शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

विद्युतपंपांचे वीजजोड कट केल्याने असंतोष, ३० हजार एकरांवरील ऊसशेती अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 01:08 IST

केडगाव : दौंड तालुक्यातील नदीकाठच्या गावातील थकबाकीपोटी सर्व विद्युतपंपांचे वीजजोड महावितरणने तोडले आहेत.

केडगाव : दौंड तालुक्यातील नदीकाठच्या गावातील थकबाकीपोटी सर्व विद्युतपंपांचे वीजजोड महावितरणने तोडले आहेत. यामध्ये एकूण तीन हजार वीजजोड बंद केल्याने दौंड तालुक्यातील एकूण ३० हजार एकर क्षेत्रातील ऊसपीक जळण्याची शक्यता आहे. यासंदर्भात शेतक-यांना कसलीही पूर्वसूचना न देता घाईघाईने महावितरणने ही कारवाई सुरू केली असल्याचा आरोप शेतक-यांनी केला आहे.नदीकाठच्या पारगाव व नानगावचे वीजजोड गेल्या दोन दिवसांपासून बंद करण्यात आले आहेत. लवकरच राहू, पिंपळगाव, देलवडी, हातवळण, कानगाव, उंडवडी, सोनवडी या गावातील विद्युतपंपांवर कारवाई करण्यात येणार आहे. या गावांतील लाखो रुपयांचे वीजबिल थकल्याने ही कारवाई केल्याचे समजते.शासनाकडून कर्जमाफीप्रमाणे वीजबिल माफ होईल, या आशेने अनेक शेतक-यांनी आपली वीजबिले भरली नव्हती. दोन दिवसांपूर्वी केडगाव येथील विभागीय कार्यालयात वीजजोड बंद करण्याचा संदेश येताच महावितरणने लगबगीने कारवाई करण्यास सुरुवात केली. यावर्षी १४ आॅक्टोबरपर्यंत मुबलक पाऊस होता. त्यामुळे गेले दोन, तीन महिने अनेक शेतक-यांनी आपले विद्युतपंप बंद ठेवले होते. पाऊस उघडल्यानंतर गेल्या आठवड्यात बहुतांशी विद्युतपंप सुरू करण्यात आले होते. महावितरणने कारवाईसुरू करताच शेतकºयांची तारांबळ उडाली आहे.यासंदर्भात पारगावचे शेतकरी सुभाष बोत्रे म्हणाले, की सहा महिन्यांपासून आमच्या विद्युतपंपांना कसलेही बिल महावितरणकडून आले नाही. बिल आले नसल्याने एकूण किती पैसे भरायचे, याची माहिती शेतकºयांना नाही. विशेष म्हणजे हा वीजजोड बंद करताना सर्व शेतकºयांना लेखी सूचना देणे गरजेचे होते. आमचे वीजजोड पूर्ववत सुरू न केल्यास शेतकºयांच्या वतीने आंदोलन केले जाईल.महावितरणचे केडगाव शाखा अभियंता एम. के. पिसाळ म्हणाले, की आम्हाला वरिष्ठांकडून थकबाकीदारांचे वीजजोड बंद करण्याचे आदेश आले आहेत. त्यानुसार कार्यवाही चालू आहे. ज्या शेतकºयांना वीजबिल मिळालेनाही, त्यांनी आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, आपले वीजबिल भरून टाकावे, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यातआले आहे.>इंदापूरला १,१०० कृषिपंपांची बत्ती गुलभिगवण : महावितरण तुमचा बळीराजावर भरोसा नाय काय! असे म्हणण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. महावितरणने आता थकबाकीदार शेतकºयांची इंदापूर विभागातील ८०० रोहित्रे व वालचंदनगर विभागातील २९९ रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे शेतकºयांची एकच तारांबळ उडाली आहे. तीन, चार वर्षे दुष्काळी परिस्थितीला तोंड देत असताना आता कुठे चांगल्या पावसामुळे दिलासा मिळतो ना मिळतो तोच महावितरण शेतीचे पाणी बंद करीत आहे. त्यामुळे तोंडचा घास काढून घेतल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.इंदापूर तालुक्यातील भिगवण, तक्रारवाडी, मदनवाडी, पोंधवडी, भादलवाडी येथील तलाव तीन-चार वर्षांपासून कोरडेठाक पडलेले आहेत. त्यामुळे पिण्यासाठी पाणी पुरविताना नाकीनऊ आले होते. शेतातील पिके जळून गेली होती. तलावात पाणी नसतानासुद्धा वीजबिल मात्र नियमितयेत होते.यावर्षी शेतातून चार पैैसे मिळतील व थकबाकी कमी होईल, असे वाटत असतानाच वीज बंद करून महावितरणने कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली आहे.

टॅग्स :Puneपुणे