शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

बहुमत असूनही राममंदिर उभारणीस विलंब का? उद्धव ठाकरे यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 01:47 IST

पूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांचे मिलीजुली सरकार होते. आता केंद्रात पूर्ण बहुमताचे सरकार आहे. मग, राममंदिर उभारणीस विलंब का, निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच राममंदिराचा मुद्दा हातात घेतला आहे.

जुन्नर (जि. पुणे) : पूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांचे मिलीजुली सरकार होते. आता केंद्रात पूर्ण बहुमताचे सरकार आहे. मग, राममंदिर उभारणीस विलंब का, निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच राममंदिराचा मुद्दा हातात घेतला आहे. ताकाला जाऊन भांडे लपविण्याची आम्हाला सवय नाही. मला काही जणांची भंडाफोड करायची आहे, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.शिवसेना पक्षनेते उद्धव ठाकरे रविवारी अयोध्या येथे रामजन्मभूमीत दर्शनासाठी जात आहेत. अयोध्या येथे राममंदिरासाठी होणाऱ्या कार्यक्रमासाठी शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीवरून गुरुवारी मंगल कलश नेण्यात आला. या वेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, आमदार शरद सोनवणे यांच्या उपस्थितीत किल्ले शिवनेरीवरील पवित्र माती व जल याच्या मंगल कलशाचे पूजन करण्यात आले.उद्धव ठाकरे म्हणाले की, राममंदिर, हिंदुत्व याविषयांवर कोणतेही गट-तट असू नयेत. आमचं हृदय आणि मन भगवं आहे. किल्ले शिवनेरीची माती पवित्र माती आहे. या मातीमध्ये चमत्कार करणारी ताकद आहे.उद्धव ठाकरे यांनी शिवजन्मस्थळ, शिवकुंज स्मारक येथे बालशिवबा राजमाता जिजाऊ यांच्या शिल्पास अभिवादन केले. यानंतर पदाधिकारी व शिवसैनिकांनी चांदीच्या कलशामध्ये पवित्र माती व जल भरून हाकलश उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्त केला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे