शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
3
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
4
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
5
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
6
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
7
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
8
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
10
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
11
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
12
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
13
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
14
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
15
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
16
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
17
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
18
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
19
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
20
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

हरिश्चंद्री येथे वारंवार अपघात होऊनही महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष, नागरिक संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:08 IST

पुणे-सातारा महामार्गावरील हरिश्चंद्री गावाच्या हद्दीत मागील दोन महिन्यांत दोन जणांचे मृत्यू झाले आहेत. तर, गाड्यांचे अपघात वारंवार घडतात. ...

पुणे-सातारा महामार्गावरील हरिश्चंद्री गावाच्या हद्दीत मागील दोन महिन्यांत दोन जणांचे मृत्यू झाले आहेत. तर, गाड्यांचे अपघात वारंवार घडतात. यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून पादचाऱ्यांना रस्ता ओलांडावा लागतो. याबाबत वारंवार मागणी करून आंदोलन करूनही महामार्ग प्राधिकरण रस्ता भुयारी मार्ग करत ना उड्डाणपूल यामुळे संतप्त ग्रामस्थ महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त करीत आहेत. पुणे-सातारा महामार्गावरील हरिश्चंद्री गावातील लोकांची शेतजमीन महामार्गाच्या पलीकडे आहे.त्यामुळे रस्ता ओलांडुन जावे लागतो.भरधाव वेगाने येणाऱ्या गाड्यांचा अंदाज न आल्याने अपघात घडतात यामुळे महामार्गावर भुयारी मार्ग किंवा उड्डाण पूल करावा म्हणून हरिश्चंद्री ग्रामस्थांनी वारंवार मागणी केली, निवेदने दिली. आंदोलन केले. मात्र अद्याप ना पूल झाला ना भुयारीमार्ग झाला. याशिवाय येथील सर्व्हिस रस्ताही अपूर्ण आहे.यामुळे अपघात घडतात.

मागील महिन्यात रस्ता ओलांडताना एकाच, तर दोन दिवसांपूर्वी किसन बदक हे कापूरव्होळ येथून गावी जात होते. या वेळी मागून आलेल्या वाहनाने त्यांना धडक दिली, यामध्ये त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. येथील रस्ता धोकादायक असून हरिचंद्र येथे जाण्यासाठी पर्यायी रस्ता नाही. यामुळे या मार्गावर सतत अपघात होत आहेत. किसन बदक यांच्या मृत्यूला महामार्ग प्राधिकरण जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी आणि नातेवाईकांनी केला. राजगड पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले त्यानंतर पोलिसांनी काल अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.मात्र तातपुरती कारवाई केली जाते ठोस मार्ग काढला जात नाही,त्यामुळे पुन्हा पुन्हा अपघात घडतात.

अपघातामुळे हरिचंद्र गावातील मंदिरात महामार्ग प्राधिकरण रिलायन्सचे पदाधिकारी यांच्यात बैठकीचे आयोजन केले होते, यामध्ये येथील उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूस सेवा रस्त्याचे काम २० दिवसांत पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर बैठकीला सरपंच संध्या गाडे, सदस्य जालिंदर गाडे, शरद गाडे व राम पाचकाळे पोलीस निरीक्षक विनायक वेताळ महामार्ग प्राधिकरणाचे अनिल गोरड रिलायन्सचे बी.डी कोळी आदी उपस्थित होते. या वेळी मृत व्यक्तीच्या कुटुंबाला नुकसानभरपाई देण्याबाबत चर्चा करण्यात आली. मात्र अद्याप कार्यवाही झालेली नाही.

भुयारी मार्गाची मागणी

ग्रामस्थांना गावात ये-जा करण्यासाठी हरिष्चंद्री येथे भुयारी मार्ग तयार करावा, अशी मागणी गेल्या दोन वर्षापासून येथील ग्रामस्थ करीत आहेत. त्यासाठी जून १९ मध्ये तहसील कार्यालयासमोर उपोषणही करण्यात आले होते. तसेच, गेल्या महिन्यात १५ डिसेंबर रोजी ग्रामस्थांनी सदस्य अपघातास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले होते, मात्र प्रशासनाकडून त्यांच्या मागणीकडे वारंवार दुर्लक्ष करण्यात येत आहे, यामुळे ग्रामस्थ नाराजी व्यक्त करीत आहेत.

चौकट मागिल १५ वर्षापासून महामार्गाची कामे अपूर्ण पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील वर्वे-सारोळे- नसरापूर येथील पूल अपूर्ण आहेत. भोर फाट्यावरील पुलाची उंची कमी आहे. नारायणपूर फाटा येथे व हरिश्चंद्री येथे उड्डाणपूल नाही, सेवा रस्ते अपुर्ण मोठमोठे खडडे यामुळे मागिल १५ वर्षात अनेकांचे जीव गेले तर कित्येक जणांना अपंगत्व आले आहे.माञ तरीही महामार्ग प्रधिकाराचे दुर्लक्ष होत आहे.माञ टोल वसुली जोरात सुरु असल्यामुळे प्रवासी नागरिक नाराजी व्यक्त करित आहेत, त्यामुळे प्रधिकरणाने लक्ष देण्याची गरज असल्याचे राम पाचकाळे यांनी सांगितले.

पुणे सातारा महामार्गावर हरिश्चंद्री ता भोर येथे गाडयांची धडक होऊन अपघात फोटो