शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

राजकारण्यांच्या भांडणांमध्ये जनतेला वेठीस धरू नका - दिलीप वळसे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 13:32 IST

आदिवासी भागातील गोरगरीब लोकांचा विचार करा...

घोडेगाव (पुणे) : राजकारण्यांच्या भांडणामध्ये जनतेला वेठीस धरू नका. जिल्हा नियोजनमध्ये अनेक प्रस्ताव प्रलंबित आहेत, यात मुख्यत्वे आदिवासी भागातील प्रस्ताव आहेत. बिगर आदिवासी भागामध्ये थोडा उशिरा दिला तरी चालेल. पण, आदिवासी भागातील गोरगरीब लोकांचा विचार करा, असे खडे बोल माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुणे येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत अधिकाऱ्यांना सुनावले.

आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित विषयांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त जिल्हाधिकारी अजय मोरे, अतिरिक्त पोलिस अधिकरी मितेश घट्टे, निवासी उपजिल्हाधिकारी हिंमत खराडे, कार्यकारी अभियंता आर. वाय. पाटील, धनंजय देशपांडे, माजी सभापती संजय गवारी, समाजकल्याणचे माजी सभापती सुभाष मोरमारे, मानसिंग पाचुंदकर, प्रकाश घोलप, गौतम खरात आदी उपस्थित होते.

यावेळी वळसे पाटील यांनी विविध विभागांचा आढावा घेतला. आदिवासी भागातील शिवकालीन खडकातील टाक्या, विद्युत वितरण कंपनीचे काही प्रस्ताव, रस्ते व पूलांचे प्रस्ताव जिल्हा नियोजनामध्ये प्रलंबित असल्याचे आढळून आले. यावरून वळसे पाटील यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.

जिल्ह्यातील महत्त्वाची धरणे व तलाव आदिवासी भागात आहेत. ही धरणे व तलाव मातीने भरत चालली असून याची साठवण क्षमता कमी झाली आहे. आदिवासी क्षेत्र असलेल्या पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायतींनी स्वेच्छेने गाळ उपसायला परवानगी दिली तर महसूल विभागानेदेखील हा गाळ काढायला परवानगी दिली पाहिजे. यातून शेती व वीटभट्टी व्यवसायाला माती मिळेल. यावर ग्रामसभेचा ठराव आला तर पेसा क्षेत्रातही माती उपसायला परवानगी दिली जाईल, असे अतिरिक्त जिल्हाधिकारी अजय मोरे यांनी सांगितले.

बैलगाडा शर्यती व कोविडमध्ये नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दाखल असलेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यावर कारवाई करून सगळे गुन्हे रेकॉर्डवरून लवकरात लवकर काढून टाका. माळीणसारख्या अतिसंवेदनशील गावांचा प्रश्न फक्त आंबेगाव तालुक्यात नाही तर संपूर्ण जिल्ह्यात आहे. यावर जिल्हाधिकारी यांनी धोरण निश्चित करून त्यांचे पुनर्वसन व उपाययोजना याचे नियोजन केले पाहिजे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDilip Walse Patilदिलीप वळसे पाटील