शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

पर्यावरणाचे रक्षण करूनच कोणताही प्रकल्प होण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीसांनी लक्ष घालावे - आदित्य ठाकरे

By श्रीकिशन काळे | Updated: March 24, 2023 15:55 IST

पुण्यातील मुठा नदीकाठ सुधार योजनेतंर्गत हजारोंच्या संख्येने होणाऱ्या वृक्षतोडीला आमचा विरोध

पुणे: पुणे महापालिकेकडून बंडगार्डन येथे मुठा नदीकाठ सुधार योजनेतंर्गत काम वेगाने सुरू आहे. त्या ठिकाणचे ६ हजार वृक्ष त्यासाठी तोडले जाणार आहेत. त्याला आमचा विरोध असून, पर्यावरणाचे रक्षण करूनच कोणताही प्रकल्प व्हावा, त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे, अशी मागणी आमदार आदित्य ठाकरे यांनी विधानसभेत केली.

महापालिकेच्या वतीने नदीचे पुनरूज्जीवन करण्याचे प्रायोगिक काम बंडगार्डन येथील एका पट्ट्यात सुरू आहे. त्यामुळे मुठा नदीच्या दोन्ही काठांवर काम सुरू झालेले आहे. या प्रकल्पावर ५ हजार कोटी रूपयांचा खर्च होणार आहे. त्यामुळे येथील हजारो वृक्ष तोडावी लागणार आहेत. तसेच या नदी सुधार प्रकल्पामुळे जैवविविधता नष्ट होणार आहे. नदीप्रेमींनी अगोदर नदीत जाणारे सांडपाणी थांबवावे आणि त्यावर प्रक्रिया करावी अशी मागणी केली आहे. जोपर्यंत नदीत सांडपाणी वाहत आहे, तोपर्यंत नदीचे ब्युटीफिकेशन करून काहीच उपयोग नाही. त्याबाबत नदीप्रेमींनी आदित्य ठाकरे यांना याची माहिती दिली होती. त्यामुळे त्यांनी विधानसभेत हा मुद्दा मांडला. मागील आघाडीच्या सरकारमध्ये आदित्य ठाकरे पर्यावरणमंत्री होते. तेव्हा त्यांनी या परिसरातील डॉ. सालिम अली पक्षी अभयारण्याला भेट दिली होती. तेव्हा त्यांनी हे अभयारण्य संरक्षित करण्यासाठी आदेश दिले होते.

मुळा-मुठा नदीचे सुशोभीकरण सुरू आहे. त्याबाबत दिलेल्या परवानग्या चुकीच्या आहेत. त्यात त्रुटी आहेत. तेव्हा नदीकाठचे झाडे कापणार नाही, असे नमूद केले होते. पण आता ६ हजार झाडे कापली जाणार आहेत. हे चुकीचे असून, झाडे जपावीत अशी मागणी ठाकरे यांनी केली होती. तेव्हा विधानसभा अध्यक्षांनी उचित उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :PuneपुणेAditya Thackreyआदित्य ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसenvironmentपर्यावरणGovernmentसरकार