बालके आधुनिक तंत्राच्या आहारी
By Admin | Updated: November 15, 2016 03:07 IST2016-11-15T03:07:04+5:302016-11-15T03:07:04+5:30
मुले देशी खेळांपासून वंचित झाले आहेत, तर काही मुले तासन्तास टीव्ही पाहणे किंवा संगणकावर गेम खेळणे यातच व्यस्त आहेत. त्यामुळे

बालके आधुनिक तंत्राच्या आहारी
रहाटणी : मुले देशी खेळांपासून वंचित झाले आहेत, तर काही मुले तासन्तास टीव्ही पाहणे किंवा संगणकावर गेम खेळणे यातच व्यस्त आहेत. त्यामुळे सध्याची मुले आधुनिक तंत्रज्ञानाच्या आहारी गेले, यात शंका नाही.
आई-वडील दोघेही नोकरी करीत असल्याने मुलांना सांभाळायचे कोणी, असा प्रश्न निर्माण होतो. यावर पर्याय म्हणून पाळणाघरात मुलांना ठेवले जाते. पाळणाघरातील टीचर जसे संस्कार करेल, तसेच मुलं घडतात. मात्र, आजी-आजोबांच्या संस्कारापासून ते दूरच राहतात. हजारो रुपये खर्च करूनही आजी आजोबांचे प्रेम, मायेचा ओलावा मिळत नसल्याने सध्याची पिढी संस्कारशून्य निर्माण होत असून, संस्काराचा देखावा करणारी पिढी निर्माण होत आहे. याला फक्त आपणच जबाबदार आहोत. नात्यातील गोडवा झाला कमी विभक्त कुटुंब पद्धतीमुळे नात्यामधील गोडवाही कमी झाला आहे. मुलांना आई आणि बाबा हीच नाती माहीत आहेत. आजी, आजोबा, मावशी, मामा, मामी, आत्या, काका, काकू, चुलत भाऊ, चुलत बहीण यांसारखे अनेक नातेवाईक त्यांच्या डोळ्यांपुढेही येत नाही. परिणामी, नात्याची वीणही ढिली झाली आहे. यामुळे मायेचा ओलावाही मुलांना फारसा मिळत नाही. नातेसंबंध काय असतात किंवा एखाद्या कुटुंबातील सार्वजनिक कार्यक्रम काय असते, याची जाणीवच होत नसल्याने नातेसंबंधात मोठी दरी निर्माण झाली आहे.(वार्ताहर)