शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: DC ची अडचण वाढली, रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी अन् ३० लाखांचा दंड
2
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
3
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
4
"सत्तेचा गैरवापर करणे ही पंतप्रधान मोदींची खासियत"; शरद पवार यांचा शिरूरमधून हल्लाबोल
5
एक एक गोष्ट बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
6
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
7
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
8
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
9
POK मध्ये युद्धजन्य परिस्थिती; पाकिस्तानच्या दादागिरीविरोधात काश्मिरी जनता रस्त्यावर
10
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
11
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
12
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती
13
Fact Check : "मी तुम्हाला बेरोजगार करेन..."; योगी आदित्यनाथ यांच्या Video मागचं जाणून घ्या, 'सत्य'
14
Paytm चे 'अच्छे दिन' परतले; २ दिवसांत १३%ची वाढ, काय म्हणतायत एक्सपर्ट, किती आहे टार्गेट प्राईज?
15
मसाल्यांमधील ETO केमिकल्सवर सरकार अंकुश लावण्याच्या तयारीत, निर्यातदारांना करावं लागणार 'हे' काम
16
रवींद्र धंगेकरांचा भाजपावर गंभीर आरोप, म्हणाले, ‘पुण्यात पैशांचे ट्रक आलेत, आज फडणवीस वाटप करतील’
17
प्रज्वल रेवण्णा प्रकरण उघडकीस आणणारा भाजपा नेता अडचणीत, पोलिसांनी केली अटक, समोर आलं असं कारण   
18
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
19
"राहुल गांधी हे 'रणछोड दास'; जे स्वत: निवडणूक जिंकू शकत नाही, ते आपल्या पक्षाला..."
20
खळबळजनक ! नोटांनी भरलेला 'छोटा हाथी' वाहन पलटी; रस्त्यावर पडले तब्बल ७ कोटी

जिरायती गावातील सरपंचाशी मुख्यमंत्र्यानी साधला संवाद पाणी, चारा टंचाई विषयी चर्चा 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 5:01 PM

 बारामती तालुक्यातील पाणी टंचाई, चारा टंचाई, रोजगार हमीची कामे तसेच दुष्काळी प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. 

ठळक मुद्देचारा डेपोच्या मागणीचा विचार मंत्रालय बैठकीत करू : मुख्यमंत्र्याचे आश्वासन 

बारामतीबारामती तालुक्यातील जिरायती भागातील सरपंचांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑडिओ कॉन्फरन्स्द्वारे संवाद साधला. तालुक्यातील पाणी टंचाई, चारा टंचाई, रोजगार हमीची कामे तसेच दुष्काळी प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर काऱ्हाटी, साबळेवाडी, , मोरगाव, खराडेवाडी, कटफळ आदी ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी सध्या गावाला भेडसावणाऱ्या प्रश्न  मांडले. यावेळी साबळेवाडीचे सरपंच गणेश शिंदे यांनी ‘राष्ट्रीय पेलजल योजना मंजुर झाली आहे. मात्र वनविभाग व रेल्वे प्रशासन जागेला मंजुरी देत नाहीत, अशी तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉन्फरन्स् कॉलवर असणारे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना या प्रश्न लक्ष घालून अहवाल द्यावा, अशी सुचना केली. तसेच साबळेवाडीचे सरपंच शिंदे यांनी शिरसाई योजनेतील पाण्याचा कोटा वाढवून मिळावा अशी मागणी  मुख्यमंत्र्यांकडे  केली. तर मोरगावचे सरपंच निलेश केदारी यांनी ‘नाझरेचे पाणी पंधरा दिवसात संपणार आहे. त्यामुळे मोरगाव प्रादेशिक पाणी योजनेला जेजुरी एमआयडीसीचे पाणी जोडून मिळावे, अशी मागणी केली. तसेच खराडेवाडीचे सरपंच दत्तात्रय खराडे व काऱ्हाटीचे सरपंच बबन जाधव  यांनी ‘चारा छावणी ऐवजी चारा डेपो टंचाईग्रस्त गावांमध्ये सुरू करावा अशी मागणी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी ‘हा मंत्रालयस्तरावरचा विषय आहे. दोन दिवसात मंत्रालयामध्ये बैठक होईल. त्यावेळी हा विषय चर्चेला घेऊ, असे आश्वासन दिले. तसेच काऱ्हाटीचे सरपंच जाधव यांनी ‘१ जुनपर्यंत शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळावे अशी  मागणी केली. दरम्यान, यावेळी प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांच्यासह जिरायती भागातील सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते. ---------------------------

टॅग्स :BaramatiबारामतीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFarmerशेतकरीsarpanchसरपंच