शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारामुळे अपंगत्व ; नऊ वर्षांनी पोलिसांनी घेतला जबाब

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 11:40 IST

अशीच वेळ जर एखाद्या मंत्र्यांच्या मुलांवर किंवा नात्यावर आली असती तर पोलिसांनी कारवाई करताना अशीच दिरंगाई केली असती का?

ठळक मुद्देनऊ वर्षांनी पोलिसांनी घेतला जबाब : तपासातील प्रगती शंकास्पद असल्याचा आरोप

युगंधर ताजणे- पुणे : अपघातानंतर रुग्णालयात दाखल केल्यानंतर तेथील चुकीच्या उपचाराने अपंगत्व आले. ज्या डॉक्टरांमुळे पुढील आयुष्यभर अपंगत्व सोबत घेऊन जगावे लागणार आहे, त्यांच्याबद्दल पोलिसांकडे तक्रार करुन पदरी अपयश आले. तब्बल नऊ वर्षांनी पोलिसांनी त्या तक्रारीची दखल घेऊन शेवटी जबाव नोंदवून घेतला. मात्र जबाब घेऊन दोन वर्षे उलटून गेली असतानादेखील अद्याप तपासातील प्रगती शंकास्पद आहे. अशीच वेळ जर एखाद्या मंत्र्यांच्या मुलांवर किंवा नात्यावर आली असती तर पोलिसांनी कारवाई करताना अशीच दिरंगाई केली असती का? असा प्रश्न प्रकाश परदेशी यांच्यावर पोलिसांकडून झालेल्या तक्रार नोंदणीच्या निष्काळजीपणाबाबत उपस्थित झाला आहे. फिर्यादी परदेशी (वय ६३, रा. मार्केटयार्ड रस्ता) यांचा १७ मे २००६ रोजी दुपारी अडीचला बंडगार्डन वाहतूक विभाग येथे अपघात झाला. यात त्यांच्या रिक्षाला एका चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. जखमी झाल्यानंतर त्यांना रुबी रुग्णलयात दाखल केले. त्या वेळी त्यांच्यावर उपचार करणाºया डॉ. जयंत शहा यांनी डाव्या पायाच्या खुब्याचा व गुडघ्याचा एक्सरे काढण्यास सांगितले. एक्सरे काढल्यानंतर  ‘तुम्हाला कुठेही फ्रॅक्चर झालेले दिसत नाही. तुम्ही दोन ते तीन महिने घरी आराम करा. आराम केल्यानंतर तुम्हाला बरे वाटेल.’ असे डॉक्टरांनी सांगितले. मात्र परदेशी यांनी पायाला वेदना होत असल्याचे सांगितल्यानंतर डॉक्टरांनी वेदनाशामक इंजेक्शन देऊन तुम्हाला कुठेही फ्रॅक्चर झाले नसल्याचे सांगून डिस्चार्ज दिला. दुखणे वाढल्यानंतर परदेशी यांनी त्यांच्या ओळखीच्या डॉ. केरीग यांच्याकडे तपासणी केल्यानंतर परदेशी यांना डाव्या पायाच्या खुब्यात फॅ्रक्चर असल्याचे सांगून शस्त्रक्रियेचा सल्ला दिला.................पुन्हा एकदा पोलिसांकडे अर्ज केलाडॉक्टरांच्या चुकीचा रिपोर्ट दिल्याची खात्री झाल्यानंतर त्याच्या झालेल्या त्रासाबद्दल परदेशी यांनी सुरुवातीला ११ आॅगस्ट २००९ रोजी एक खिडकी योजनेद्वारे पोलिसांकडे तक्रार केली. त्याला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर ३१ मार्च २०१६ रोजी पुन्हा एकदा पोलिसांकडे अर्ज केला. त्याचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर तत्कालीन पोलीस अधिकारी यांनी तपासाचे आदेश दिल्यानंतर १२ एप्रिल २०१७ मध्ये कोरेगाव पार्क पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. ......पोलीस गोरगरिबांचा विचार करीत नाही. ते फक्त श्रीमंतांचा विचार करतात की काय असा प्रश्न आतापर्यंतच्या त्यांच्या कार्यपद्धतीकडे पाहून पडला आहे. आपल्या कामातून गरिबांना न्याय मिळावा अशी त्यांची मानसिकता दिसत नाही. याउलट गरिब दिसला की त्याची अनेक प्रकारे मुस्कटदाबी केली जाते. चुकीच्या उपचारामुळे अपंगत्व आले त्याचा फटका सहन करावा लागला. त्याविरोधात पोलीस प्रशासनाकडे दाद मागितली तर त्यांनी नऊ वर्षांहून अधिक काळ टोलवाटोलवी केली. या सगळ्या प्रकाराने प्रचंड प्रमाणात मानसिक व शारीरिक हानी सोसावी लागली आहे- प्रकाश बाबूलाल ऊर्फ  सोहनलाल परदेशी,  तक्रारदार-पीडित  

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयPoliceपोलिसdoctorडॉक्टर