अपंगांच्या समस्येसाठी धरणे आंदोलन
By Admin | Updated: June 12, 2014 05:22 IST2014-06-12T05:22:48+5:302014-06-12T05:22:48+5:30
दौंड येथील पंचायत समितीच्या कार्यालयाच्या परिसरात अपंगांच्या विविध मागण्या आणि समस्या सोडविण्यासाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

अपंगांच्या समस्येसाठी धरणे आंदोलन
दौंड : दौंड येथील पंचायत समितीच्या कार्यालयाच्या परिसरात अपंगांच्या विविध मागण्या आणि समस्या सोडविण्यासाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
अपंगांच्या कल्याणार्थ करण्यात आलेल्या महत्वपुर्ण कायद्यानुसार जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या संस्थांना त्यांच्या अर्थ संकल्पाच्या ३ टक्के निधी हा अपंग पुनर्वसाना करीता खर्च करणे आवश्यक आहे. मात्र दौंड तालुक्यातील कुठल्याही ग्रामपंचायतीने हा निधी अपंगांसाठी खर्च केलेला नाही. दरम्यान शासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे अपंग व्यक्ती मध्ये संतापाची भावना आहे. परिणामी अपंगांचा विकास होत नाही. असे निवेदनात म्हटले आहे.
ग्रामपंचायतीमध्ये अपंगांचा ३ टक्के निधी खर्च एका महिन्याच्या आत करण्यात येईल असे आश्वासन अंदोलकांना पंचायत समितीने दिल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले. धर्मेंद्र सातव, सुरेखा ढवळे, युवराज निकाळजे, मनिषा सोनवणे, शिवाजी नांदखीले, हरिदास शिंदे, रामेश्वर मंत्री, अरुण सोनवणे, मोहन शिंगटे, मनिषा जाधव, प्रकाश कांबळे, अनिल क्षिरसागर, मनोज काळभोर, रंजना म्हस्के, दत्तात्रय होळकर, अनंत डुळे यांच्या सह अपंग बांधव या अंदोलनात सहभागी झाले होते. (वार्ताहर)