शासन सेवेत सामावून घेण्यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक आहेत. पण मार्ग कसा काढायचा हे समजत नाही, असेही रावते म्हणाले.

वाघाच्या नादी लागु नका

कार्यक्रमामध्ये विश्वास काटकर यांनी दिवाकर रावते यांचा उल्लेख शिवसेनेचा वाघ असा केला. त्याचा संदर्भ घेऊन रावते म्हणाले, एका मंत्रीमंडळाच्या बैठकीत वनखात्याचा आढावा घेतला जात होता. या खात्याचे मंत्री माझ्या शेजारीच बसले होते. १५ कोटी झाडे लावली म्हणून खुप जाहीरात झाली. पण यवतमाळमध्ये एक वाघ पकडण्यासाठी किती खर्च करावा लागला. म्हणून वाघाच्या नादी कुणी लागायचे नाही, असे म्हणत रावते यांनी वनमंत्र्यांना टोमणा मारला.

टॅग्स :PuneपुणेDiwakar Raoteदिवाकर रावतेShiv SenaशिवसेनाRto officeआरटीओ ऑफीस