शहरं
Join us  
Trending Stories
1
Malegaon Dongrale: चिमुकलीवर अत्याचार, लोकांच्या संतापाचा कडेलोट; थेट न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न, पोलिसांचा लाठीचार्ज
2
कर्नाटक सरकारमध्ये बदल होणार! डीके शिवकुमार यांच्या समर्थकांच्या हालचाली वाढल्या, काही आमदार दिल्लीत तळ ठोकून
3
'नवीन भाडे करार २०२५' : अ‍ॅडव्हान्स म्हणून घेता येईल फक्त २ महिन्यांचे भाडे; घरमालक वाढवू शकणार नाही मनमानी पद्धतीनं भाडं
4
दिल्ली स्फोट प्रकरणी मोठा खुलासा! 'घरघंटी'च्या मदतीने बनवले होते बॉम्ब; साहित्य जप्त केले
5
IND vs SA 2nd Test: 'आमचं ठरलंय!' गिलच्या जागी कोण? कॅप्टन पंतनं उत्तर दिलं, पण...
6
ट्रम्प ज्युनियर यांचा भारतात शाही मुक्काम! एका रात्रीच्या भाड्यात येईल SUV कार; ताजमहलचा दिसतो व्ह्यू
7
Gold Price Today: ₹३००० नं स्वस्त झालं सोनं, चांदी ₹८००० नं आपटली; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट रेट
8
Railway: रेल्वेगाड्यांत 'या' रुग्णांना मिळते 'इतकी' सवलत!
9
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे लोकार्पण; अमित ठाकरे म्हणाले, “अखेर सरकारला जाग आली...!”
10
स्मृती-पलाश होणार विवाहबद्ध; PM मोदींचे दोघांसाठी खास पत्र, म्हणाले- "तुमची पार्टनरशिप..."
11
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
12
Mumbai: एक्स्प्रेस वेवरील पुलांच्या डागडुजीसाठी १३६ कोटींचा खर्च, एकनाथ शिंदेंच्या सूचनेनंतर महापालिका सरसावली
13
Cryptocurrency Crash: क्रिप्टो मार्केटमध्ये हाहाकार! २४ तासांत १७ लाख कोटींची फोडणी; Bitcoin ७% पेक्षा अधिक घसरलं
14
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
15
"पुरस्कार घेण्यास परदेशात गेलीस तर…’’, नोबेल विजेत्या महिलेला सरकारने दिली धमकी  
16
‘गोल्डन गर्ल’चं नवं टार्गेट सेट, बिहारच्या राजकारणातील तरुण चेहऱ्याने वेधलं लक्ष, कोण आहे ती?
17
धक्कादायक खुलासा! डॉक्टर शाहीन निघाली दहशतवादी फंडिंगची मास्टरमाईंड; बिटकॉइन आणि हवालातून कोट्यवधींचा व्यवहार
18
ST महामंडळाचा आर्थिक शिस्तीवर भर; नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर, पारदर्शकतेसाठी विशेष नोंदवही
19
Numerology 2026: ६ मूलांकांचे दु:खाचे दिवस सरणार, सुवर्ण काळ येणार; २०२६ला मालामाल-भाग्योदय!
20
आमदार-खासदारांशी कसं वागावे? शासनानं काढलं परिपत्रक; कर्मचाऱ्यांना दिला ९ कलमी कार्यक्रम
Daily Top 2Weekly Top 5

हरिश्चंद्री येथे वारंवार अपघात होऊनही महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष, नागरिक संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:08 IST

पुणे-सातारा महामार्गावरील हरिश्चंद्री गावाच्या हद्दीत मागील दोन महिन्यांत दोन जणांचे मृत्यू झाले आहेत. तर, गाड्यांचे अपघात वारंवार घडतात. ...

पुणे-सातारा महामार्गावरील हरिश्चंद्री गावाच्या हद्दीत मागील दोन महिन्यांत दोन जणांचे मृत्यू झाले आहेत. तर, गाड्यांचे अपघात वारंवार घडतात. यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून पादचाऱ्यांना रस्ता ओलांडावा लागतो. याबाबत वारंवार मागणी करून आंदोलन करूनही महामार्ग प्राधिकरण रस्ता भुयारी मार्ग करत ना उड्डाणपूल यामुळे संतप्त ग्रामस्थ महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त करीत आहेत. पुणे-सातारा महामार्गावरील हरिश्चंद्री गावातील लोकांची शेतजमीन महामार्गाच्या पलीकडे आहे.त्यामुळे रस्ता ओलांडुन जावे लागतो.भरधाव वेगाने येणाऱ्या गाड्यांचा अंदाज न आल्याने अपघात घडतात यामुळे महामार्गावर भुयारी मार्ग किंवा उड्डाण पूल करावा म्हणून हरिश्चंद्री ग्रामस्थांनी वारंवार मागणी केली, निवेदने दिली. आंदोलन केले. मात्र अद्याप ना पूल झाला ना भुयारीमार्ग झाला. याशिवाय येथील सर्व्हिस रस्ताही अपूर्ण आहे.यामुळे अपघात घडतात.

मागील महिन्यात रस्ता ओलांडताना एकाच, तर दोन दिवसांपूर्वी किसन बदक हे कापूरव्होळ येथून गावी जात होते. या वेळी मागून आलेल्या वाहनाने त्यांना धडक दिली, यामध्ये त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. येथील रस्ता धोकादायक असून हरिचंद्र येथे जाण्यासाठी पर्यायी रस्ता नाही. यामुळे या मार्गावर सतत अपघात होत आहेत. किसन बदक यांच्या मृत्यूला महामार्ग प्राधिकरण जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी आणि नातेवाईकांनी केला. राजगड पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले त्यानंतर पोलिसांनी काल अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.मात्र तातपुरती कारवाई केली जाते ठोस मार्ग काढला जात नाही,त्यामुळे पुन्हा पुन्हा अपघात घडतात.

अपघातामुळे हरिचंद्र गावातील मंदिरात महामार्ग प्राधिकरण रिलायन्सचे पदाधिकारी यांच्यात बैठकीचे आयोजन केले होते, यामध्ये येथील उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूस सेवा रस्त्याचे काम २० दिवसांत पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर बैठकीला सरपंच संध्या गाडे, सदस्य जालिंदर गाडे, शरद गाडे व राम पाचकाळे पोलीस निरीक्षक विनायक वेताळ महामार्ग प्राधिकरणाचे अनिल गोरड रिलायन्सचे बी.डी कोळी आदी उपस्थित होते. या वेळी मृत व्यक्तीच्या कुटुंबाला नुकसानभरपाई देण्याबाबत चर्चा करण्यात आली. मात्र अद्याप कार्यवाही झालेली नाही.

भुयारी मार्गाची मागणी

ग्रामस्थांना गावात ये-जा करण्यासाठी हरिष्चंद्री येथे भुयारी मार्ग तयार करावा, अशी मागणी गेल्या दोन वर्षापासून येथील ग्रामस्थ करीत आहेत. त्यासाठी जून १९ मध्ये तहसील कार्यालयासमोर उपोषणही करण्यात आले होते. तसेच, गेल्या महिन्यात १५ डिसेंबर रोजी ग्रामस्थांनी सदस्य अपघातास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले होते, मात्र प्रशासनाकडून त्यांच्या मागणीकडे वारंवार दुर्लक्ष करण्यात येत आहे, यामुळे ग्रामस्थ नाराजी व्यक्त करीत आहेत.

चौकट मागिल १५ वर्षापासून महामार्गाची कामे अपूर्ण पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील वर्वे-सारोळे- नसरापूर येथील पूल अपूर्ण आहेत. भोर फाट्यावरील पुलाची उंची कमी आहे. नारायणपूर फाटा येथे व हरिश्चंद्री येथे उड्डाणपूल नाही, सेवा रस्ते अपुर्ण मोठमोठे खडडे यामुळे मागिल १५ वर्षात अनेकांचे जीव गेले तर कित्येक जणांना अपंगत्व आले आहे.माञ तरीही महामार्ग प्रधिकाराचे दुर्लक्ष होत आहे.माञ टोल वसुली जोरात सुरु असल्यामुळे प्रवासी नागरिक नाराजी व्यक्त करित आहेत, त्यामुळे प्रधिकरणाने लक्ष देण्याची गरज असल्याचे राम पाचकाळे यांनी सांगितले.

पुणे सातारा महामार्गावर हरिश्चंद्री ता भोर येथे गाडयांची धडक होऊन अपघात फोटो