शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

"अथर्वशीर्ष हे शास्त्र..."; एक लाख पुणेकरांनी केला जागतिक विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 13:39 IST

श्री श्री रविशंकर म्हणाले, ‘‘तीक्ष्ण बुद्धी आणि सौम्य भाव हे भारतीय संस्कृतीची देण आहे...

पुणे : ओम गं गणपतये नमः...गणपती बाप्पा मोरया... च्या जयघोषाने भक्तिमय झालेल्या वातावरणात एक लाख पुणेकरांनी सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचा जागतिक विक्रम केला. गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या भक्तिउत्सवात अथर्वशीर्ष पठणाचे सूर निनादले. योग, साधना आणि सत्संग या त्रिसूत्रीच्या माध्यमातून जगभरातील लाखो नागरिकांचे आयुष्य बदलणारे श्री श्री रविशंकर यांचे मार्गदर्शन ऐकण्याची संधी या वेळी पुणेकरांना मिळाली.

निमित्त होते, द आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे भक्तिउत्सव या कार्यक्रमाचे. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार शहाजीबापू पाटील, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, आर्ट ऑफ लिव्हिंग महाराष्ट्रचे अपेक्स सदस्य राजय शास्तारे, शेखर मुंदडा, डॉ. राजेश धोपेश्वरकर, बलविंदरसिंग चंडोक, धीरज अग्रवाल आदी उपस्थित होते.

आर्ट ऑफ लिव्हिंगचे सुप्रसिद्ध गायक विक्रम हाजरा आणि गायत्री अशोकन् हे सत्संगासाठी उपस्थित होते. सामूहिक अथर्वशीर्ष पठणाच्या जागतिक विक्रमाची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्डस्, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस् लंडन येथे झाली. या वेळी या जागतिक विक्रमाचे प्रमाणपत्र देण्यात आले.

श्री श्री रविशंकर म्हणाले, ‘‘तीक्ष्ण बुद्धी आणि सौम्य भाव हे भारतीय संस्कृतीची देण आहे. ध्यान आणि मंत्रोच्चारण रोज केले तर त्याचे फळ मिळते. ध्यान योगात भक्ती, कर्म आणि ज्ञानयोग आहे. मानसिक शांतीसाठी ध्यान करणे गरजेचे आहे, हे जगातील सर्व देशांनी मान्य केले आहे. प्रत्येक घरात योग पोहोचला पाहिजे. ज्यामुळे प्रत्येक जण निरोगी राहील.”

अथर्वशीर्ष हे शास्त्र : फडणवीस

अथर्वशीर्ष पठण रेकॉर्डच्या माध्यमातून ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचा मान मिळाला, असे सांगून देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अथर्वशीर्ष हे स्थिर बुद्धी देते. गणपती ही बुद्धीची देवता आहे. अथर्वशीर्ष हे शास्त्र आहे. गुरुदेव यांनी भारत आणि जगातील अनेक देशांत भारतीय संस्कृती आणि अध्यात्म जागृत केले. स्वामी विवेकानंदांनी जसे आपल्या विचारांचे श्रेष्ठत्व जगाला पटवून दिले, तेच काम गुरुदेव यांनी केले आहे. विज्ञानातून अध्यात्म हा त्यांच्या कार्याचा गाभा आहे.”

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPuneपुणे