शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

बहुमत असूनही राममंदिर उभारणीस विलंब का? उद्धव ठाकरे यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 01:47 IST

पूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांचे मिलीजुली सरकार होते. आता केंद्रात पूर्ण बहुमताचे सरकार आहे. मग, राममंदिर उभारणीस विलंब का, निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच राममंदिराचा मुद्दा हातात घेतला आहे.

जुन्नर (जि. पुणे) : पूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांचे मिलीजुली सरकार होते. आता केंद्रात पूर्ण बहुमताचे सरकार आहे. मग, राममंदिर उभारणीस विलंब का, निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच राममंदिराचा मुद्दा हातात घेतला आहे. ताकाला जाऊन भांडे लपविण्याची आम्हाला सवय नाही. मला काही जणांची भंडाफोड करायची आहे, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.शिवसेना पक्षनेते उद्धव ठाकरे रविवारी अयोध्या येथे रामजन्मभूमीत दर्शनासाठी जात आहेत. अयोध्या येथे राममंदिरासाठी होणाऱ्या कार्यक्रमासाठी शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीवरून गुरुवारी मंगल कलश नेण्यात आला. या वेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, आमदार शरद सोनवणे यांच्या उपस्थितीत किल्ले शिवनेरीवरील पवित्र माती व जल याच्या मंगल कलशाचे पूजन करण्यात आले.उद्धव ठाकरे म्हणाले की, राममंदिर, हिंदुत्व याविषयांवर कोणतेही गट-तट असू नयेत. आमचं हृदय आणि मन भगवं आहे. किल्ले शिवनेरीची माती पवित्र माती आहे. या मातीमध्ये चमत्कार करणारी ताकद आहे.उद्धव ठाकरे यांनी शिवजन्मस्थळ, शिवकुंज स्मारक येथे बालशिवबा राजमाता जिजाऊ यांच्या शिल्पास अभिवादन केले. यानंतर पदाधिकारी व शिवसैनिकांनी चांदीच्या कलशामध्ये पवित्र माती व जल भरून हाकलश उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्त केला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे