शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

रेशनिंगवर मुदतबाह्य डाळींचे होतेय वितरण: एफडीओकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 14:03 IST

गव्हाचा दर्जादेखील खराब असल्याचे दुकानदारांचे म्हणणे

ठळक मुद्देकाही महिन्यांपासून शहरात शिधापत्रिकाधारकांना खराब धान्याचा पुरवठा शिधापत्रिकाधारकांच्या रोषाला आम्हालाच जावे लागते सामोरे

पुणे : पाकिटावरील तारीख बदलून डाळी वितरित करण्यापाठोपाठ शिधापत्रिकाधारकांना मुदतबाह्य डाळींच्या पाकिटांचे वितरण केले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच, काही ठिकाणी डाळींचा दर्जा अत्यंत खराब आहे. गेले काही महिने सातत्याने खराब दर्जाच्या गव्हाचा पुरवठा होत असल्याचे काही दुकानदारांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.काही महिन्यांपासून शहरात शिधापत्रिकाधारकांना खराब धान्याचा पुरवठा होत आहे. तसेच, तूरडाळ व हरभराडाळ दर महिन्याला मिळेलच, असेही नाही. याबाबत ग्राहकांनी दुकानदारांकडे विचारणा केली असता, अन्नधान्य वितरण कार्यालयाकडून नियमित पुरवठाच केला जात नसल्याचे उत्तर मिळाले. याबाबत अधिकाऱ्यांना विचारल्यास ‘आम्हाला जसे धान्य मिळते तसाच धान्याचा पुरवठा केला जातो,’ असे उत्तर मिळत असल्याचे दुकानदारांनी सांगितले. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांच्या रोषाला आम्हालाच सामोरे जावे लागत असल्याचेही दुकानदारांनी स्पष्ट केले.  याबाबत ग्राहक संरक्षण सिमितीचे शहराध्यक्ष संदीप दारवटकर यांनी अन्नधान्य वितरण कार्यालयाकडे (एफडीओ) तक्रार नोंदविली आहे. या महिन्यात पर्वती दर्शन येथील एका रास्त धान्य दुकानातून वितरित होणाऱ्या डाळीच्या पाकिटावर ४ एप्रिल २०१९ रोजी डाळ पॅकबंद केल्याचा उल्लेख आहे. तसेच, याच पाकिटावर सहा महिन्यांच्या आत वापर करणे चांगले, अशा आशयाचा मजकूर दिलेला आहे. जुलै २०१९मधे वितरित केलेल्या डाळीच्या पाकिटांवर छापलेल्या तारखेवर बदललेली तारीख छापली होती. त्या वेळी २०१८ या सालावर २०१९ सालाचा छाप उमटविण्यात आला होता. दर्जेदार धान्याचा पुरवठा करण्यात हयगय करणाऱ्या संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी दारवटकर यांनी केली आहे. .........दुकानदारांनी दर्जा खराब असल्याचे केले मान्य कोथरूडमधील एका रास्त धान्य दुकानदारांने डाळींचा दर्जा खराब असल्याचे मान्य केले. तसेच, काही महिन्यांपासून गहूदेखील खराब दर्जाचा येत असल्याचे त्यांनी सांगितले. .........खराब दर्जाच्या धान्याचा पुरवठा करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी होत आहे. .....

टॅग्स :Puneपुणे