शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

"अजित पवारांच्या बदनामीचा डाव, त्यांना राजकारणातून संपविण्याचे षडयंत्र"

By नितीन चौधरी | Updated: October 17, 2023 17:47 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निष्कारण आरोप केले जात असून...

पुणे : येरवडा येथील जागेसाठी ‘पीपीपी’ तत्वावर निविदा राज्याच्या तत्कालीन गृहमंत्र्यांच्या आदेशानेच काढण्यात आली. त्यांनीच ती रद्द केली होती. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निष्कारण आरोप केले जात असून, राज्याच्या विकासाची स्वप्ने पाहणाऱ्या जनसेवकाला बदनाम करण्याचे व राजकारणातून संपविण्याचे षडयंत्र केले जात आहे,’ अशी टीका कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केली.

पुण्यातील साखर संकुल येथे आयोजित रब्बी हंगामाच्या आढावा बैठकीपूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. माजी आयपीएस अधिकारी व पुण्याच्या तत्कालीन पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी येरवड्याच्या जागेबाबत उपमुख्यमंत्री व तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी एका खासगी विकासकाला देण्यासाठी आग्रह धरल्याचा दावा पुस्तकातून केला आहे. त्याबाबत मुंडे म्हणाले, “तत्कालीन गृहमंत्र्यांच्या आदेशानेच ही निविदा काढण्यात आली. त्यावेळी तक्रार करण्याऐवजी निवृत्त झाल्यावर पुस्तकात दावे करून एखाद्याला बदनाम करणे मोठ्या अधिकाऱ्यांना शोभणारे नाही. तत्कालीन गृहमंत्र्यांनीच या जागेची निविदा रद्द केली आहे. तरीही जागा वाचविल्याचे श्रेय घेण्यासाठी अजित पवार यांच्यावर आरोप केले जात आहेत.”

मुख्यमंत्रीपद का सोडले ते दैवताला माहिती-

नेतृत्वाने मुख्यमंत्री व्हावे, हे प्रत्येक कार्यकर्त्याचे वाटते. मात्र, राष्ट्रवादीला संधी असताना, मुख्यमंत्रीपद सोडले. त्यामुळे कार्यकर्त्यांचे स्वप्न पूर्ण करायचे होते की नाही, याचे उत्तर आमच्या दैवताकडे आहे, असा निशाणाही मुंडे यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर साधला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारDhananjay Mundeधनंजय मुंडेPoliticsराजकारणSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरे