शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री नाही, माणूस म्हणून देवेंद्र फडणवीस माझ्यासाठी महत्वाचे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 17:49 IST

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून नाही तर माणूस म्हणून माझ्यासाठी महत्वाचे आहेत अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुण्यात आपल्या भावना मांडल्या.

पुणे : देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून नाही तर माणूस म्हणून माझ्यासाठी महत्वाचे आहेत अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुण्यात आपल्या भावना मांडल्या. मुख्यमंत्र्यांची बायको म्हणून दोनही बाजूंचा सामना करावा लागतो. नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे लागते. इतर लोक काय म्हणतात यापेक्षा आपल्याला आपल्या आयुष्याबद्दल काय वाटते हे महत्वाचे आहे असेही त्यांनी आवर्जून सांगितले. 

पुण्यात आयोजित ग्राव्हीट्स रत्न या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन व सन्मान सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी गौरी खान प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाला खासदार संजय काकडे, उद्योजक सतीश मगर, आदर पुनावाला, सिम्बायोसिसच्या विद्या येरवडेकर, आमदार माधुरी मिसाळ आदी उपस्थित होते. यावेळी रजनी परांजपे, रंजना बाजी, वर्षा देशपांडे, वंदना खरे, राहीबाई पोपळे, रितू बियानी, मुक्ता पुणतांबेकर, दिशा शेख, मीरा बडवे, लीना बोकील, कावेरी नागरगोजे, डॉ. विनिता आपटे, प्रिया चोरगे, अंजली पवार, पल्लवी रेनके, मनीषा टोकळे, जयती बरुडा या महिलांना कर्तुत्ववान महिलांना ग्राव्हीट्स रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वीरपत्नी सुषमा संजय राजपूत यांचा विशेष सन्मान करण्यात आला.  

फडणवीस म्हणाल्या की, संगीत माझ्यासाठी टेन्शन दूर करण्याचे साधन आहे. जग बदलण्याची ताकद संगीतात आहे. त्यामुळे सामाजिक, मानसिक बदल घडू शकतात. चांगले संगीत परिवर्तन घडवू शकते असा माझा विश्वास आहे.  महिला सक्षमीकरणाबद्दल त्या म्हणाल्या की, महिलांना मोठी दरी भरून काढायची आहे. त्यासाठी समाजसाठी सातत्याने काम करणाऱ्यांची सध्या आवश्यकता आहे. समाजाची मूल्ये टिकवून ठेवण्यासाठी अशा कामाची नितांत गरज आहे. महिला सक्षमीकरणासाठी महिलांनीच पुढाकार घेणे महत्वाचे आहे. 

गौरी खान म्हणाल्या की, ''मला पहिल्यापासून डिझायनिंग आवडत होते. अगदी सुरुवातीला मी छोट्या स्वरूपात दुकान सुरू केले. त्यावेळी स्थिरस्थावर होण्यासाठी  खूप प्रयत्न केले. प्रत्येकाने स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. प्रत्येक महिलेने मोठी स्वप्ने पाहायला हवीत. आखलेला प्रत्येक प्रकल्प परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करायला हवा. प्रसिद्धी मिळत असताना आपण आहोत तसे आणि जास्तीत जास्त साधेपणाने जगलो तर आयुष्य सुकर होत असते असेही त्या म्हणाल्या.  

प्रास्ताविक करताना उषा काकडे म्हणाल्या की,हजारो शिंपले उघडल्यावर एक मोती सापडतो तशी लाखो शिंपले शोधल्यावर आम्हाला कर्तृत्ववान महिलांच्या रूपातील रत्ने सापडली. त्यांच्यावर आधारित हे कॉफी टेबल बुक आहे. महिलांनी एकमेकींचा आदर करायला हवा असेही त्या म्हणाल्या. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने सूत्रसंचालन केले.     

टॅग्स :Amruta Fadnavisअमृता फडणवीसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसGauri khanगौरी खान