शहरं
Join us  
Trending Stories
1
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
2
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
3
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? UAE विरुद्ध खेळणार नसल्याची मोठी माहिती आली समोर
4
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
5
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
6
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
7
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
8
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
9
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
10
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
11
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
12
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
13
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
14
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
15
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
16
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
17
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
18
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
19
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?
20
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र

विद्युतपंपांचे वीजजोड कट केल्याने असंतोष, ३० हजार एकरांवरील ऊसशेती अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 01:08 IST

केडगाव : दौंड तालुक्यातील नदीकाठच्या गावातील थकबाकीपोटी सर्व विद्युतपंपांचे वीजजोड महावितरणने तोडले आहेत.

केडगाव : दौंड तालुक्यातील नदीकाठच्या गावातील थकबाकीपोटी सर्व विद्युतपंपांचे वीजजोड महावितरणने तोडले आहेत. यामध्ये एकूण तीन हजार वीजजोड बंद केल्याने दौंड तालुक्यातील एकूण ३० हजार एकर क्षेत्रातील ऊसपीक जळण्याची शक्यता आहे. यासंदर्भात शेतक-यांना कसलीही पूर्वसूचना न देता घाईघाईने महावितरणने ही कारवाई सुरू केली असल्याचा आरोप शेतक-यांनी केला आहे.नदीकाठच्या पारगाव व नानगावचे वीजजोड गेल्या दोन दिवसांपासून बंद करण्यात आले आहेत. लवकरच राहू, पिंपळगाव, देलवडी, हातवळण, कानगाव, उंडवडी, सोनवडी या गावातील विद्युतपंपांवर कारवाई करण्यात येणार आहे. या गावांतील लाखो रुपयांचे वीजबिल थकल्याने ही कारवाई केल्याचे समजते.शासनाकडून कर्जमाफीप्रमाणे वीजबिल माफ होईल, या आशेने अनेक शेतक-यांनी आपली वीजबिले भरली नव्हती. दोन दिवसांपूर्वी केडगाव येथील विभागीय कार्यालयात वीजजोड बंद करण्याचा संदेश येताच महावितरणने लगबगीने कारवाई करण्यास सुरुवात केली. यावर्षी १४ आॅक्टोबरपर्यंत मुबलक पाऊस होता. त्यामुळे गेले दोन, तीन महिने अनेक शेतक-यांनी आपले विद्युतपंप बंद ठेवले होते. पाऊस उघडल्यानंतर गेल्या आठवड्यात बहुतांशी विद्युतपंप सुरू करण्यात आले होते. महावितरणने कारवाईसुरू करताच शेतकºयांची तारांबळ उडाली आहे.यासंदर्भात पारगावचे शेतकरी सुभाष बोत्रे म्हणाले, की सहा महिन्यांपासून आमच्या विद्युतपंपांना कसलेही बिल महावितरणकडून आले नाही. बिल आले नसल्याने एकूण किती पैसे भरायचे, याची माहिती शेतकºयांना नाही. विशेष म्हणजे हा वीजजोड बंद करताना सर्व शेतकºयांना लेखी सूचना देणे गरजेचे होते. आमचे वीजजोड पूर्ववत सुरू न केल्यास शेतकºयांच्या वतीने आंदोलन केले जाईल.महावितरणचे केडगाव शाखा अभियंता एम. के. पिसाळ म्हणाले, की आम्हाला वरिष्ठांकडून थकबाकीदारांचे वीजजोड बंद करण्याचे आदेश आले आहेत. त्यानुसार कार्यवाही चालू आहे. ज्या शेतकºयांना वीजबिल मिळालेनाही, त्यांनी आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, आपले वीजबिल भरून टाकावे, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यातआले आहे.>इंदापूरला १,१०० कृषिपंपांची बत्ती गुलभिगवण : महावितरण तुमचा बळीराजावर भरोसा नाय काय! असे म्हणण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. महावितरणने आता थकबाकीदार शेतकºयांची इंदापूर विभागातील ८०० रोहित्रे व वालचंदनगर विभागातील २९९ रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे शेतकºयांची एकच तारांबळ उडाली आहे. तीन, चार वर्षे दुष्काळी परिस्थितीला तोंड देत असताना आता कुठे चांगल्या पावसामुळे दिलासा मिळतो ना मिळतो तोच महावितरण शेतीचे पाणी बंद करीत आहे. त्यामुळे तोंडचा घास काढून घेतल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.इंदापूर तालुक्यातील भिगवण, तक्रारवाडी, मदनवाडी, पोंधवडी, भादलवाडी येथील तलाव तीन-चार वर्षांपासून कोरडेठाक पडलेले आहेत. त्यामुळे पिण्यासाठी पाणी पुरविताना नाकीनऊ आले होते. शेतातील पिके जळून गेली होती. तलावात पाणी नसतानासुद्धा वीजबिल मात्र नियमितयेत होते.यावर्षी शेतातून चार पैैसे मिळतील व थकबाकी कमी होईल, असे वाटत असतानाच वीज बंद करून महावितरणने कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली आहे.

टॅग्स :Puneपुणे