शहरं
Join us  
Trending Stories
1
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
2
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
3
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
4
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
5
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
6
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
7
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
8
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
9
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
10
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
11
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
12
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
13
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
14
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
15
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
16
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
17
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
18
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
19
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
20
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीबाधितांना राज्यात 458 कोटी रूपयांचे वाटप; ८ लाख ५५ हजार २६६ लाभार्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 07:24 IST

खरीप हंगामासाठीच्या पंतप्रधान पीक विमा योजनेत राज्यातून ८४ लाख शेतकऱ्यांनी सहभाग  घेतला.

पुणे : पंतप्रधान पीक विमा योजनेत राज्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना ४५८ कोटी रुपयांची नुकसान भरपाई आतापर्यंत देण्यात आली. ८ लाख ५५ हजार २६६ शेतकरी त्याचे लाभार्थी आहेत. रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने आपला या योजनेतील असहकार अजून सुरूच ठेवला असून त्यांनी अद्याप एकाही शेतकऱ्याला पैसे दिलेले नाहीत.

खरीप हंगामासाठीच्या पंतप्रधान पीक विमा योजनेत राज्यातून ८४ लाख शेतकऱ्यांनी सहभाग  घेतला. त्याचे काही हजार कोटी रुपये केंद्र, राज्य सरकारने व शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांना दिले आहेत. जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसात यंदाच्या खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यापैकी ३८ लाख ८० हजार विमाधारक शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांकडे दावे दाखल केले.

अन्य बाधित शेतकऱ्यांनाही लवकर भरपाई 

कृषी विभाग व कंपन्यांनी ३८ लाख ८० हजार शेतकऱ्यांसाठी १ हजार ३७३ कोटी १७ लाख रुपयांची नुकसान भरपाई निश्चित केली आहे. रिलायन्स वगळता अन्य ५ कंपन्यांनी आतापर्यंत साडेआठ लाख अर्जदार शेतकऱ्यांना ४५८ कोटी रुपयांचे वाटप केले आहे. अन्य बाधित शेतकऱ्यांचे दावेही मंजूर असून नुकसान भरपाईचे पैसे लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा होतील. 

तक्रारीची दखल अद्याप नाहीच

भारतीय कृषी विमा, बजाज अलायन्स, एचडीएफसी, इफ्को टोकियो, रिलायन्स जनरल इन्शुरन्स, आयसीआयसीआय लोम्बार्ड या ६ कंपन्यांची केंद्राने राज्यासाठी विमा कंपनी म्हणून नियुक्ती केली आहे. रिलायन्स वगळता सर्व कंपन्यांनी पैसे देण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेच्या केंद्रीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे कृषी आयुक्तांनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीबाबत लेखी तक्रार केली आहे, मात्र त्याची अद्याप दखल घेतलेली नाही. 

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र