शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

बहुमत असूनही राममंदिर उभारणीस विलंब का? उद्धव ठाकरे यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 01:47 IST

पूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांचे मिलीजुली सरकार होते. आता केंद्रात पूर्ण बहुमताचे सरकार आहे. मग, राममंदिर उभारणीस विलंब का, निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच राममंदिराचा मुद्दा हातात घेतला आहे.

जुन्नर (जि. पुणे) : पूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांचे मिलीजुली सरकार होते. आता केंद्रात पूर्ण बहुमताचे सरकार आहे. मग, राममंदिर उभारणीस विलंब का, निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच राममंदिराचा मुद्दा हातात घेतला आहे. ताकाला जाऊन भांडे लपविण्याची आम्हाला सवय नाही. मला काही जणांची भंडाफोड करायची आहे, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.शिवसेना पक्षनेते उद्धव ठाकरे रविवारी अयोध्या येथे रामजन्मभूमीत दर्शनासाठी जात आहेत. अयोध्या येथे राममंदिरासाठी होणाऱ्या कार्यक्रमासाठी शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीवरून गुरुवारी मंगल कलश नेण्यात आला. या वेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, आमदार शरद सोनवणे यांच्या उपस्थितीत किल्ले शिवनेरीवरील पवित्र माती व जल याच्या मंगल कलशाचे पूजन करण्यात आले.उद्धव ठाकरे म्हणाले की, राममंदिर, हिंदुत्व याविषयांवर कोणतेही गट-तट असू नयेत. आमचं हृदय आणि मन भगवं आहे. किल्ले शिवनेरीची माती पवित्र माती आहे. या मातीमध्ये चमत्कार करणारी ताकद आहे.उद्धव ठाकरे यांनी शिवजन्मस्थळ, शिवकुंज स्मारक येथे बालशिवबा राजमाता जिजाऊ यांच्या शिल्पास अभिवादन केले. यानंतर पदाधिकारी व शिवसैनिकांनी चांदीच्या कलशामध्ये पवित्र माती व जल भरून हाकलश उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्त केला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे