शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

हरिश्चंद्री येथे वारंवार अपघात होऊनही महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष, नागरिक संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:08 IST

पुणे-सातारा महामार्गावरील हरिश्चंद्री गावाच्या हद्दीत मागील दोन महिन्यांत दोन जणांचे मृत्यू झाले आहेत. तर, गाड्यांचे अपघात वारंवार घडतात. ...

पुणे-सातारा महामार्गावरील हरिश्चंद्री गावाच्या हद्दीत मागील दोन महिन्यांत दोन जणांचे मृत्यू झाले आहेत. तर, गाड्यांचे अपघात वारंवार घडतात. यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून पादचाऱ्यांना रस्ता ओलांडावा लागतो. याबाबत वारंवार मागणी करून आंदोलन करूनही महामार्ग प्राधिकरण रस्ता भुयारी मार्ग करत ना उड्डाणपूल यामुळे संतप्त ग्रामस्थ महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त करीत आहेत. पुणे-सातारा महामार्गावरील हरिश्चंद्री गावातील लोकांची शेतजमीन महामार्गाच्या पलीकडे आहे.त्यामुळे रस्ता ओलांडुन जावे लागतो.भरधाव वेगाने येणाऱ्या गाड्यांचा अंदाज न आल्याने अपघात घडतात यामुळे महामार्गावर भुयारी मार्ग किंवा उड्डाण पूल करावा म्हणून हरिश्चंद्री ग्रामस्थांनी वारंवार मागणी केली, निवेदने दिली. आंदोलन केले. मात्र अद्याप ना पूल झाला ना भुयारीमार्ग झाला. याशिवाय येथील सर्व्हिस रस्ताही अपूर्ण आहे.यामुळे अपघात घडतात.

मागील महिन्यात रस्ता ओलांडताना एकाच, तर दोन दिवसांपूर्वी किसन बदक हे कापूरव्होळ येथून गावी जात होते. या वेळी मागून आलेल्या वाहनाने त्यांना धडक दिली, यामध्ये त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. येथील रस्ता धोकादायक असून हरिचंद्र येथे जाण्यासाठी पर्यायी रस्ता नाही. यामुळे या मार्गावर सतत अपघात होत आहेत. किसन बदक यांच्या मृत्यूला महामार्ग प्राधिकरण जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी आणि नातेवाईकांनी केला. राजगड पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले त्यानंतर पोलिसांनी काल अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.मात्र तातपुरती कारवाई केली जाते ठोस मार्ग काढला जात नाही,त्यामुळे पुन्हा पुन्हा अपघात घडतात.

अपघातामुळे हरिचंद्र गावातील मंदिरात महामार्ग प्राधिकरण रिलायन्सचे पदाधिकारी यांच्यात बैठकीचे आयोजन केले होते, यामध्ये येथील उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूस सेवा रस्त्याचे काम २० दिवसांत पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर बैठकीला सरपंच संध्या गाडे, सदस्य जालिंदर गाडे, शरद गाडे व राम पाचकाळे पोलीस निरीक्षक विनायक वेताळ महामार्ग प्राधिकरणाचे अनिल गोरड रिलायन्सचे बी.डी कोळी आदी उपस्थित होते. या वेळी मृत व्यक्तीच्या कुटुंबाला नुकसानभरपाई देण्याबाबत चर्चा करण्यात आली. मात्र अद्याप कार्यवाही झालेली नाही.

भुयारी मार्गाची मागणी

ग्रामस्थांना गावात ये-जा करण्यासाठी हरिष्चंद्री येथे भुयारी मार्ग तयार करावा, अशी मागणी गेल्या दोन वर्षापासून येथील ग्रामस्थ करीत आहेत. त्यासाठी जून १९ मध्ये तहसील कार्यालयासमोर उपोषणही करण्यात आले होते. तसेच, गेल्या महिन्यात १५ डिसेंबर रोजी ग्रामस्थांनी सदस्य अपघातास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले होते, मात्र प्रशासनाकडून त्यांच्या मागणीकडे वारंवार दुर्लक्ष करण्यात येत आहे, यामुळे ग्रामस्थ नाराजी व्यक्त करीत आहेत.

चौकट मागिल १५ वर्षापासून महामार्गाची कामे अपूर्ण पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील वर्वे-सारोळे- नसरापूर येथील पूल अपूर्ण आहेत. भोर फाट्यावरील पुलाची उंची कमी आहे. नारायणपूर फाटा येथे व हरिश्चंद्री येथे उड्डाणपूल नाही, सेवा रस्ते अपुर्ण मोठमोठे खडडे यामुळे मागिल १५ वर्षात अनेकांचे जीव गेले तर कित्येक जणांना अपंगत्व आले आहे.माञ तरीही महामार्ग प्रधिकाराचे दुर्लक्ष होत आहे.माञ टोल वसुली जोरात सुरु असल्यामुळे प्रवासी नागरिक नाराजी व्यक्त करित आहेत, त्यामुळे प्रधिकरणाने लक्ष देण्याची गरज असल्याचे राम पाचकाळे यांनी सांगितले.

पुणे सातारा महामार्गावर हरिश्चंद्री ता भोर येथे गाडयांची धडक होऊन अपघात फोटो